शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

उल्हासनगर वालधुनी नदीवरील पूलाचे काम नवीन वर्षात 

By सदानंद नाईक | Updated: November 7, 2022 17:43 IST

पुलापूर्वी तेथील मुख्य जलवाहिनी डिसेंबर महिन्यात हटविण्यात येणार आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या एकमेव वालधुनी नदीवरील पुलाला नवीन वर्षात मुहूर्त मिळणार असल्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले. पुलापूर्वी तेथील मुख्य जलवाहिनी डिसेंबर महिन्यात हटविण्यात येणार आहे.

उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जाण्यासाठी असणारा एकमेव वालधुनी नदीवरील पूल जीर्ण झाल्याने, तो पाडण्यात आला. त्याजागी नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपूर्वी मंजूर होऊनही प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू झाले नाही. या निषेधार्थ समाजसेवक शिवाजी रगडे, माजी नगरसेवक गजानन शेळके, सविता रगडे-तोरणे आदींनी माजी आमदार पप्पु कलानी, युवानेते कमलेश निकम यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात आंदोलन केले. तसेच मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनीही आंदोलन केल्यावर, महापालिकेला जाग आली. वालधुनी नदीवरील जुन्या पुला शेजारी जलवाहिनी आहे. नवीन पूल बांधण्यापूर्वी तेथील जलवाहिनी हटविण्याचे काम डिसेंबर महिन्यात करण्यात येईल. असे कारण महापालिकेच्या वतीने देण्यात आले. जलवाहिनीचे काम झाल्या शिवाय नवीन पुलाला मुहूर्त लागणार नसल्याचे यामुळे उघड झाले.

रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जोडणाऱ्या वालधुनी नदी पुलाची आवश्यकता असून नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी जुना पूल पाडण्यात येऊन नवीन पूल बांधणीला मुहूर्त लागत नसल्याने, नागरिकांत असंतोष आहे. यातूनच मनसेसह समाजसेवक शिवाजी रगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाली. अखेर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी नदीवरील जुन्या पुला शेजारील जलवाहिनी हटविण्याचे काम डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचे सांगितले. म्हणजे सन २०२३ या नवीन वर्षात पुलाच्या कामाचा मुहूर्त लागण्याचे संकेत दिले. पावसाळ्या पूर्वी पुलाचे काम न झाल्यास, नागरिकांचे हाल होणार आहे. मनसे व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी मात्र जलवाहिनी बरोबरच पुलाचे काम सुरू केल्यास, पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम होणार असल्याचे म्हणणे आहे. एकूणच पुलाचे काम रेंगाळणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. 

अरुंद पुलावरील वाहतूक धोकादायक

रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे वाहने जाणाऱ्या एकमेव वालधुनी नदीवरील जुना पूल पडल्याने, रिक्षा चालक व मोटरसायकलस्वार सीएचएम कॉलेजकडे जाणाऱ्या अरुंद नदीवरील पुलाचा वापर करीत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत असून पुलावरून येणारी वाहतूक थांबविण्याची मागणी होत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर