शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरहूनच बस भरून येतात, मग आम्ही चढणार तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 00:55 IST

अंबरनाथचे प्रवासी संतप्त; लोकलसेवा बंदचा परिणाम

अंबरनाथ : लोकलसेवा बंद असल्याने सर्व ताण हा बससेवेवर पडला आहे. मात्र, अंबरनाथहून बस सुटण्याचे प्रमाण कमी असून सर्व बस या बदलापूरमधून सुटतात. बदलापूरहून सुटणारी प्रत्येक बस भरून येत असल्याने अंबरनाथच्या प्रवाशांना चढण्यासाठी जागाच मिळत नाही. त्यामुळे अंबरनाथच्या प्रवाशांवर अन्याय होत आहे. परिणामी, येथील प्रवाशांच्या संतापात दिवसेंदिवस वाढ होत आहे.अंबरनाथ आणि बदलापूरमधून मुंबईला मोठ्या संख्येने चाकरमानी नोकरीला जातात. लोकलसेवा बंद असल्याने खाजगी कंपनीतील कामगार हे कामावर जाण्यासाठी बसचा आधार घेतात. मात्र, आता कामावर जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने बससेवाही अपुरी पडत आहे. बदलापूर रेल्वेस्थानकाबाहेरील डेपोतून बस सुटत असल्याने तेथेच त्या भरतात. त्यामुळे अंबरनाथचे प्रवासी ज्या स्टॉपवर बसची वाट बघत बसतात, त्या बसमध्ये त्यांना चढण्यासाठी जागाच मिळत नाही. अंबरनाथहून मुंबईसाठी कमी बस असल्याने बदलापूरच्या बसवर अवलंबून राहण्याची वेळ अंबरनाथच्या प्रवाशांवर आली आहे.शुक्रवारी अशीच एक बस सकाळी बदलापूरहून भरून आली होती. त्या बसमध्ये चढण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने बसच्या वाहकाने अंबरनाथ येथील महात्मा गांधी स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना आत घेण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सुनील पारटे या प्रवाशाने बसची मागची काच दगड मारून फोडली. त्यामुळे प्रवाशांचा संताप हा अनावर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकलसेवा सुरू होत नाही, तोपर्यंत अंबरनाथच्या डेपोतून मुंबईसाठी बस सुरू करावी, अशी मागणी अंबरनाथकर प्रवासी करत आहेत.लॉकडाऊन शिथिल होत असल्यामुळे मुंबई व परिसरातील कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, दूरवरून कामाच्या ठिकाणी जाणाºया नोकरदारांना प्रवासात अडथळे येत असल्याने नाराजी आहे.कामावर जाणे हे आता गरजेचे झाले आहे. बदलापूरहून बस भरून येत असल्याने आम्हाला जागाच मिळत नाही. त्यामुळे कामावर जाण्यास विलंब होतो. तर, काही वेळेस उभ्यानेच प्रवास करावा लागतो. अंबरनाथहून अधिकची बससेवा मुंबईसाठी सुरू करण्याची गरज आहे.- विशाखा पडवे, प्रवासी, अंबरनाथ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या