शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

 समाजातील भावंडभाव हे साहित्यातून येण्याचा आग्रह आहे - रविंद्र गोळे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 17, 2023 16:54 IST

साहित्यिकातील कार्यकर्ता भाव जागरुक राहिला तर समाजाचे निरीक्षण आत्मियतेने करु शकतो.

ठाणे : साहित्यिकातील कार्यकर्ता भाव जागरुक राहिला तर समाजाचे निरीक्षण आत्मियतेने करु शकतो. जीवनाचे संदर्भ लक्षात घ्यावे लागतील. या संदर्भाने सगळ्यांना जोडून घेण्याची भूमिका राहिली पाहिजे. तुटण्याची वेळ येऊ नये. यासाठी आत्मियतता, प्रेम यांचा आधार घ्यावा लागेल. समाजातील भावंडभाव हे साहित्यातून येण्याचा आग्रह आहे. समाज शक्तीशाली झाला तर राष्ट्रांतर्गत येणारे आव्हाने परतवू लावू शकू. मात्र ती संकटे दूर करण्यासाठी साहित्य या आयुधाचा वापर करताना राष्ट्रभाव आणि बंधुभाव प्रथम याचा विचार करावा लागेल. तसेच, आपल्याला भविष्यात कुठे जायचे याचा विचार साहित्यातून करावा लागेल असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, कोकण प्रांताच्यावतीने आयोजित 'प्रादेशिक साहित्यातील राष्ट्रीयत्व' या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गोळे यांनी केले.

रविवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे 'म.पां.भावे साहित्य नगरीत साहित्यातील राष्ट्रीयत्वाचा जागर झाला. यावेळी गोळे म्हणाले, शेवटी साहित्य हे भावभावनांचा अविष्कार असतात. बदलत्या समाजाचे प्रतिबिंब साहित्यात यावे. समाजाच्या बदलाचा वेग, स्पंदने साहित्याता कसा करावा याचा विचार करावा लागेल ते करताना आपल्या समोरच्या आव्हानांचा विचार करावा लागेल असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील म्हणाले की, स्मार्ट फोन मुळे वाचन संस्कृती मागे पडली आहे. लहान मुलांच्या हातून आपल्याला फोन काढून घ्यावा लागेल. जुन्या नव्या लेखकांचे शब्द वाचकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर पुन्हा पुस्तके हाती आली पाहिजे. यावेळी प्रांतअध्यक्ष दुर्गेश सोनार, पद्मश्री रमेश पतंगे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविंद्र प्रभुदेसाई, अ. भा. साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक साहित्य भारती, कोकण प्रांतचे कार्याध्यक्ष प्रविण देशमुख, प्रांतमंत्री संजय द्विवेदी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे