शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णालयांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण- डोंबिवलीत दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढती संख्या पाहता कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण- डोंबिवलीत दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढती संख्या पाहता कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे. ऑक्सिजन पुरवठा मर्यादित आहे. यावर मात करण्यासाठी हवेतून ऑक्सिजन वेगळा करण्याचे दोन प्लांट उभारणार आहे, अशी घोषणा शनिवारी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली आहे. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठ्याअभावी कल्याण पूर्वेतील मनपाची दोन रुग्णालये सुरू करता आलेली नाहीत. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्णालयांअभावी स्थानिक रुग्णांची उपचाराअभावी परवड होताना दिसत आहे.

कोरोनाच्या लढाईत ऑक्सिजन ही सर्वात महत्त्वाची गरज बनली आहे. रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊन रुग्णांचा मृत्यू होण्याच्या काही घटना राज्यात घडल्या आहेत. येत्या काही दिवसात ऑक्सिजनची कमतरता आणखी मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याण डोंबिवलीचा आढावा घेता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. एप्रिल महिन्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची संख्या पाहता शनिवापर्यंत तब्बल ३५ हजार ८७७ नवे रुग्ण आढळले आहेत तर २९ हजार १३६ रुग्ण बरे झाल्याने घरी परतले आहेत. चिंतेची बाब म्हणजे ११९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केडीएमसी क्षेत्रात ९४ कोविड रुग्णालये आहेत. यात महापालिकेची सात कोविड केंद्रे आहेत. ऑक्सिजन बेडची संख्या २ हजार १९५ च्या आसपास आहे. या रुग्णालयांना ५० मेट्रिक टन मिळतो मात्र तो पुरेसा नाही. राज्यभरात ज्याप्रमाणे ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे तसा येथील रुग्णांना ऑक्सिजन बेड हाऊसफुल्ल असल्याने अन्यत्र शहरांची वाट धरावी लागत आहे. तसेच खासगी ऑक्सिजन पुरवठादारांकडे धाव घ्यावी लागत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा पाहता आयुक्त सूर्यवंशी यांनी सर्व कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी महापालिकेने भरारी पथक नियुक्त केली आहेत. रुग्णालयांना ऑक्सिजन पुरेसा मिळतो की नाही पुरवठादाराकडून काय अडचणी आहेत, रुग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणेत गळती आहे का याची तपासणी केली जाणार आहे. याची अंमलबजावणी कितपत काटेकोरपणे होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

----------------------------------------------

केडीएमसीला व्हावे लागणार आत्मनिर्भर

दरम्यान, एकीकडे रुग्णालये तुडुंब भरलेली असताना ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी केडीएमसीला त्यांची कल्याण पूर्वेतील दोन रुग्णालये सुरू करता आलेली नाहीत. महापालिकेला याबाबतीत आत्मनिर्भर बनविण्यासाठी भविष्यातील गरज लक्षात घेऊन स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी पूर्व भागात आमदार निधीमधून १ कोटी रुपयांचा निधी तातडीने वर्ग करण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.