शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

सरकारी यंत्रणांकडून व्यापा-याचा खून मोर्चातील व्यापा-यांचा आरोप : खड्डे बळी प्रकरणी पालिका, एमआयडीसी, बांधकाम विभागाची टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 03:19 IST

रस्त्यावरील खड्ड्यामुळे व्यापा-याचा जीव जाऊनही महापालिका, एमआयडीसी, प्रदूषण मंडळ आणि बांधकाम विभागाने त्याची जबाबदारी परस्परांवर ढकलत शुक्रवारी पुन्हा आपल्या निर्ढावलेपणाचे दर्शन दिले.

डोंबिवली : रस्त्यावरील खड्ड्यामुळे व्यापा-याचा जीव जाऊनही महापालिका, एमआयडीसी, प्रदूषण मंडळ आणि बांधकाम विभागाने त्याची जबाबदारी परस्परांवर ढकलत शुक्रवारी पुन्हा आपल्या निर्ढावलेपणाचे दर्शन दिले. यंत्रणांच्या या बेपर्वाईमुळे संतापलेल्या व्यापारी आणि मोर्चेकºयांनी व्यापारी ललितचा मृत्यू अपघाती हा सरकारी यंत्रणांनी हलगर्जीतून केलेला त्याचा खून आहे, असा आरोप केला. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मनसेने १५ दिवसांत जबाबदारी निश्चित करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा, असा इशारा नव्याने दिला.कल्याण-खंबाळपाडा रस्त्यावरील खड्ड्यामुळे व्यापारी ललित संघवी यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मार्बल व्यापारी संघटनेने एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला होता. घरडा सर्कलपासून निघालेल्या या मोर्चाने एमआयडीसी कारार्यलयावर धडक दिली. त्यात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, शहराध्यक्ष मनोज घरत, भाजपाचे नगरसेवक महेश पाटील, केडीएमसीतील सभागृह नेते राजेश मोरे व शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे तसेच संघवी यांचा भाऊ भावेश यांच्यासह व्यापाºयांचा समावेश होता. नंतर एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते आणि महापालिकेच्या अधिकाºयासोबत त्यांची बैठक झाली.ललित संघवीचा मृत्यू रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची जबाबदारी एकही सरकारी यंत्रणा घेत नाही. सगळे एकमेकांकडे बोट दाखवून कातडी वाचवत असल्याचे गुरुवारी घटनास्थळी झालेल्या पाहणीदरम्यान उघड झाले होते. सरकारी अधिकाºयांनी शुक्रावारीही टोलवाटोलवीची उत्तरे देत जबाबदारी स्वीकारण्याऐवजी एकमेकांकडे बोटे दाखवण्याचेच काम केले. या प्रकारामुळे मोर्चाचे शिष्टमंडळ संतप्त झाले होते. मनसेने अधिकाºयांना आता १५ दिवसांची डेडलाइन दिली. सर्व सरकारी यंत्रणांनी मिळून ललित संघवी मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ललितच्या मृत्यूला सात दिवस उलटूनही पोलिसांकडून तपास होत नाही. पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी व रस्त्याच्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्यात अधिकाºयांची नावे स्पष्टपणे लिहिलेली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी याचा तपास योग्य प्रकारे करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे या प्रकरणातून धडा घेत सरकारी यंत्रणांनी कारभार सुधारला नाही आणि पोलिसांनी अधिकाºयांची नावे घेऊन गुन्हे दाखल केले नाहीत, तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.‘तीव्र आंदोलन छेडणार’ : यंत्रणांच्या टोलवाटोलवीमुळे खड्डेप्रकरणी मृत्युला नेमके कोण जबाबदार आणि खड्ड्यांना कोण कारणीभूत आहे, याचा शोध पोलिसांनीच घेऊन योग्यप्रकारे गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने केली. सरकारी यंत्रणांच्या कारभारात १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन केले जाईल. अधिकाºयांना कार्यालयात बसू दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.