शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

बारवीचे जंगल वणव्यात जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:36 IST

मुरबाड : तालुक्यातील चारही वनपरिक्षेत्रातील जंगले जळून खाक होत आहेत. सध्या जंगलात वणव्यांची मालिका सुरू झाली आहे. जंगल जळत ...

मुरबाड : तालुक्यातील चारही वनपरिक्षेत्रातील जंगले जळून खाक होत आहेत. सध्या जंगलात वणव्यांची मालिका सुरू झाली आहे. जंगल जळत असताना त्यांच्या जवळ असणारे खासगी वनक्षेत्र मात्र सुरक्षित आहे. त्यामुळे वनखात्याच्या जंगलात लागणाऱ्या वणव्यांमागे संशयाचा धूर असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

एकदा उन्हाळा सुरू झाला की, मुरबाड तालुक्यातील जंगलात वणवे लागायला सुरुवात होते. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू आहे. यामागील नेमके प्रकरण काय आहे ते अद्यापही उजेडात आलेले नाही. बाजूला खासगी वनक्षेत्र असताना नेमकी वनखात्याच्या जंगलांमध्येच वणवे कसे लागतात याचे रहस्य आजपर्यंत उलगडलेले नाही. वनखात्यामार्फत पावसाळ्यात वनजमिनीवर मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड केली जाते. खड्डे खोदणे, रोपांची देखभाल करणे, त्यांना पाणी देण्यासाठी मजूर, ट्रॅक्टरची व्यवस्था करणे, वणवे लागू नयेत किंवा या रोपांचे जनावरे, मनुष्य यांनी नुकसान करू नये म्हणून वनव्यवस्थापन समितीच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षारक्षक नेमणे, या सर्व बाबींवर प्रत्येक वन परिक्षेत्रात दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात.

उंच टेकड्या, डोंगराळ, दुर्गम भागातील जंगलात हा उपक्रम राबविला जातो. तो नेमका कशा प्रकारे राबविला जातो याची कुठेही प्रसिद्धी होत नसली तरी उन्हाळ्यात याच ठिकाणी नेमके वणवे लागतात. नेमके ज्या ठिकाणी लागवड केलेली असते तेथेच वणवे लागतात. यावर्षीही मुरबाड तालुक्यातील सर्व जंगले जळू लागली आहेत. गुरुवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बारवी धरण परिसरात वणवा लागला असताना या परिसरात एकही वन कर्मचारी, अधिकारी फिरकला नाही. परिणामी संध्याकाळपर्यंत हे सर्व जंगल जळून खाक झाले. या जंगलात अनेक दुर्मीळ वनौषधी सापडतात, त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांचा वावर आहे.