शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कोरोनाच्या महामारीमध्ये लाचखोरी जोरात; नगरविकास सर्वात पुढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वसामान्य लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वसामान्य लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन करावे लागले. या काळात अनेक व्यावसायिकांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. अशाही काळात काही सरकारी अधिकाऱ्यांनी मात्र लाचेशिवाय कामेच न करण्याची परंपरा चालूच ठेवली. ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४५ कारवाया झाल्या. यातही नगरविकास विभाग अव्वल असल्याची बाब समोर आली आहे.

कोरोनाचे महासंकट येऊन जवळपास आता दीड वर्षांचा काळ लोटला आहे. याही काळात लाचखोरी मात्र थांबलेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने जानेवारी २०२१ ते २३ मे २०२१ या कालावधीमध्ये लाचखोरीचे ३० सापळे लावले. यात ३१ गुन्ह्यांची नोंद झाली. जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत ४६ गुन्ह्यांची नोंद झाली. तर ६८ लाचखोरांना अटक झाली. २०१९ मध्ये १०२ सापळ्यांमध्ये १०९ गुन्ह्यांची नोंद झाली. तर २०१८ मध्ये १०८ सापळे लावण्यात आले असून ११२ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...............

* कोणत्या वर्षात किती कारवाया-

२०१८- १०८

२०१९- १०२

२०२०- ४५

* सर्वात जास्त कारवाया ठाणे जिल्ह्यात -

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ठाणे युनिटने १ जानेवारी ते २३ मे २०२१ या पाच महिन्यांच्या काळात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १७ कारवाया केल्या. यात नवी मुंबईत चार तर ठाणे विभागात १४ कारवाया झाल्या आहेत. यामध्ये अपसंपदेच्या एका प्रकरणाचा समावेश आहे.

...................................

ठाणे महापालिकेचे तत्कालीन व्यवस्थापक अशोक करंजकर यांच्यासह दहा जणांंविरुद्ध २०१८ मध्ये केलेल्या गैरव्यवहारांसंबधी १ मार्च २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला. तर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांच्याविरुद्धही पाच लाखांची लाच घेतल्याचा गुन्हा ९ एप्रिल २०२१ रोजी दाखल झाला. ठाणे महापालिकेमध्ये उपकरणे पुरविण्याची निविदा मंजूर करण्यासाठी १५ लाखांची मागणी करून त्यांनी पाच लाख रुपये घेतले होते.

.................................

‘‘सरकारी नोकराने कोणत्याही कामासाठी लाच घेऊ नये. तसेच नागरिकांनीही ती देऊ नये. कोणी मागणी करीत असेल तर त्यासंबंधी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. त्याची पडताळणी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. यासाठी जनजागृतीही केली जाते. त्यामुळे कुठे गैरव्यवहार, घोटाळा किंवा भ्रष्टाचार होत असल्यास नागरिकांनीही तक्रारीसाठी पुढे येणे आवश्यक आहे.’

डॉ. पंजाब उगले, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे.

........................

* कोरोनाकाळात ‘नगरविकास’ची वरकमाई जोरात-

नगरविकास- ४

पोलीस - ४

अन्न व नागरी पुरवठा- १

ठाणे जिल्हा परिषद- १

महसूल- २

भूमी अभिलेख- १

......................