शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

बदलापूरहूनच बस भरून येतात, मग आम्ही चढणार तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 00:55 IST

अंबरनाथचे प्रवासी संतप्त; लोकलसेवा बंदचा परिणाम

अंबरनाथ : लोकलसेवा बंद असल्याने सर्व ताण हा बससेवेवर पडला आहे. मात्र, अंबरनाथहून बस सुटण्याचे प्रमाण कमी असून सर्व बस या बदलापूरमधून सुटतात. बदलापूरहून सुटणारी प्रत्येक बस भरून येत असल्याने अंबरनाथच्या प्रवाशांना चढण्यासाठी जागाच मिळत नाही. त्यामुळे अंबरनाथच्या प्रवाशांवर अन्याय होत आहे. परिणामी, येथील प्रवाशांच्या संतापात दिवसेंदिवस वाढ होत आहे.अंबरनाथ आणि बदलापूरमधून मुंबईला मोठ्या संख्येने चाकरमानी नोकरीला जातात. लोकलसेवा बंद असल्याने खाजगी कंपनीतील कामगार हे कामावर जाण्यासाठी बसचा आधार घेतात. मात्र, आता कामावर जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने बससेवाही अपुरी पडत आहे. बदलापूर रेल्वेस्थानकाबाहेरील डेपोतून बस सुटत असल्याने तेथेच त्या भरतात. त्यामुळे अंबरनाथचे प्रवासी ज्या स्टॉपवर बसची वाट बघत बसतात, त्या बसमध्ये त्यांना चढण्यासाठी जागाच मिळत नाही. अंबरनाथहून मुंबईसाठी कमी बस असल्याने बदलापूरच्या बसवर अवलंबून राहण्याची वेळ अंबरनाथच्या प्रवाशांवर आली आहे.शुक्रवारी अशीच एक बस सकाळी बदलापूरहून भरून आली होती. त्या बसमध्ये चढण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने बसच्या वाहकाने अंबरनाथ येथील महात्मा गांधी स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना आत घेण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सुनील पारटे या प्रवाशाने बसची मागची काच दगड मारून फोडली. त्यामुळे प्रवाशांचा संताप हा अनावर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकलसेवा सुरू होत नाही, तोपर्यंत अंबरनाथच्या डेपोतून मुंबईसाठी बस सुरू करावी, अशी मागणी अंबरनाथकर प्रवासी करत आहेत.लॉकडाऊन शिथिल होत असल्यामुळे मुंबई व परिसरातील कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, दूरवरून कामाच्या ठिकाणी जाणाºया नोकरदारांना प्रवासात अडथळे येत असल्याने नाराजी आहे.कामावर जाणे हे आता गरजेचे झाले आहे. बदलापूरहून बस भरून येत असल्याने आम्हाला जागाच मिळत नाही. त्यामुळे कामावर जाण्यास विलंब होतो. तर, काही वेळेस उभ्यानेच प्रवास करावा लागतो. अंबरनाथहून अधिकची बससेवा मुंबईसाठी सुरू करण्याची गरज आहे.- विशाखा पडवे, प्रवासी, अंबरनाथ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या