शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

टिटवाळ््याच्या गर्दीवर बायपास रस्त्याचा उतारा

By admin | Updated: March 15, 2017 02:29 IST

टिटवाळा परिसर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आहे. टिटवाळा मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गोवेली ते गुरुवली उड्डाणपूल बायपास रस्ता तयार करावा

कल्याण : टिटवाळा परिसर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आहे. टिटवाळा मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गोवेली ते गुरुवली उड्डाणपूल बायपास रस्ता तयार करावा, असा प्रस्ताव भाजपा आमदार किसन कथोरे यांनी महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे मांडला आहे. कथोरे यांनी मंगळवारी रवींद्रन यांची भेट घेतली. जवळपास दीड किलोमीटर अंतराचा बायपास रस्ता तयार केल्यास मंदिर परिसरातील कोंडी दूर होईल. गोवेली ते मंदिर परिसर हा रस्ता असून, तो मंदिरालगत अरुंद रस्ता आहे. त्या रस्त्याद्वारे खडवली, राया या गावांकडे जाता येते. तसेच टिटवाळा रेल्वेस्थानकापासून मंदिराकडे रस्ता जातो. टिटवाळा मंदिर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. मंदिर परिसरापासून खडवली, राया, रेल्वेस्थानक, गोवेली, मुरबाड, वासिंद येथे जाता येते. मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावर गुरवली येथे महापालिकतर्फे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पूल उभारल्यानंतर तेथील फाटक बंद होणार आहे. या सगळ््याचा विचार करून टिटवाळा बायपास रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव कथोरे यांनी मांडला. दीड किलोमीटरचा रस्त्याचा काही भाग कल्याण ग्रामीण व महापालिकेच्या हद्दीत आहे. त्यामुळे काँक्रिटचा अर्धा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग तर उर्वरित रस्त्याचा खर्च हा महापालिकेच्या निधीतून करावा, अशी सूचना त्यांनी केली. त्यावर या रस्त्याच्या मंजुरीबाबत रवींद्रन यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.टिटवाळा पोलीस ठाण्यासाठीही महापालिकेने जागा देण्याची मागणी कथोरे यांनी केली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील फूल बाजाराच्या नव्या इमारतीच्या बांधकामास महापालिकेने अजूनही परवानगी दिलेली नाही. ती त्वरित द्यावी, अशी मागणीही त्यांनी रवींद्रन यांच्याकडे केली. त्यावर जातीने लक्ष घालण्याची ग्वाही रवींद्रन यांनी कथोरे यांना दिली आहे. केडीएमसीतून २७ गावे वगळण्यात आली. त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. ही गावे कल्याण पूर्वेला पिसवली ते शीळ फाटा या मार्गालगत आहेत. सात गावे अंबरनाथ तहसील कार्यालयांतर्गत येतात. त्यामुळे त्यांचा संपर्क आता कल्याण पंचायत समितीशी नाही. कल्याण पूर्वेपासून टिटवाळा, खडवली, अंबरनाथच्या दिशेने कल्याण तालुक्यातील १०० गावे ही कल्याण तहसील कार्यालयाच्या हद्दीत येतात. त्यापैकी जांभूळ व वसत ही गावे अंबरनाथ तहसील कार्यालयात समाविष्ट करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. ही भौगोलिक पार्श्वभूमी पाहता कल्याण पंचायत समितीचे फुले चौकासमोरील कार्यालय हलवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. पंचायत समितीचे कार्यालय गोवेली येथे उभारण्याचा प्रस्ताव तयार आहे. त्यासाठी ग्राम विकास खात्याकडून सात कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात येणार आहे. सध्याचे पंचायत समिती कार्यालय हे धोकादायक इमारतीत आहे. गोवेली हे टिटवाळा रेल्वे स्थानकापासून जवळ आहे. तसेच ते कल्याण-मुरबाड राज्य मार्गावर आहे. वाहतुकीच्या दृष्टीने गोवेली सोयीची आहे. टिटवाळा बायपास रस्ता झाल्यावर गोवेली हे मध्यवर्ती ठिकाण आहे. पंचायत समितीचे कार्यालय गाठण्यासाठी कल्याण तालुक्यातील ग्रामस्थांना कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत धाव घेण्याची गरज भासणार नाही. कल्याण जिल्हा करण्याच्या मागणीवर कथोरे ठाम आहेत. कल्याण जिल्हा झाल्यास गोवेली तालुका होणार आहे. (प्रतिनिधी)