शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

काळूनदीवरील पूल गेला पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन पावसाळ्यामुळे अक्षरशः विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील काळू, भातसा, उल्हास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन पावसाळ्यामुळे अक्षरशः विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील काळू, भातसा, उल्हास व बारावी या नद्या तुडुंब भरून वाहत असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रुंदे गावाजवळून वाहणाऱ्या काळूनदीवरील पूल रविवारी रात्री पाण्याखाली गेला होता. सोमवारी सकाळी ९ वाजता पाणी ओसरले असले तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास पूल पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाने शनिवारपासून कल्याण तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसाचा जोर सोमवारीही कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे तालुक्यातील काळू, भातसा उल्हास व बारवी या नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना चांगलाच फटका बसला. पुराच्या पाण्यामुळे रविवारी रात्री उशिरा रुंदे गावाजवळील काळूनदीवरील पूल पाण्याखाली गेला. यामुळे येथील १० ते १२ गावांचा शहरांशी संपर्क तुटला होता. पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने सोमवारी सकाळी ९च्या सुमारास पुलावरील पाणी ओसरले. परंतु, नदी दुथडी भरून वाहत असून पावसाचे प्रमाण वाढले तर हा पूल पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती आहे.

------------

काळूनदीवरील पूल दरवर्षी पावसात चार ते पाच वेळा पाण्याखाली जातो. यामुळे या भागातील १० ते १२ गावांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.

- सखाराम जाधव, रहिवासी, फळेगाव

-----------

काळूनदीवरील हा पूल नेहमीच पावसाच्या पुरात पाण्याखाली जातो. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, दूधवाले व भाजीवाले यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी नवीन उंच पूल उभारावा.

- भाऊ चौधरी, रहिवासी, रुंदे

------------------