शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

रेल्वे पोलीस, टीसी यांना बडतर्फ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : दिवा रेल्वे स्थानकात मोबाईल चोरट्याच्या हल्ल्यात शनिवारी अपघाती मृत्यू झालेल्या महिला प्रवासी विद्या पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : दिवा रेल्वे स्थानकात मोबाईल चोरट्याच्या हल्ल्यात शनिवारी अपघाती मृत्यू झालेल्या महिला प्रवासी विद्या पाटील यांच्या परिवाराची पूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावी, घटनेप्रसंगी हलगर्जीपणा करणाऱ्या ड्युटीवरील जीआरपी व आरपीएफ जवान व टीसी यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशा मागण्या उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मनोहर शेलार यांनी लोहमार्ग पोलीस आयुक्त, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केल्या.

विद्या पाटील या नोकरदार महिलेचा चोरट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर आहे. रेल्वे

प्रशासनाला कलंकित करणारी आणि प्रशासनाविषयी प्रवाशांच्या मनात प्रचंड संताप व तिरस्कार निर्माण करणारी आहे. या घटनेमुळे काही सवाल उपस्थित होत असून, त्याची उत्तरे प्रवाशांना मिळायला हवीत, असे शेलार म्हणाले. सध्या लोकल प्रवास अत्यावश्यक सेवेतील व राज्य शासनाने मान्यता दिलेले कर्मचारी वगळता सामान्य जनतेसाठी बंद असताना, सराईत गुन्हेगार रेल्वे स्टेशनवर आणि लोकलमध्ये तोही महिलांच्या डब्यात आलाच कसा? रेल्वेची सुरक्षा यंत्रणा आणि टीसी त्यावेळी स्थानकावर नव्हते, असाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ही घटना घडली तेव्हा ड्युटीवर असलेल्या दोन्ही यंत्रणांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना, टीसीला तत्काळ बडतर्फ करण्यात यावे. महिला डब्यात सुरक्षारक्षक का ठेवला नव्हता, याचेही उत्तर मिळाले पाहिजे. या अपघातातील मृत महिला ही गरीब असून, तिला तीन लहान मुली आहेत. त्यामुळे रेल्वेने ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान त्यांच्या कुटुंबाला द्यावे. तसेच पाटील यांच्या लहान मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

..............