शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

बारवीचे जंगल वणव्यात जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:36 IST

मुरबाड : तालुक्यातील चारही वनपरिक्षेत्रातील जंगले जळून खाक होत आहेत. सध्या जंगलात वणव्यांची मालिका सुरू झाली आहे. जंगल जळत ...

मुरबाड : तालुक्यातील चारही वनपरिक्षेत्रातील जंगले जळून खाक होत आहेत. सध्या जंगलात वणव्यांची मालिका सुरू झाली आहे. जंगल जळत असताना त्यांच्या जवळ असणारे खासगी वनक्षेत्र मात्र सुरक्षित आहे. त्यामुळे वनखात्याच्या जंगलात लागणाऱ्या वणव्यांमागे संशयाचा धूर असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

एकदा उन्हाळा सुरू झाला की, मुरबाड तालुक्यातील जंगलात वणवे लागायला सुरुवात होते. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू आहे. यामागील नेमके प्रकरण काय आहे ते अद्यापही उजेडात आलेले नाही. बाजूला खासगी वनक्षेत्र असताना नेमकी वनखात्याच्या जंगलांमध्येच वणवे कसे लागतात याचे रहस्य आजपर्यंत उलगडलेले नाही. वनखात्यामार्फत पावसाळ्यात वनजमिनीवर मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड केली जाते. खड्डे खोदणे, रोपांची देखभाल करणे, त्यांना पाणी देण्यासाठी मजूर, ट्रॅक्टरची व्यवस्था करणे, वणवे लागू नयेत किंवा या रोपांचे जनावरे, मनुष्य यांनी नुकसान करू नये म्हणून वनव्यवस्थापन समितीच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षारक्षक नेमणे, या सर्व बाबींवर प्रत्येक वन परिक्षेत्रात दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात.

उंच टेकड्या, डोंगराळ, दुर्गम भागातील जंगलात हा उपक्रम राबविला जातो. तो नेमका कशा प्रकारे राबविला जातो याची कुठेही प्रसिद्धी होत नसली तरी उन्हाळ्यात याच ठिकाणी नेमके वणवे लागतात. नेमके ज्या ठिकाणी लागवड केलेली असते तेथेच वणवे लागतात. यावर्षीही मुरबाड तालुक्यातील सर्व जंगले जळू लागली आहेत. गुरुवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बारवी धरण परिसरात वणवा लागला असताना या परिसरात एकही वन कर्मचारी, अधिकारी फिरकला नाही. परिणामी संध्याकाळपर्यंत हे सर्व जंगल जळून खाक झाले. या जंगलात अनेक दुर्मीळ वनौषधी सापडतात, त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांचा वावर आहे.