शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोनाच्या महामारीमध्ये लाचखोरी जोरात; नगरविकास सर्वात पुढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वसामान्य लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वसामान्य लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन करावे लागले. या काळात अनेक व्यावसायिकांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. अशाही काळात काही सरकारी अधिकाऱ्यांनी मात्र लाचेशिवाय कामेच न करण्याची परंपरा चालूच ठेवली. ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४५ कारवाया झाल्या. यातही नगरविकास विभाग अव्वल असल्याची बाब समोर आली आहे.

कोरोनाचे महासंकट येऊन जवळपास आता दीड वर्षांचा काळ लोटला आहे. याही काळात लाचखोरी मात्र थांबलेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने जानेवारी २०२१ ते २३ मे २०२१ या कालावधीमध्ये लाचखोरीचे ३० सापळे लावले. यात ३१ गुन्ह्यांची नोंद झाली. जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत ४६ गुन्ह्यांची नोंद झाली. तर ६८ लाचखोरांना अटक झाली. २०१९ मध्ये १०२ सापळ्यांमध्ये १०९ गुन्ह्यांची नोंद झाली. तर २०१८ मध्ये १०८ सापळे लावण्यात आले असून ११२ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...............

* कोणत्या वर्षात किती कारवाया-

२०१८- १०८

२०१९- १०२

२०२०- ४५

* सर्वात जास्त कारवाया ठाणे जिल्ह्यात -

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ठाणे युनिटने १ जानेवारी ते २३ मे २०२१ या पाच महिन्यांच्या काळात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १७ कारवाया केल्या. यात नवी मुंबईत चार तर ठाणे विभागात १४ कारवाया झाल्या आहेत. यामध्ये अपसंपदेच्या एका प्रकरणाचा समावेश आहे.

...................................

ठाणे महापालिकेचे तत्कालीन व्यवस्थापक अशोक करंजकर यांच्यासह दहा जणांंविरुद्ध २०१८ मध्ये केलेल्या गैरव्यवहारांसंबधी १ मार्च २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला. तर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांच्याविरुद्धही पाच लाखांची लाच घेतल्याचा गुन्हा ९ एप्रिल २०२१ रोजी दाखल झाला. ठाणे महापालिकेमध्ये उपकरणे पुरविण्याची निविदा मंजूर करण्यासाठी १५ लाखांची मागणी करून त्यांनी पाच लाख रुपये घेतले होते.

.................................

‘‘सरकारी नोकराने कोणत्याही कामासाठी लाच घेऊ नये. तसेच नागरिकांनीही ती देऊ नये. कोणी मागणी करीत असेल तर त्यासंबंधी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. त्याची पडताळणी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. यासाठी जनजागृतीही केली जाते. त्यामुळे कुठे गैरव्यवहार, घोटाळा किंवा भ्रष्टाचार होत असल्यास नागरिकांनीही तक्रारीसाठी पुढे येणे आवश्यक आहे.’

डॉ. पंजाब उगले, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे.

........................

* कोरोनाकाळात ‘नगरविकास’ची वरकमाई जोरात-

नगरविकास- ४

पोलीस - ४

अन्न व नागरी पुरवठा- १

ठाणे जिल्हा परिषद- १

महसूल- २

भूमी अभिलेख- १

......................