शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जिल्ह्यात गडकोटांच्या संवर्धनासाठी मोहीम; पालघरमध्ये ६० हून अधिक किल्ल्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 00:30 IST

किल्ले वसई मोहीम परिवारअंतर्गत २००३ सालापासून पालघरमधील ऐतिहासिक गडकोट व पर्यटनस्थळे, मंदिरे, मूर्तीच्या संवर्धनासाठी श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून कार्य केले जाते.

पालघर : जिल्ह्यातील ६० हून अधिक गडकोटांपैकी प्राथमिक स्वरूपात १० गडकोटांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून त्याच्या संवर्धनासाठी ठोस कार्यक्रम आयोजित करावा, या मागणीसाठी गडकिल्ले वसई मोहीमचे श्रीदत्त राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अंदाज समितीप्रमुख रणजित कांबळे यांनी यासंदर्भात तात्काळ कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.किल्ले वसई मोहीम परिवारअंतर्गत २००३ सालापासून पालघरमधील ऐतिहासिक गडकोट व पर्यटनस्थळे, मंदिरे, मूर्तीच्या संवर्धनासाठी श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून कार्य केले जाते. मागील १८ वर्षांत दुर्गसंवर्धन, इतिहास मार्गदर्शन मोहीम, ऐतिहासिक व्याख्यानमाला, कडेकोट विजयदिन परंपरा, मोडी लिपी संवर्धन या माध्यमातून आजवर ३ हजार ५०० हून अधिक विनामूल्य उपक्रम मोहिमेअंतर्गत आयोजिले आहेत. सर्व उपक्रमाचा मुख्य हेतू जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-कोट स्थळांचे संवर्धन व्हावे, असा असल्याचे श्रीदत्त राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जिल्ह्यात गडकोट, बुरुज, दुर्गकिल्ले इ. ६० प्रकार उपलब्ध असून यातील माहीम, सफाळे, केळवे, बोईसर भागांत मोठ्या प्रमाणावर किल्ले आहेत. याची डागडुजी अनेक वर्षे झालेली नसून त्यावरील स्थळे, पाणवठे, तोफा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आम्ही किल्ले वसई मोहीमअंतर्गत दर रविवारी व सुटीच्या दिवशी स्वतः प्रत्यक्ष सहभागातून व स्थानिक दुर्गमित्रांच्या मदतीने श्रमदान मोहीमअंतर्गत सदर गडाचे संवर्धन केलेले आहे. पण आपल्या शासकीय यंत्रणा अंतर्गत त्या किल्ल्याचे अधिकृत नोंदणी करून आर्थिक मदतनिधी उपलब्ध करून दुर्ग संवर्धनात पाठबळ निर्माण करण्यासाठी श्रीदत्त राऊत, प्रसिद्ध आर्किटेक्ट निशांत पाटील, विनीत पाटील, अभिजित पाटील, प्रोत्साहन पाटील, प्रीतम पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ  यांना निवेदन दिले होते. या मागणीसंदर्भात अंदाज समितीचे प्रमुख आमदार कांबळे, आ. कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी गुरसळ यांची भेट घेत गडकिल्ल्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या श्रीदत्तसारख्या दुर्गप्रेमींना निधीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.