शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

बुलेट ट्रेनला शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:33 IST

मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पश्चिम उपनगरातून थेट मार्ग उपलब्ध असतानाही ती काही व्यक्तींच्या हितासाठी ठाणे जिल्ह्यातून वळवण्यात आली आहे.

भिवंडी : बीकेसीतून जाणारी बुलेट ट्रेन थेट विरारमार्गे बोईसर आणि पुढे अहमदाबादला नेणे शक्य असतानाही ती ठाणे जिल्ह्यात कोणाच्या हितासाठी वळवली आहे, असा प्रश्न भिवंडी तालुक्यातील शेतकºयांनी केला. मार्ग वळवल्याने अकारण त्याखाली शेतकºयांच्या जमिनी जाणार आहेत. त्याचे उत्पन्नाचे साधन कायमचे हिरावले जाणार आहे, असा मुद्दा मांडत दहा गावातील शेतकºयांनी बुलेट ट्रेनला जमिनी देण्यास विरोध केला आहे. या वेळी प्रशासनाने स्थानिक बाजारभावापेक्षा चौपट किंमत देण्याची तयारी दाखवूनही शेतकरी विरोधावर ठाम राहिल्याने ही बैठक निष्फळ ठरली.मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पश्चिम उपनगरातून थेट मार्ग उपलब्ध असतानाही ती काही व्यक्तींच्या हितासाठी ठाणे जिल्ह्यातून वळवण्यात आली आहे. त्यामुळे अकारण भिवंडी तालुक्याच्या दहा गावातील जमिनी त्याखाली जाणार आहेत, हा शेतकºयांचा मुख्य आक्षेप आहे. शेतकºयांच्या जमिनी जाणार असल्याने त्यांना प्रकल्पाची माहिती देण्यासाठी प्रांत अधिकारी संतोष थिटे यांनी अंजूरफाटा येथे हालारी विशा ओसवाल सभागृहात नुकतीच विशेष बैठक बोलावली होती. या प्रसंगी प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक यू. पी. सिंग, स्थापत्य व्यवस्थापक ए. के. नायक, खासदार कपिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य कुंदन पाटील, देवेश पाटील, जयवंत पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र डाकी, विकास भोईर, तहसीलदार शशिकांत गायकवाड, गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. या बुलेट ट्रेन प्रकल्पात भिवंडी तालुक्यातील दिवे-अंजूर, कशेळी, काल्हेर, पूर्णा, कोपर, केवणी, खारबाव, मालोडी, पायगाव, पाये या गावांचा समावेश आहे. त्यासाठी सुमारे २६ .७६४६ हेक्टर जमिनीतील १५५ प्लॉट अधिग्रहित केले आहेत. तसेच या रेल्वेच्या डेपोसाठी भरोडी, अंजूर, सारंग, सुरई, माणकोली, दापोडी, वेहळे या सात गावातील ८५.०४६१ हेक्टर जमिनीतील ८५ प्लॉट बाधित होणार आहेत.भिवंडी तालुक्यात विविध प्रकल्पासाठी सरकारने शेतकºयांच्या जमिनी घेण्याचा सपाटा लावला आहे. शेतकºयांना योग्य भाव, भरपाई मिळत नाही. काही ठिकाणी अन्यायाने जागा घेतल्या जात आहेत. पूर्वी रेल्वेसाठी घेतलेल्या जागेबाबत शासनाने ठोस भूमिका न घेतल्याने शेतकºयांमध्ये नाराजी पसरलेली आहे. त्यातच आधी भूमीपुजन करून नंतर खाजगी व्यावसायिकांच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भिवंडी तालुक्यातून वळविल्याचा आरोप शेतकºयांनी केला आणि या प्रकल्पाला विरोध केला. तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनी वेळोवेळी विविध प्रकल्पांसाठी घेऊन शेतकºयांना आजपर्यंत पुरेसा मोबदला दिलेला नाही. त्यामुळे सरकारी अधिकाºयांच्या आताच्या भरपाईच्या आश्वासनावर विश्वास नसल्याची भावना जमीनमालकांनी व्यक्त केली.बाधित होणाºया शेवटच्या शेतकºयाचे समाधान होत नाही, तोपर्यंत शेतकरी प्रकल्पाला जमिनी देण्यास पुढे येणार नाहीत, असे खासदार कपिल पाटील यांनी सरकारी प्रतिनिधींना सांगितले.मी शेतकºयांसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी या प्रकल्पात ज्यांची घरे, गोदामे, बाधित होणार आहेत, त्यांना भरपाई दिली जाणार असल्याची माहिती दिली. त्यासोबत जमिनीची बाजारभाव ठरविताना चालू वर्षातील रेडीरेकनरचा दर प्रमाणभूत मानला जाणार असल्याची माहिती दिली.कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून बैठकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन