शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

दफनविधी चार तास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:59 IST

खड्डा खोदण्यासाठी कामगारांचा अभाव : वीरशैव लिंगायत समाजाची फरपट सुरूच

मुरलीधर भवार।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शिवमंदिर स्मशानभूमीत दफनविधीसाठी खड्डा खोदण्यासाठी गुरुवारी कामगारच नसल्याने पार्थिव रुग्णालयात चार तास रखडल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. वीरशैव लिंगायत समाजातील व्यक्तींचे दफन केले जात असल्यामुळे अशी फरपट नेहमीच वाट्याला येत आहे. तसेच अवाजवी पैशांची मागणी केली जात असल्यामुळे केडीएमसी प्रशासन याबाबत उपाययोजना करणार की नाही, असा संतप्त सवाल या समाजबांधवांनी केला आहे.डोंबिवली औद्योगिक निवासी संकुलात राहणारे वीरशैव लिंगायत समाजातील यशवंत गुरव (६२) यांचे गुरुवारी किडनीच्या आजाराने कळवा येथील शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी ४ वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिव डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणण्याचे नातेवाइकांनी ठरवले. अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी नातेवाइकांनी स्मशानभूमी गाठली. वीरशैव लिंगायत समाजात मृतदेह समाधी अवस्थेत दफन करण्याची प्रथा आहे. मात्र, स्मशानभूमीत खड्डा खोदण्यासाठी कामगार नसल्यामुळे व्यवस्थापनाने पाथर्लीला जाण्यास सांगितले. त्यानंतर नातेवाईक पाथर्ली येथे गेले. तेथे दफनभूमीत चिखल व पाणी साचलेले होते. त्यामुळे खड्डा खोदण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली; मात्र पाच हजार रुपये जास्त असल्याने नातेवाईक पुन्हा शिवमंदिर स्मशानभूमीत आले. अंत्यसंस्कारांचा पेच निर्माण झाल्याने नातेवाइकांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील यांच्याकडे धाव घेऊ न दाद मागितली. पाटील यांनी स्मशानभूमीत जाऊ न तेथील व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता खड्डा खोदण्याचे काम खाजगी कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे. त्यांच्याकडून काम योग्य प्रकारे केले जात नाही, तसेच जास्त पैशांची मागणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.स्मशानभूमीत सर्व सुविधा मोफत असायला हव्यात. याबाबत आयुक्त आणि महापौरांकडे तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. अखेर पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर स्मशान व्यवस्थापनाने दोन कामगार उपलब्ध करून दिले. मात्र, तोपर्यंत रात्रीचे ८ वाजले होते. खड्डा खोदण्यास सुरुवात केल्यानंतर पार्थिव या स्मशानभूमीत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. तोपर्यंत मृतदेह चार तास अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत रुग्णालयात होता. अखेर, रात्री ९ वाजल्यानंतर दफनविधी पूर्णकरण्यात आला.स्वतंत्र स्मशानभूमी हवीवीरशैव लिंगायत मंडळाचे कल्याण-ठाणेचे सरचिटणीस संजय गुरव यांनी सांगितले की, ‘कल्याण-डोंबिवली परिसरात वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या आठ हजारांवर आहे. कल्याणमध्ये समाजासाठी दफनभूमी नसल्याने त्यांना कल्याणहून पार्थिव डोंबिवलीत आणावे लागते. खड्डा खोदण्यासाठी अनेकदा अवाजवी पैशांची मागणी करून अडवणूक करण्यात येते. महापालिकेने वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्र दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.’