शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

बीएमसीच्या एफडी मोडणे म्हणजे चिंताजनक गोष्ट - खासदार सुप्रिया सुळे

By अजित मांडके | Updated: January 21, 2023 15:36 IST

केंद्र सरकार सातत्याने म्हणते त्यांच्याकडे खूप पैसे आहे, त्याची कमतरता येणार नाही, मग देशाची जबाबदारी असणाऱ्या मायबाप सरकारला बृहन्मुंबई महापालिकेच्या एफडी मोडायची का गरज भासली.

ठाणे : केंद्र सरकार सातत्याने म्हणते त्यांच्याकडे खूप पैसे आहे, त्याची कमतरता येणार नाही, मग देशाची जबाबदारी असणाऱ्या मायबाप सरकारला बृहन्मुंबई महापालिकेच्या एफडी मोडायची का गरज भासली. मला वाटते ही एक चिंताजनकच गोष्ट आहे. असे विधान करत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

पुढे बोलताना, त्यांनी एफडी कधी मोडतो जेव्हा अडचण येते तेव्हा यामध्ये शिक्षण असो लग्नकार्य, मेडिकल अथवा खर्च वाढतो तेव्हा मोडतो. मात्र अडचणीच्या काळात एफडी वापरला जातात मग अशी काय अडचण आली आहे असा सवाल त्यांनी ठाण्यात शनिवारी एका कार्यक्रमाला आल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारला केला आहे. देशाचे पंतप्रधान एकदा निवडून आल्यावर ते पक्षाचे नाही तर देशाचे प्रधानमंत्री होतो. अशी आठवण त्यांनी करून देताना, देशाचे पंतप्रधान जर मुंबईत येऊन मुंबईसाठी काहीतरी करणार असतील तर त्याचे मनापासून स्वागत झालेच पाहिजेल. देशाचे पंतप्रधानांचा मानसन्मान हा आम्ही आणि आपण सर्वांनी केलाच पाहिजे असेही त्या म्हणाल्या      शनिवारी ठाण्यात एका मॉल मध्ये बचत गटाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी खासदार सुळे ठाण्यात आल्या होत्या.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, त्यांनी केंद्रसरकार आणि राज्य सरकारवर टीका करत सवाल ही केला आहे. तसेच ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र यांचे सरकार. हे आपण प्रेमाने आदराने म्हणतो. मध्यंतरी या सरकारला ईडी सरकार हे देवेंद्र फडणवीस यांनीच संबोधले होते. राज्यात एकतर दडपशाही आणि प्रलोभन दाखवले जात असल्याचा आरोप करताना, गेले अनेक वर्ष केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये हे पाहिले आहे. त्यामुळे मला काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही.

सध्या प्रलोभन नाही तर दडपशाही ही केली जात आहे असे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडी बाबत विचारले असता आघाडीबाबत चर्चा होईलच तसेच वरिष्ठ नेते मंडळी बसून त्याच्यावर निर्णय घेतील असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच  अंधश्रद्धा विरोधात बोलताना नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेवर आपले उभे आयुष्य खर्च केले ,त्यांची हत्या झाली असे त्या म्हणाल्या. ज्या पद्धतीने वातावरण देशात राज्यात आहे याचा विचार आज सत्तेत असलेल्या लोकांनी केला पाहिजे. त्यातच अशा गोष्टींवर ॲक्शन ही सत्तेत असलेल्या लोकांनीच घेतली पाहिजे किंवा पोलीस यंत्रणेने घेतली पाहिजे. असा सल्ला ही त्यांनी दिला. तसेच या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेल. 

हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे,शाहू-फुले-आंबेडकर यांच्या या पुरोगामी महाराष्ट्राला कालीमा फासणाऱ्या गोष्टी कुठेतरी थांबल्यास पाहिजे. याचा विरोध आपण सर्वांनी करून त्यांच्याविरोधात आपण सर्वांनी लढले पाहिजे. तर अघोरी विद्येचा मी जाहीर निषेध करते असे म्हणताना महिलांचा मानसन्मान झाला पाहीजेल. श्रद्धाही असलीच पाहिजे पण अंधश्रद्धेविरोधात आमचा लढा सातत्याने चालू राहील. ही दाभोळकरांना श्रद्धांजली आणि आदरांजली राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेthaneठाणे