शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

संवादाचे पूल बांधू या! प्रबोधन पुरस्कार वितरण कार्यक्रमात मान्यवरांची अपेक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 15:15 IST

प्रबोधन पुरस्कार वितरण कार्यक्रमात संवादाचे पूल बांधू या! अशी अपेक्षा मान्यवरांनी केली.

ठळक मुद्देसंवादाचे पूल बांधू या! मान्यवरांची अपेक्षा!"केल्याने भाषांतर" या त्रैमासिकाला प्रबोधन पुरस्कारभाषांतर ही भाषेची तोड मोड नाही तर एक संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडण्याची कला - रामदास भटकळ

ठाणे : वी नीड यू सोसायटी या ठाणे व नवी मुंबईत शैक्षणिक व सामाजिक काम करणाऱ्या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या 'प्रबोधन पुरस्कार' वितरण कार्यक्रम ठाणे कॉलेजच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात झाला. संस्थे तर्फे गेली वीस वर्षे परदेशी भाषांतील साहित्य मराठीत भाषांतरीत करून पाश्चिमात्य साहित्य व संस्कृतीचा परिचय करून देणाऱ्या "केल्याने भाषांतर" या त्रैमासिकाला देण्यात आला. 

             या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ हे होते. प्रबोधन पुरस्कार हा एक लाख रुपये व मानचिन्ह असा असून तो रामदास भटकळ यांनी संपादिका सुनंदा महाजन व अनघा भट यांना दिला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सुनंदा महाजन व अनघा भट यांनी हा भाषांतराचा घाट मराठी समाज अधिक समृद्ध होण्यासाठी दिवंगत विद्यासागर महाजन यांनी सुरू केला. गेली वीस वर्षे तो अथकपणे सुरू आहे. छोट्या नियतकालिकांना ज्या अडचणींना सामोरे जावे त्या सर्व अडचणी आम्हालाही आहेतच. पण याचे जे नियमित वाचक आहेत त्यांचा कायम पाठिंबा व सूचना तसेच सकारात्मक अभिप्राय ही आमची ताकद वाढवणाऱ्या आहेत. असे संवादाचे पूल बांधणे व ते मजबूत करणे याची गरज सार्वत्रिक आहे. भाषांतरात अनेक वेळा मराठीपण हवे असे सांगितले गेले पण ज्या परदेशी भाषा व संस्कृतीची पृष्टभुमी त्या कथेला आहे, तीचा परिचय मराठी समाजास होणे हे जास्त महत्वाचे आम्ही मानतो. या करता भाषेची तोडमोडही करावी लागते पण ती गरजेची असते. असे पुरस्कार मिळणे हे आमची उमेद वाढवणारे आहेच, त्या निमित्ताने आमचाही परीघ वाढतो ते ही गरजेचे आहे. संस्थेच्या लोगो नुसार एकमेकांच्या हातात हात घालून हा प्रवास अधिक वृद्धिंगत होईल अशी आशा आहे.

           ज्येष्ठ प्रकाशक व लेखक रामदास भटकळ यांनी सुरवातीलाच मी केवळ शुभेच्छा देण्यासाठी आलो नसून आभार व्यक्त करायला आलो आहे. केल्याने भाषांतर व वी नीड यू या दोन्ही संस्था जे काम करत आहेत ते अत्यंत महत्वाचे व दूरगामी परिणाम करणारे आहे. अनुवाद हे कार्य केवळ तुम्हाला अन्य भाषा येतात म्हणून करता येणारे शास्त्र नाही. त्याच्या करता आंतरिक इच्छा व ओढ लागते. नेमका आशय समजावा लागतो. त्यामुळे केलेल्या भाषांतराची स्क्रूटिनी महत्वाची असते. यामुळे चुकीचे भाषांतर होत नाही किंवा ते सुधारणे शक्य होते. उदा. गिरीश कर्नाड यांच्या एका पुस्तकाचे भाषांतर करताना कॅटरॅक्ट या शब्दाचे भाषांतर मोतीबिंदू केले पण आशयानुसार ते 'धबधबा' असायला हवे होते. ही काळजी घेणे जरुरीचे आहे.  भाषांतर ही भाषेची तोड मोड नाही तर एक संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडण्याची कला आहे. म्हणून एका अर्थाने ते वाढवणे आहे, हे आपण समजून घ्यावे. देश स्वतंत्र झाल्यावर सर्व विद्यापीठे, प्राध्यापक, लेखक यांनी भाषांतराचे कार्य सुरू केले असते तर आजचा भारत वेगळा असता. आपल्याकडे साने गुरुजींनी अनेक उत्तम ग्रंथ व साहित्याचा सहज सोपा अनुवाद केला आहे. यावर किमान तीन ते चार पिढ्या समृद्ध झल्या आहेत. याच हेतूने साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाने आंतर भारती अनुवाद सुविधा केंद्र सुरू केले आहे. ही कामे वाढवीत अशी केवळ इच्छा नाही तर यात सहभागी होण्याचे प्रयत्न सर्वांनी करणे गरजेचे आहे.

        या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी एका फ्रेंच कथेचे, श्रीरंग खरावकर यांनी मेक्सिकन व वासंती वर्तक व या दोन्ही मान्यवरांनी एकत्रीत एका जर्मन कथेचे अभिवाचन सादर केले तर गेल्या वर्षीचा पहिला पुरस्कार ज्या परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षीकाच्या संपादक मंडळ सदस्या प्रज्ञा दया पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्या म्हणाल्या वाटसरू हे परिघावरील व त्या बाहेर असलेल्या समाजाबद्दल लिहीत असतो,  भाषांतर हा ही तसाच बाहेरचा परिघ आहे. त्यास सन्मानीत केले जात आहे, हे नक्कीच स्फूर्तिदायक आहे. केल्याने भाषांतर या त्रैमासिकाचा परिचय नचिकेत कुलकर्णी यांनी, वी नीड यू च्या कार्याचा परिचय संजीव साने, पुरस्काराची भूमिका जयंत कुलकर्णी व कार्यक्रमाचे सहज व सुंदर सूत्रसंचालन डॉ.मृण्मयी भजक यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक