शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

हे तर १०५६ कोटी तुटीचे अंदाजपत्रक

By admin | Updated: March 31, 2017 05:57 IST

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी २४ लाख रुपये शिलकीचे ३३९०.७८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर

नारायण जाधव / ठाणेठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी २४ लाख रुपये शिलकीचे ३३९०.७८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत ९०७.५७ कोटी रुपयांनी जास्त असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात हे अंदाजपत्रक तब्बल १०५५ कोटी ७६ लाख रुपयांचे तुटीचे आहे.मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यंदा वास्तववादी अंदाजपत्रक सादर करताना तो गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ हजार कोटींहून अधिक कमी रकमेचा दाखवला आहे. मात्र, इकडे ठाण्यात सुमारे ३३९०.७८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करताना आयुक्तांनी महापालिकेचे उत्पन्न २३३३.९२ कोटी रुपये प्रस्तावित केले आहे. शिवाय, अनुदाने २३२.८६ कोटी रुपये, तर कर्ज, कर्जरोख्यांपासून ५३५ कोटी रुपये आणि आरंभीची शिल्लक २८९ कोटी रुपये दाखवली आहे.अर्थशास्त्रीय भाषेत आंरभीची शिल्लक ही उत्पन्न होऊ शकत नाही. उलट, इतकी रक्कम खर्च न होता ती कशी काय शिल्लक राहिली, याचे उत्तर अंदाजपत्रक सादर करताना आयुक्तांनी देणे अपेक्षित होते. शासनाकडून मिळणारी अनुदाने ही जरतरची बाब असतात. ती कधी मिळतात, तर कधी मिळतच नाही. काही वेळेला मिळाली तरी पुरेशी मिळत नाहीत. तसेच ती महापालिकेच्या उत्पन्न स्रोतापासून मिळालेली नसतात. यामुळे ती उत्पन्न म्हणून गृहीत धरता येऊ शकत नाहीत. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे यंदाच्या अंदाजपत्रकात आयुक्तांनी लेखाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून कर्ज, कर्जरोख्यांपासूनच्या ५३५ कोटी रुपयांच्या रकमेचाही उत्पन्नात समावेश केला आहे. कर्ज हे उत्पन्न कसे काय असू शकते, ते तर फेडावेच लागते. शिवाय, ते मिळेलच याची आताच कुणी शाश्वती देऊ शकत नाही. याचा विचारही यंदाचे अंदाजपत्रक सादर करताना आयुक्तांनी केलेला दिसत नाही.याशिवाय, अपंग कल्याणासाठी ३ टक्के रक्कम आरक्षित ठेवणे आवश्यक असून ती पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचवलेल्या कामांवर खर्च करणे बंधनकारक आहे. गेल्या वर्षात असे कुठेच दिसले नाही. या अंदाजपत्रकात त्याचे स्पष्ट चित्र उमटलेले नाही. असाच प्रकार महिला-बालकल्याणासाठीच्या निधीच्या बाबतीतही दिसत आहे.आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे जीएसटी विधेयक संसदेत मंजूर झाले असून जुलैपासून एकच कर लागू होणार आहे. यामुळे स्थानिक संस्थाकर कालबाह्य होणार आहेत. सध्याचे अनुदान राज्य शासन देते. त्याचे अधिकार राज्य शासनास असूनही या अंदाजपत्रकात आपण तो वाढवलेला नाही, असे सांगून व्यापाऱ्यांना दिलासा दिल्याचे भासवण्यात आले आहे. मात्र, जुलैनंतरच त्याचे खरे स्वरूप दिसणार आहे.