शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर वालधुनी नदीवरील पूलाचे काम नवीन वर्षात 

By सदानंद नाईक | Updated: November 7, 2022 17:43 IST

पुलापूर्वी तेथील मुख्य जलवाहिनी डिसेंबर महिन्यात हटविण्यात येणार आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या एकमेव वालधुनी नदीवरील पुलाला नवीन वर्षात मुहूर्त मिळणार असल्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले. पुलापूर्वी तेथील मुख्य जलवाहिनी डिसेंबर महिन्यात हटविण्यात येणार आहे.

उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जाण्यासाठी असणारा एकमेव वालधुनी नदीवरील पूल जीर्ण झाल्याने, तो पाडण्यात आला. त्याजागी नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपूर्वी मंजूर होऊनही प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू झाले नाही. या निषेधार्थ समाजसेवक शिवाजी रगडे, माजी नगरसेवक गजानन शेळके, सविता रगडे-तोरणे आदींनी माजी आमदार पप्पु कलानी, युवानेते कमलेश निकम यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात आंदोलन केले. तसेच मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनीही आंदोलन केल्यावर, महापालिकेला जाग आली. वालधुनी नदीवरील जुन्या पुला शेजारी जलवाहिनी आहे. नवीन पूल बांधण्यापूर्वी तेथील जलवाहिनी हटविण्याचे काम डिसेंबर महिन्यात करण्यात येईल. असे कारण महापालिकेच्या वतीने देण्यात आले. जलवाहिनीचे काम झाल्या शिवाय नवीन पुलाला मुहूर्त लागणार नसल्याचे यामुळे उघड झाले.

रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जोडणाऱ्या वालधुनी नदी पुलाची आवश्यकता असून नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी जुना पूल पाडण्यात येऊन नवीन पूल बांधणीला मुहूर्त लागत नसल्याने, नागरिकांत असंतोष आहे. यातूनच मनसेसह समाजसेवक शिवाजी रगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाली. अखेर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी नदीवरील जुन्या पुला शेजारील जलवाहिनी हटविण्याचे काम डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचे सांगितले. म्हणजे सन २०२३ या नवीन वर्षात पुलाच्या कामाचा मुहूर्त लागण्याचे संकेत दिले. पावसाळ्या पूर्वी पुलाचे काम न झाल्यास, नागरिकांचे हाल होणार आहे. मनसे व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी मात्र जलवाहिनी बरोबरच पुलाचे काम सुरू केल्यास, पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम होणार असल्याचे म्हणणे आहे. एकूणच पुलाचे काम रेंगाळणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. 

अरुंद पुलावरील वाहतूक धोकादायक

रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे वाहने जाणाऱ्या एकमेव वालधुनी नदीवरील जुना पूल पडल्याने, रिक्षा चालक व मोटरसायकलस्वार सीएचएम कॉलेजकडे जाणाऱ्या अरुंद नदीवरील पुलाचा वापर करीत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत असून पुलावरून येणारी वाहतूक थांबविण्याची मागणी होत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर