शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

काळूनदीवरील पूल गेला पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन पावसाळ्यामुळे अक्षरशः विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील काळू, भातसा, उल्हास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन पावसाळ्यामुळे अक्षरशः विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील काळू, भातसा, उल्हास व बारावी या नद्या तुडुंब भरून वाहत असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रुंदे गावाजवळून वाहणाऱ्या काळूनदीवरील पूल रविवारी रात्री पाण्याखाली गेला होता. सोमवारी सकाळी ९ वाजता पाणी ओसरले असले तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास पूल पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाने शनिवारपासून कल्याण तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसाचा जोर सोमवारीही कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे तालुक्यातील काळू, भातसा उल्हास व बारवी या नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना चांगलाच फटका बसला. पुराच्या पाण्यामुळे रविवारी रात्री उशिरा रुंदे गावाजवळील काळूनदीवरील पूल पाण्याखाली गेला. यामुळे येथील १० ते १२ गावांचा शहरांशी संपर्क तुटला होता. पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने सोमवारी सकाळी ९च्या सुमारास पुलावरील पाणी ओसरले. परंतु, नदी दुथडी भरून वाहत असून पावसाचे प्रमाण वाढले तर हा पूल पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती आहे.

------------

काळूनदीवरील पूल दरवर्षी पावसात चार ते पाच वेळा पाण्याखाली जातो. यामुळे या भागातील १० ते १२ गावांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.

- सखाराम जाधव, रहिवासी, फळेगाव

-----------

काळूनदीवरील हा पूल नेहमीच पावसाच्या पुरात पाण्याखाली जातो. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, दूधवाले व भाजीवाले यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी नवीन उंच पूल उभारावा.

- भाऊ चौधरी, रहिवासी, रुंदे

------------------