शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

बीएमसीच्या एफडी मोडणे म्हणजे चिंताजनक गोष्ट - खासदार सुप्रिया सुळे

By अजित मांडके | Updated: January 21, 2023 15:36 IST

केंद्र सरकार सातत्याने म्हणते त्यांच्याकडे खूप पैसे आहे, त्याची कमतरता येणार नाही, मग देशाची जबाबदारी असणाऱ्या मायबाप सरकारला बृहन्मुंबई महापालिकेच्या एफडी मोडायची का गरज भासली.

ठाणे : केंद्र सरकार सातत्याने म्हणते त्यांच्याकडे खूप पैसे आहे, त्याची कमतरता येणार नाही, मग देशाची जबाबदारी असणाऱ्या मायबाप सरकारला बृहन्मुंबई महापालिकेच्या एफडी मोडायची का गरज भासली. मला वाटते ही एक चिंताजनकच गोष्ट आहे. असे विधान करत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

पुढे बोलताना, त्यांनी एफडी कधी मोडतो जेव्हा अडचण येते तेव्हा यामध्ये शिक्षण असो लग्नकार्य, मेडिकल अथवा खर्च वाढतो तेव्हा मोडतो. मात्र अडचणीच्या काळात एफडी वापरला जातात मग अशी काय अडचण आली आहे असा सवाल त्यांनी ठाण्यात शनिवारी एका कार्यक्रमाला आल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारला केला आहे. देशाचे पंतप्रधान एकदा निवडून आल्यावर ते पक्षाचे नाही तर देशाचे प्रधानमंत्री होतो. अशी आठवण त्यांनी करून देताना, देशाचे पंतप्रधान जर मुंबईत येऊन मुंबईसाठी काहीतरी करणार असतील तर त्याचे मनापासून स्वागत झालेच पाहिजेल. देशाचे पंतप्रधानांचा मानसन्मान हा आम्ही आणि आपण सर्वांनी केलाच पाहिजे असेही त्या म्हणाल्या      शनिवारी ठाण्यात एका मॉल मध्ये बचत गटाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी खासदार सुळे ठाण्यात आल्या होत्या.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, त्यांनी केंद्रसरकार आणि राज्य सरकारवर टीका करत सवाल ही केला आहे. तसेच ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र यांचे सरकार. हे आपण प्रेमाने आदराने म्हणतो. मध्यंतरी या सरकारला ईडी सरकार हे देवेंद्र फडणवीस यांनीच संबोधले होते. राज्यात एकतर दडपशाही आणि प्रलोभन दाखवले जात असल्याचा आरोप करताना, गेले अनेक वर्ष केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये हे पाहिले आहे. त्यामुळे मला काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही.

सध्या प्रलोभन नाही तर दडपशाही ही केली जात आहे असे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडी बाबत विचारले असता आघाडीबाबत चर्चा होईलच तसेच वरिष्ठ नेते मंडळी बसून त्याच्यावर निर्णय घेतील असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच  अंधश्रद्धा विरोधात बोलताना नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेवर आपले उभे आयुष्य खर्च केले ,त्यांची हत्या झाली असे त्या म्हणाल्या. ज्या पद्धतीने वातावरण देशात राज्यात आहे याचा विचार आज सत्तेत असलेल्या लोकांनी केला पाहिजे. त्यातच अशा गोष्टींवर ॲक्शन ही सत्तेत असलेल्या लोकांनीच घेतली पाहिजे किंवा पोलीस यंत्रणेने घेतली पाहिजे. असा सल्ला ही त्यांनी दिला. तसेच या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेल. 

हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे,शाहू-फुले-आंबेडकर यांच्या या पुरोगामी महाराष्ट्राला कालीमा फासणाऱ्या गोष्टी कुठेतरी थांबल्यास पाहिजे. याचा विरोध आपण सर्वांनी करून त्यांच्याविरोधात आपण सर्वांनी लढले पाहिजे. तर अघोरी विद्येचा मी जाहीर निषेध करते असे म्हणताना महिलांचा मानसन्मान झाला पाहीजेल. श्रद्धाही असलीच पाहिजे पण अंधश्रद्धेविरोधात आमचा लढा सातत्याने चालू राहील. ही दाभोळकरांना श्रद्धांजली आणि आदरांजली राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेthaneठाणे