शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

बदलापूरहूनच बस भरून येतात, मग आम्ही चढणार तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 00:55 IST

अंबरनाथचे प्रवासी संतप्त; लोकलसेवा बंदचा परिणाम

अंबरनाथ : लोकलसेवा बंद असल्याने सर्व ताण हा बससेवेवर पडला आहे. मात्र, अंबरनाथहून बस सुटण्याचे प्रमाण कमी असून सर्व बस या बदलापूरमधून सुटतात. बदलापूरहून सुटणारी प्रत्येक बस भरून येत असल्याने अंबरनाथच्या प्रवाशांना चढण्यासाठी जागाच मिळत नाही. त्यामुळे अंबरनाथच्या प्रवाशांवर अन्याय होत आहे. परिणामी, येथील प्रवाशांच्या संतापात दिवसेंदिवस वाढ होत आहे.अंबरनाथ आणि बदलापूरमधून मुंबईला मोठ्या संख्येने चाकरमानी नोकरीला जातात. लोकलसेवा बंद असल्याने खाजगी कंपनीतील कामगार हे कामावर जाण्यासाठी बसचा आधार घेतात. मात्र, आता कामावर जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने बससेवाही अपुरी पडत आहे. बदलापूर रेल्वेस्थानकाबाहेरील डेपोतून बस सुटत असल्याने तेथेच त्या भरतात. त्यामुळे अंबरनाथचे प्रवासी ज्या स्टॉपवर बसची वाट बघत बसतात, त्या बसमध्ये त्यांना चढण्यासाठी जागाच मिळत नाही. अंबरनाथहून मुंबईसाठी कमी बस असल्याने बदलापूरच्या बसवर अवलंबून राहण्याची वेळ अंबरनाथच्या प्रवाशांवर आली आहे.शुक्रवारी अशीच एक बस सकाळी बदलापूरहून भरून आली होती. त्या बसमध्ये चढण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने बसच्या वाहकाने अंबरनाथ येथील महात्मा गांधी स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना आत घेण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सुनील पारटे या प्रवाशाने बसची मागची काच दगड मारून फोडली. त्यामुळे प्रवाशांचा संताप हा अनावर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकलसेवा सुरू होत नाही, तोपर्यंत अंबरनाथच्या डेपोतून मुंबईसाठी बस सुरू करावी, अशी मागणी अंबरनाथकर प्रवासी करत आहेत.लॉकडाऊन शिथिल होत असल्यामुळे मुंबई व परिसरातील कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, दूरवरून कामाच्या ठिकाणी जाणाºया नोकरदारांना प्रवासात अडथळे येत असल्याने नाराजी आहे.कामावर जाणे हे आता गरजेचे झाले आहे. बदलापूरहून बस भरून येत असल्याने आम्हाला जागाच मिळत नाही. त्यामुळे कामावर जाण्यास विलंब होतो. तर, काही वेळेस उभ्यानेच प्रवास करावा लागतो. अंबरनाथहून अधिकची बससेवा मुंबईसाठी सुरू करण्याची गरज आहे.- विशाखा पडवे, प्रवासी, अंबरनाथ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या