शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
2
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
3
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
6
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
7
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
8
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
9
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
10
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
11
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
12
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
13
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
14
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
15
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
16
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
17
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
18
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
19
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
20
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
Daily Top 2Weekly Top 5

‘बुलेट ट्रेन फेक दो’च्या घोषणांचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 04:48 IST

बुलेट ट्रेन पर्यावरण, भूगर्र्भातील जीवितांसाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांकरिता घातक असल्याने

ठाणे : बुलेट ट्रेन पर्यावरण, भूगर्र्भातील जीवितांसाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांकरिता घातक असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातून बुलेट ट्रेन जाऊ देणार नसल्याचा निर्धार मंगळवारी शेतकºयांनी बुलेट ट्रेनच्या पर्यावरणीय जनसल्लासमलत बैठकीत व्यक्त केला. ‘फेक दो, फेक दो, बुलेट ट्रेन फेक दो’ अशा घोषणा देत बैठकीत शेतकºयांनी काही काळ गोंधळ घातला.मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी जिल्ह्यातील १९ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. तत्पूर्वी बुलेट ट्रेन पर्यावरणाकरिता घातक असल्याच्या चर्चेला वेग आल्याने या ट्रेनमुळे पर्यावरणाला बाधा होणार नाही, हे पटवून देण्याकरिता ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हादंडाधिकारी शिवाजी पाटील होते. बुलेट ट्रेनचे मुख्य प्रकल्प अधिकारी यू. पी. सिंग, प्रकल्प अधिकारी आर. पी. सिंग, पर्यावरण विषयक अभ्यासक आदींसह इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते. या बैठकीला म्हणावी तेवढीगर्दी झाली नाही. शेतकºयांना या बैठकीची पूर्वसूचना न मिळाल्याने ते उपस्थित नव्हते, असे काहींनी सांगितले. तर मुळात बुलेट ट्रेनला विरोध असल्याने तिकडे फिरकायचेच कशाला, असा विचार शेतकºयांनी केला असल्याचे काहींचे म्हणणेहोते.बैठकीत बुलेट ट्रेनमुळे पर्यावरण विषयक हानी होणार नसल्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर प्रश्नोत्तरांच्या तासाला उपस्थितांनी अधिकाºयांवर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. बुलेट ट्रेनमुळे पर्यावरणाची हानी होणार नाही हा दावा पटत नाही, भूमिगत ट्रेनमुळे खाडीतील जनजीवनही विस्कळीत होणार आहे, परदेशी फ्लेमिंगोंना याचा त्रास होणार आहे, कांदळवनाची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे, कांदळवनाची हानी झाल्यानंतर त्याची लागवड पुन्हा करता येत नाही, हे सिद्ध झाले आहे, येथील स्थानिक आगरी, कोळी आणि भूमिपुत्रांची आर्थिक हानी होणार असल्याचे मत शेतकºयांनी व्यक्त केले. जमिनीचा सर्व्हे करताना शेतकºयांना विश्वासात घेतले गेले नाही, साध्या नोटिसा देण्याचे सौजन्य शासनाने दाखवले नाही. एवढ्या मोठ्या प्रकल्पाबाबत अशी दडवादडवी का केली जातेय? जबरदस्तीने शेतकºयांच्या जमिनींची मोजणी करण्यात आली, असे नाना सवाल उपस्थित करून शेतकºयांनी प्रशासकीय अधिकाºयांना सळो की पळो करून सोडले. \शासकीय अधिकाºयांची या प्रश्नांना उत्तर देताना दमछाक झाली. अखेरीस तुम्ही तुमच्या सूचना, हरकती लेखी स्वरूपात कळवू शकता, पुढील महिनाभरात तुम्ही तुमच्या सूचना नोंदवा, असे म्हणत अधिकाºयांनी आपली सुटका करून घेतली. आम्हाला बुलेट ट्रेन नकोच आहे. ज्या गावाला जायचेच नाही, त्या गावाची माहिती तरी कशाला घ्यायची, असे उच्चरवात सांगत काही शेतकºयांनी हरकती व सूचना दाखल करण्यास विरोध केला.केवळ एका माणसाच्या अट्टाहासापायी हा आटापिटा सुरू असल्याचा टोला शेतकºयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता लगावला. शेतकरी व पर्यावरणविषयक कार्यकर्त्यांच्या काही अभ्यासपूर्ण प्रश्नांची उत्तरे अधिकाºयांना देता आली नाहीत.अखेरीस शेतकºयांनी ‘फेक दो, फेक दो, बुलेट ट्रेन फेक दो’ अशा घोषणा करीत, या प्रकल्पाला आमचा १०० टक्के विरोध असल्याचे जाहीर केले. काही शेतकरी सुनावणीनंतरही अधिकाºयांशी हुज्जत घालत होते. तुम्ही कितीही जनसुनावणी घेतल्या तरी आमचा विरोध कायम असेल, असा इशारा या वेळी शेतकºयांनी अधिकाºयांना दिला.