शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यावर ५७ काेटींचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्व व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ५० हजार रुपये ३० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्व व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ५० हजार रुपये ३० दिवसांत देण्यात येतील, अशी माहिती केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. मोदी सरकारचा हा निर्णय आधीच कोविडच्या लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेल्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेचे जितके दिवाळे काढणारा आहेे, तितकाच जिल्हा प्रशासनांचा दमछाक करणारा आहे. यामुळे ठाणे जिल्हा प्रशासनावर ५६ कोटी ९३ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. कारण एकट्या ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्रीपर्यंत ११ हजार ३८६ नागरिकांचा कोरोनाचे बळी गेले आहेत. यात कोविडसदृश आजारांनी दगावलेल्या हजारो रुग्णांचा समावेश नाही. यामुळे त्यांच्या नातेवाइकांच्या नुकसानभरपाईचे काय हा प्रश्न येत्या काळात पेटणार आहे.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आजही जिल्ह्यात रोज दोनशे ते पावणेतीनशे रुग्णांसह चार ते आठ बळी जात आहेत. यामुळे नरेंद्र मोदी सरकारने केंद्राने जरी कोविडबळींच्या नातेवाइकांना राज्य आपत्ती निवारण निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाईल, असे सांगून आपली जबाबदारी झटकली असली तरी गेल्या दोन वर्षांपासून केंद्राने महाराष्ट्र सरकारला जीएसटीसह इतर करांचा एक छदामही दिलेला नाही. त्यातच कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने विशेष अध्यादेश काढून आरोग्य विभाग वगळता आपल्या सर्व विभागांचा खर्च ७५ टक्क्यांनी कमी करून तो कोविड आपत्ती निवारणासाठी वळविला आहे. यातून प्रत्येकी जिल्ह्यात वाढीव कोविड रुग्णालये, रेमडीसिविर, आरटीपीसीआर, ॲन्टिजन टेस्ट किट, पीपीई किटसह इतर औषधी,ऑक्सिजन प्लॉन्ट, व्हेंटिलेटर, इतर सामग्री, वैद्यकीय कर्मचारी भरती, केलेली आहे. अशातच दोन वर्षांत राज्यात निसर्ग, तौक्ते चक्रीवादळांसह अतिवृष्टीचे संकट ओढवले आहे. या सर्वांचा नैसर्गिक आपत्तींचा सर्व खर्च राज्य आपत्ती निवारण निधीतून जिल्हा प्रशासनांद्वारे करण्यात आलेला आहे,

निसर्ग, तोक्ते आणि अतिवृष्टीचा मोठा ठाणे जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्याचा ग्रामीण भागासह शहरी भागाचे यात मोठे नुकसान झाले आहे. तसेच कोरोनाचे संकटही जिल्ह्यावर मोठे आहे. राजधानी मुंबईपेक्षा आजही सक्रिय रुग्णांची संख्या ठाणे जिल्ह्यात जास्त आहे. यामुळे आता हे ५७ कोटी रुपये येत्या ३० दिवसात कसे उभे करायचे हा प्रश्न आता जिल्हा प्रशासनाला सतावणार आहे. कारण ठाणे जिल्ह्याचा आवाका पाहता जिल्हा प्रशासनाकडे आपत्ती निवारण निधीची क्षमता तोळामासा असल्याने कोविड रुग्णांलयांचा मोठा खर्च, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर या महापालिकांनी उचलला आहे.