शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

पूल तोडल्याने होते प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:36 IST

आसनगाव स्थानकातील परिस्थिती; जुन्या पुलाच्याच जागी नवीन पूल बांधण्याची मागणी

आसनगाव : रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि उपनगरांतील स्थानकांमध्ये झालेल्या पूल दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जीर्ण झालेल्या पुलांच्या जागी नवीन पुलांची उभारणी सुरू केली आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा स्थानकांदरम्यानच्या आसनगाव स्थानकातील ब्रिटिशकालीन जुना पूल सुरक्षेच्या कारणास्तव तोडला आहे. मात्र, त्या जागी नवीन पुलाचे कोणतेही नियोजन नसताना जुना पूल तोडल्याने पूर्वेकडील हजारो प्रवाशांची विशेषत: वृद्ध, अपंग, शाळकरी मुलांची स्थानक आणि फलाट गाठताना मोठी दमछाक होते आहे. त्यामुळे जुन्या पुलाच्याच जागी नवीन पूल बांधावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.काही रेल्वेस्थानकांबाहेरील पादचारी पूल कोसळण्याच्या घटनेनंतर धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारादरम्यान असलेल्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी शहापूर तालुक्यातील पहिलेवहिले ‘ग्रीन स्थानक’ म्हणून घोषित झालेल्या आसनगाव रेल्वेस्थानकातील कसारा बाजूकडील जीर्ण झालेला ब्रिटिशकालीन पूल सुरक्षेच्या कारणास्तव तोडण्यात आला आहे. मात्र, त्या जागी नवीन पुलाचा कोणताही प्रस्ताव वा नियोजन नसताना जुना पूल तोडल्याने पूर्वेकडील हजारो प्रवाशांची विशेषत: वृद्ध, अपंग, शाळकरी मुलांची स्थानक गाठताना मोठी दमछाक होत आहे.आसनगाव रेल्वेस्थानकातून दररोज ९० हजार प्रवासी विविध कामांसाठी कल्याण-ठाणे-मुंबईकडे प्रवास करतात. ग्रामीण भाग असल्याने भाजीपालाविक्रेते, दूधविक्रेते, चाकरमानी ठाणे-कल्याणला जातात. मात्र, शहापूरकडून आसनगाव स्थानकाकडे येताना प्रवाशांना फलाट गाठण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागते आहे. पर्यायी मार्ग म्हणून आसनगाव स्थानकात नव्याने बांधण्यात आलेल्या मध्यवर्ती ठिकाणचा मोठा पूल हा जास्त उंचीचा असून तो चढताना विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, रु ग्ण, शेतकरी, चाकरमानी, दुग्ध व्यावसायिक, मालवाहतूक करणारे प्रवासी यांना मनस्ताप सहन करावा लागतो.या नवीन पुलाला पूर्वेकडे स्वयंचलित जिना (एस्कलेटर) असणे गरजेचे असताना येथे ही सोय उपलब्ध करण्यात आलेली नाही. यामुळे प्रवासी हतबल झाले आहेत. तसेच सदर पर्यायी पूल हा रिक्षा स्टॅण्ड तसेच पार्र्किं गच्या ठिकाणापासून बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे प्रवाशांना दुसरा पर्यायच नाही. परिणामी, निम्म्याहून अधिक प्रवासी शॉर्टकटचा अवलंब करून आपला जीव धोक्यात घालून रूळ ओलांडत फलाट गाठताना दिसतात. त्यामुळे मध्य रेल्वेने जुना पूल तोडला असला, तरी जुन्या ठिकाणीच नवीन पूल बांधण्याचे काम ताबडतोब सुरू करावे. तर रेल्वे प्रशासनाने आधी नवीन पूल उभारून नंतरच जुना पूल तोडायला हवा होता, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.जुना पूल तोडण्यापूर्वी आम्ही एक नवीन पूल कल्याण दिशेला २०१८ मध्ये बनवला असून दुसरा पूल कसारा दिशेला रेल्वे कॉलनीकडे आहे. सध्याच्या परिस्थितीत असे दोन पूल आसनगाव स्थानकात आहेत.- अनिलकुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे