शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
5
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
6
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
7
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
8
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
9
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
10
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
11
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
12
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
13
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
14
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
15
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
16
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
17
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
18
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
19
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
20
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!

हे तर १०५६ कोटी तुटीचे अंदाजपत्रक

By admin | Updated: March 31, 2017 05:57 IST

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी २४ लाख रुपये शिलकीचे ३३९०.७८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर

नारायण जाधव / ठाणेठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी २४ लाख रुपये शिलकीचे ३३९०.७८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत ९०७.५७ कोटी रुपयांनी जास्त असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात हे अंदाजपत्रक तब्बल १०५५ कोटी ७६ लाख रुपयांचे तुटीचे आहे.मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यंदा वास्तववादी अंदाजपत्रक सादर करताना तो गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ हजार कोटींहून अधिक कमी रकमेचा दाखवला आहे. मात्र, इकडे ठाण्यात सुमारे ३३९०.७८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करताना आयुक्तांनी महापालिकेचे उत्पन्न २३३३.९२ कोटी रुपये प्रस्तावित केले आहे. शिवाय, अनुदाने २३२.८६ कोटी रुपये, तर कर्ज, कर्जरोख्यांपासून ५३५ कोटी रुपये आणि आरंभीची शिल्लक २८९ कोटी रुपये दाखवली आहे.अर्थशास्त्रीय भाषेत आंरभीची शिल्लक ही उत्पन्न होऊ शकत नाही. उलट, इतकी रक्कम खर्च न होता ती कशी काय शिल्लक राहिली, याचे उत्तर अंदाजपत्रक सादर करताना आयुक्तांनी देणे अपेक्षित होते. शासनाकडून मिळणारी अनुदाने ही जरतरची बाब असतात. ती कधी मिळतात, तर कधी मिळतच नाही. काही वेळेला मिळाली तरी पुरेशी मिळत नाहीत. तसेच ती महापालिकेच्या उत्पन्न स्रोतापासून मिळालेली नसतात. यामुळे ती उत्पन्न म्हणून गृहीत धरता येऊ शकत नाहीत. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे यंदाच्या अंदाजपत्रकात आयुक्तांनी लेखाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून कर्ज, कर्जरोख्यांपासूनच्या ५३५ कोटी रुपयांच्या रकमेचाही उत्पन्नात समावेश केला आहे. कर्ज हे उत्पन्न कसे काय असू शकते, ते तर फेडावेच लागते. शिवाय, ते मिळेलच याची आताच कुणी शाश्वती देऊ शकत नाही. याचा विचारही यंदाचे अंदाजपत्रक सादर करताना आयुक्तांनी केलेला दिसत नाही.याशिवाय, अपंग कल्याणासाठी ३ टक्के रक्कम आरक्षित ठेवणे आवश्यक असून ती पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचवलेल्या कामांवर खर्च करणे बंधनकारक आहे. गेल्या वर्षात असे कुठेच दिसले नाही. या अंदाजपत्रकात त्याचे स्पष्ट चित्र उमटलेले नाही. असाच प्रकार महिला-बालकल्याणासाठीच्या निधीच्या बाबतीतही दिसत आहे.आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे जीएसटी विधेयक संसदेत मंजूर झाले असून जुलैपासून एकच कर लागू होणार आहे. यामुळे स्थानिक संस्थाकर कालबाह्य होणार आहेत. सध्याचे अनुदान राज्य शासन देते. त्याचे अधिकार राज्य शासनास असूनही या अंदाजपत्रकात आपण तो वाढवलेला नाही, असे सांगून व्यापाऱ्यांना दिलासा दिल्याचे भासवण्यात आले आहे. मात्र, जुलैनंतरच त्याचे खरे स्वरूप दिसणार आहे.