शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

कल्याण-ठाणे वाहतूक कोंडीवर तातडीने बैठक बोलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : काही दिवसांपासून ठाणे ते कल्याण मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : काही दिवसांपासून ठाणे ते कल्याण मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधितांची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी कल्याण पश्चिमचे माजी आमदार व भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे राज्य संयोजक नरेंद्र पवार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शुक्रवारी पत्राद्वारे केली.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ठाणे ते कल्याण फाट्यापर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. ठाणे ते कल्याण या अर्ध्या तासाच्या प्रवासाला तीन ते चार तास लागत आहेत. ठाणे जिल्हा तसेच मुंबई व उपनगरांना नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वपूर्ण महामार्ग आहे. मात्र, या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यातच अवजड वाहतुकीमुळे अनेक ठिकाणी होत असलेल्या कोंडीमुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच अजूनही सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरू झाला नसल्याने शेकडो खासगी आस्थापनांचे कर्मचारी खासगी व सार्वजनिक वाहनाने मुंबईला या मार्गानेच प्रवास करतात.

या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे बुधवारी उच्च शिक्षणाच्या सामायिक परीक्षेसाठी कल्याणमधील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी विलंब झाल्याने परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी, आरटीओ अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक बोलवावी आणि कोंडी, खड्ड्यांची व रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री शिंदे तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.

------------