शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

काळूनदीवरील पूल गेला पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन पावसाळ्यामुळे अक्षरशः विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील काळू, भातसा, उल्हास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन पावसाळ्यामुळे अक्षरशः विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील काळू, भातसा, उल्हास व बारावी या नद्या तुडुंब भरून वाहत असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रुंदे गावाजवळून वाहणाऱ्या काळूनदीवरील पूल रविवारी रात्री पाण्याखाली गेला होता. सोमवारी सकाळी ९ वाजता पाणी ओसरले असले तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास पूल पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाने शनिवारपासून कल्याण तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसाचा जोर सोमवारीही कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे तालुक्यातील काळू, भातसा उल्हास व बारवी या नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना चांगलाच फटका बसला. पुराच्या पाण्यामुळे रविवारी रात्री उशिरा रुंदे गावाजवळील काळूनदीवरील पूल पाण्याखाली गेला. यामुळे येथील १० ते १२ गावांचा शहरांशी संपर्क तुटला होता. पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने सोमवारी सकाळी ९च्या सुमारास पुलावरील पाणी ओसरले. परंतु, नदी दुथडी भरून वाहत असून पावसाचे प्रमाण वाढले तर हा पूल पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती आहे.

------------

काळूनदीवरील पूल दरवर्षी पावसात चार ते पाच वेळा पाण्याखाली जातो. यामुळे या भागातील १० ते १२ गावांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.

- सखाराम जाधव, रहिवासी, फळेगाव

-----------

काळूनदीवरील हा पूल नेहमीच पावसाच्या पुरात पाण्याखाली जातो. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, दूधवाले व भाजीवाले यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी नवीन उंच पूल उभारावा.

- भाऊ चौधरी, रहिवासी, रुंदे

------------------