शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

उल्हासनगर वालधुनी नदीवरील पूलाचे काम नवीन वर्षात 

By सदानंद नाईक | Updated: November 7, 2022 17:43 IST

पुलापूर्वी तेथील मुख्य जलवाहिनी डिसेंबर महिन्यात हटविण्यात येणार आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या एकमेव वालधुनी नदीवरील पुलाला नवीन वर्षात मुहूर्त मिळणार असल्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले. पुलापूर्वी तेथील मुख्य जलवाहिनी डिसेंबर महिन्यात हटविण्यात येणार आहे.

उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जाण्यासाठी असणारा एकमेव वालधुनी नदीवरील पूल जीर्ण झाल्याने, तो पाडण्यात आला. त्याजागी नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपूर्वी मंजूर होऊनही प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू झाले नाही. या निषेधार्थ समाजसेवक शिवाजी रगडे, माजी नगरसेवक गजानन शेळके, सविता रगडे-तोरणे आदींनी माजी आमदार पप्पु कलानी, युवानेते कमलेश निकम यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात आंदोलन केले. तसेच मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनीही आंदोलन केल्यावर, महापालिकेला जाग आली. वालधुनी नदीवरील जुन्या पुला शेजारी जलवाहिनी आहे. नवीन पूल बांधण्यापूर्वी तेथील जलवाहिनी हटविण्याचे काम डिसेंबर महिन्यात करण्यात येईल. असे कारण महापालिकेच्या वतीने देण्यात आले. जलवाहिनीचे काम झाल्या शिवाय नवीन पुलाला मुहूर्त लागणार नसल्याचे यामुळे उघड झाले.

रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जोडणाऱ्या वालधुनी नदी पुलाची आवश्यकता असून नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी जुना पूल पाडण्यात येऊन नवीन पूल बांधणीला मुहूर्त लागत नसल्याने, नागरिकांत असंतोष आहे. यातूनच मनसेसह समाजसेवक शिवाजी रगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाली. अखेर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी नदीवरील जुन्या पुला शेजारील जलवाहिनी हटविण्याचे काम डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचे सांगितले. म्हणजे सन २०२३ या नवीन वर्षात पुलाच्या कामाचा मुहूर्त लागण्याचे संकेत दिले. पावसाळ्या पूर्वी पुलाचे काम न झाल्यास, नागरिकांचे हाल होणार आहे. मनसे व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी मात्र जलवाहिनी बरोबरच पुलाचे काम सुरू केल्यास, पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम होणार असल्याचे म्हणणे आहे. एकूणच पुलाचे काम रेंगाळणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. 

अरुंद पुलावरील वाहतूक धोकादायक

रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे वाहने जाणाऱ्या एकमेव वालधुनी नदीवरील जुना पूल पडल्याने, रिक्षा चालक व मोटरसायकलस्वार सीएचएम कॉलेजकडे जाणाऱ्या अरुंद नदीवरील पुलाचा वापर करीत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत असून पुलावरून येणारी वाहतूक थांबविण्याची मागणी होत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर