शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

बुलेट ट्रेनला शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:33 IST

मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पश्चिम उपनगरातून थेट मार्ग उपलब्ध असतानाही ती काही व्यक्तींच्या हितासाठी ठाणे जिल्ह्यातून वळवण्यात आली आहे.

भिवंडी : बीकेसीतून जाणारी बुलेट ट्रेन थेट विरारमार्गे बोईसर आणि पुढे अहमदाबादला नेणे शक्य असतानाही ती ठाणे जिल्ह्यात कोणाच्या हितासाठी वळवली आहे, असा प्रश्न भिवंडी तालुक्यातील शेतकºयांनी केला. मार्ग वळवल्याने अकारण त्याखाली शेतकºयांच्या जमिनी जाणार आहेत. त्याचे उत्पन्नाचे साधन कायमचे हिरावले जाणार आहे, असा मुद्दा मांडत दहा गावातील शेतकºयांनी बुलेट ट्रेनला जमिनी देण्यास विरोध केला आहे. या वेळी प्रशासनाने स्थानिक बाजारभावापेक्षा चौपट किंमत देण्याची तयारी दाखवूनही शेतकरी विरोधावर ठाम राहिल्याने ही बैठक निष्फळ ठरली.मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पश्चिम उपनगरातून थेट मार्ग उपलब्ध असतानाही ती काही व्यक्तींच्या हितासाठी ठाणे जिल्ह्यातून वळवण्यात आली आहे. त्यामुळे अकारण भिवंडी तालुक्याच्या दहा गावातील जमिनी त्याखाली जाणार आहेत, हा शेतकºयांचा मुख्य आक्षेप आहे. शेतकºयांच्या जमिनी जाणार असल्याने त्यांना प्रकल्पाची माहिती देण्यासाठी प्रांत अधिकारी संतोष थिटे यांनी अंजूरफाटा येथे हालारी विशा ओसवाल सभागृहात नुकतीच विशेष बैठक बोलावली होती. या प्रसंगी प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक यू. पी. सिंग, स्थापत्य व्यवस्थापक ए. के. नायक, खासदार कपिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य कुंदन पाटील, देवेश पाटील, जयवंत पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र डाकी, विकास भोईर, तहसीलदार शशिकांत गायकवाड, गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. या बुलेट ट्रेन प्रकल्पात भिवंडी तालुक्यातील दिवे-अंजूर, कशेळी, काल्हेर, पूर्णा, कोपर, केवणी, खारबाव, मालोडी, पायगाव, पाये या गावांचा समावेश आहे. त्यासाठी सुमारे २६ .७६४६ हेक्टर जमिनीतील १५५ प्लॉट अधिग्रहित केले आहेत. तसेच या रेल्वेच्या डेपोसाठी भरोडी, अंजूर, सारंग, सुरई, माणकोली, दापोडी, वेहळे या सात गावातील ८५.०४६१ हेक्टर जमिनीतील ८५ प्लॉट बाधित होणार आहेत.भिवंडी तालुक्यात विविध प्रकल्पासाठी सरकारने शेतकºयांच्या जमिनी घेण्याचा सपाटा लावला आहे. शेतकºयांना योग्य भाव, भरपाई मिळत नाही. काही ठिकाणी अन्यायाने जागा घेतल्या जात आहेत. पूर्वी रेल्वेसाठी घेतलेल्या जागेबाबत शासनाने ठोस भूमिका न घेतल्याने शेतकºयांमध्ये नाराजी पसरलेली आहे. त्यातच आधी भूमीपुजन करून नंतर खाजगी व्यावसायिकांच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भिवंडी तालुक्यातून वळविल्याचा आरोप शेतकºयांनी केला आणि या प्रकल्पाला विरोध केला. तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनी वेळोवेळी विविध प्रकल्पांसाठी घेऊन शेतकºयांना आजपर्यंत पुरेसा मोबदला दिलेला नाही. त्यामुळे सरकारी अधिकाºयांच्या आताच्या भरपाईच्या आश्वासनावर विश्वास नसल्याची भावना जमीनमालकांनी व्यक्त केली.बाधित होणाºया शेवटच्या शेतकºयाचे समाधान होत नाही, तोपर्यंत शेतकरी प्रकल्पाला जमिनी देण्यास पुढे येणार नाहीत, असे खासदार कपिल पाटील यांनी सरकारी प्रतिनिधींना सांगितले.मी शेतकºयांसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी या प्रकल्पात ज्यांची घरे, गोदामे, बाधित होणार आहेत, त्यांना भरपाई दिली जाणार असल्याची माहिती दिली. त्यासोबत जमिनीची बाजारभाव ठरविताना चालू वर्षातील रेडीरेकनरचा दर प्रमाणभूत मानला जाणार असल्याची माहिती दिली.कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून बैठकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन