शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पूल तोडल्याने होते प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:36 IST

आसनगाव स्थानकातील परिस्थिती; जुन्या पुलाच्याच जागी नवीन पूल बांधण्याची मागणी

आसनगाव : रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि उपनगरांतील स्थानकांमध्ये झालेल्या पूल दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जीर्ण झालेल्या पुलांच्या जागी नवीन पुलांची उभारणी सुरू केली आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा स्थानकांदरम्यानच्या आसनगाव स्थानकातील ब्रिटिशकालीन जुना पूल सुरक्षेच्या कारणास्तव तोडला आहे. मात्र, त्या जागी नवीन पुलाचे कोणतेही नियोजन नसताना जुना पूल तोडल्याने पूर्वेकडील हजारो प्रवाशांची विशेषत: वृद्ध, अपंग, शाळकरी मुलांची स्थानक आणि फलाट गाठताना मोठी दमछाक होते आहे. त्यामुळे जुन्या पुलाच्याच जागी नवीन पूल बांधावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.काही रेल्वेस्थानकांबाहेरील पादचारी पूल कोसळण्याच्या घटनेनंतर धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारादरम्यान असलेल्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी शहापूर तालुक्यातील पहिलेवहिले ‘ग्रीन स्थानक’ म्हणून घोषित झालेल्या आसनगाव रेल्वेस्थानकातील कसारा बाजूकडील जीर्ण झालेला ब्रिटिशकालीन पूल सुरक्षेच्या कारणास्तव तोडण्यात आला आहे. मात्र, त्या जागी नवीन पुलाचा कोणताही प्रस्ताव वा नियोजन नसताना जुना पूल तोडल्याने पूर्वेकडील हजारो प्रवाशांची विशेषत: वृद्ध, अपंग, शाळकरी मुलांची स्थानक गाठताना मोठी दमछाक होत आहे.आसनगाव रेल्वेस्थानकातून दररोज ९० हजार प्रवासी विविध कामांसाठी कल्याण-ठाणे-मुंबईकडे प्रवास करतात. ग्रामीण भाग असल्याने भाजीपालाविक्रेते, दूधविक्रेते, चाकरमानी ठाणे-कल्याणला जातात. मात्र, शहापूरकडून आसनगाव स्थानकाकडे येताना प्रवाशांना फलाट गाठण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागते आहे. पर्यायी मार्ग म्हणून आसनगाव स्थानकात नव्याने बांधण्यात आलेल्या मध्यवर्ती ठिकाणचा मोठा पूल हा जास्त उंचीचा असून तो चढताना विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, रु ग्ण, शेतकरी, चाकरमानी, दुग्ध व्यावसायिक, मालवाहतूक करणारे प्रवासी यांना मनस्ताप सहन करावा लागतो.या नवीन पुलाला पूर्वेकडे स्वयंचलित जिना (एस्कलेटर) असणे गरजेचे असताना येथे ही सोय उपलब्ध करण्यात आलेली नाही. यामुळे प्रवासी हतबल झाले आहेत. तसेच सदर पर्यायी पूल हा रिक्षा स्टॅण्ड तसेच पार्र्किं गच्या ठिकाणापासून बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे प्रवाशांना दुसरा पर्यायच नाही. परिणामी, निम्म्याहून अधिक प्रवासी शॉर्टकटचा अवलंब करून आपला जीव धोक्यात घालून रूळ ओलांडत फलाट गाठताना दिसतात. त्यामुळे मध्य रेल्वेने जुना पूल तोडला असला, तरी जुन्या ठिकाणीच नवीन पूल बांधण्याचे काम ताबडतोब सुरू करावे. तर रेल्वे प्रशासनाने आधी नवीन पूल उभारून नंतरच जुना पूल तोडायला हवा होता, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.जुना पूल तोडण्यापूर्वी आम्ही एक नवीन पूल कल्याण दिशेला २०१८ मध्ये बनवला असून दुसरा पूल कसारा दिशेला रेल्वे कॉलनीकडे आहे. सध्याच्या परिस्थितीत असे दोन पूल आसनगाव स्थानकात आहेत.- अनिलकुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे