शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बुलेट ट्रेनला शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:33 IST

मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पश्चिम उपनगरातून थेट मार्ग उपलब्ध असतानाही ती काही व्यक्तींच्या हितासाठी ठाणे जिल्ह्यातून वळवण्यात आली आहे.

भिवंडी : बीकेसीतून जाणारी बुलेट ट्रेन थेट विरारमार्गे बोईसर आणि पुढे अहमदाबादला नेणे शक्य असतानाही ती ठाणे जिल्ह्यात कोणाच्या हितासाठी वळवली आहे, असा प्रश्न भिवंडी तालुक्यातील शेतकºयांनी केला. मार्ग वळवल्याने अकारण त्याखाली शेतकºयांच्या जमिनी जाणार आहेत. त्याचे उत्पन्नाचे साधन कायमचे हिरावले जाणार आहे, असा मुद्दा मांडत दहा गावातील शेतकºयांनी बुलेट ट्रेनला जमिनी देण्यास विरोध केला आहे. या वेळी प्रशासनाने स्थानिक बाजारभावापेक्षा चौपट किंमत देण्याची तयारी दाखवूनही शेतकरी विरोधावर ठाम राहिल्याने ही बैठक निष्फळ ठरली.मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पश्चिम उपनगरातून थेट मार्ग उपलब्ध असतानाही ती काही व्यक्तींच्या हितासाठी ठाणे जिल्ह्यातून वळवण्यात आली आहे. त्यामुळे अकारण भिवंडी तालुक्याच्या दहा गावातील जमिनी त्याखाली जाणार आहेत, हा शेतकºयांचा मुख्य आक्षेप आहे. शेतकºयांच्या जमिनी जाणार असल्याने त्यांना प्रकल्पाची माहिती देण्यासाठी प्रांत अधिकारी संतोष थिटे यांनी अंजूरफाटा येथे हालारी विशा ओसवाल सभागृहात नुकतीच विशेष बैठक बोलावली होती. या प्रसंगी प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक यू. पी. सिंग, स्थापत्य व्यवस्थापक ए. के. नायक, खासदार कपिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य कुंदन पाटील, देवेश पाटील, जयवंत पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र डाकी, विकास भोईर, तहसीलदार शशिकांत गायकवाड, गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. या बुलेट ट्रेन प्रकल्पात भिवंडी तालुक्यातील दिवे-अंजूर, कशेळी, काल्हेर, पूर्णा, कोपर, केवणी, खारबाव, मालोडी, पायगाव, पाये या गावांचा समावेश आहे. त्यासाठी सुमारे २६ .७६४६ हेक्टर जमिनीतील १५५ प्लॉट अधिग्रहित केले आहेत. तसेच या रेल्वेच्या डेपोसाठी भरोडी, अंजूर, सारंग, सुरई, माणकोली, दापोडी, वेहळे या सात गावातील ८५.०४६१ हेक्टर जमिनीतील ८५ प्लॉट बाधित होणार आहेत.भिवंडी तालुक्यात विविध प्रकल्पासाठी सरकारने शेतकºयांच्या जमिनी घेण्याचा सपाटा लावला आहे. शेतकºयांना योग्य भाव, भरपाई मिळत नाही. काही ठिकाणी अन्यायाने जागा घेतल्या जात आहेत. पूर्वी रेल्वेसाठी घेतलेल्या जागेबाबत शासनाने ठोस भूमिका न घेतल्याने शेतकºयांमध्ये नाराजी पसरलेली आहे. त्यातच आधी भूमीपुजन करून नंतर खाजगी व्यावसायिकांच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भिवंडी तालुक्यातून वळविल्याचा आरोप शेतकºयांनी केला आणि या प्रकल्पाला विरोध केला. तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनी वेळोवेळी विविध प्रकल्पांसाठी घेऊन शेतकºयांना आजपर्यंत पुरेसा मोबदला दिलेला नाही. त्यामुळे सरकारी अधिकाºयांच्या आताच्या भरपाईच्या आश्वासनावर विश्वास नसल्याची भावना जमीनमालकांनी व्यक्त केली.बाधित होणाºया शेवटच्या शेतकºयाचे समाधान होत नाही, तोपर्यंत शेतकरी प्रकल्पाला जमिनी देण्यास पुढे येणार नाहीत, असे खासदार कपिल पाटील यांनी सरकारी प्रतिनिधींना सांगितले.मी शेतकºयांसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी या प्रकल्पात ज्यांची घरे, गोदामे, बाधित होणार आहेत, त्यांना भरपाई दिली जाणार असल्याची माहिती दिली. त्यासोबत जमिनीची बाजारभाव ठरविताना चालू वर्षातील रेडीरेकनरचा दर प्रमाणभूत मानला जाणार असल्याची माहिती दिली.कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून बैठकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन