शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांची मक्तेदारी मोडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेत ६० टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची ओरड होत असताना राज्य शासनाने एक अतिरिक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिकेत ६० टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची ओरड होत असताना राज्य शासनाने एक अतिरिक्त आयुक्तांसह चार उपायुक्त दिले. यामुळे विविध विभागांच्या कामांत पारदर्शकता येऊन नगररचनाकार विभागाचे उत्पन्न वाढले. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांची मक्तेदारीही मोडीत निघण्याची शक्यता आहे.

उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ ची ७० टक्के, तर इतर वर्गांतील ३० टक्के पदे रिक्त आहेत. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी दिले जात नसल्याने, शहर अभियंता, बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, महापालिका सचिव, विधी अधिकारी, नगररचनाकार, करनिर्धारक संकलक, वैद्यकीय अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापक यांच्यासह अनेक पदे रिक्त आहेत. मात्र दुसरीकडे आयएएस दर्जाचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर तर उपायुक्तपदी अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, गणपतराव जाधव व प्रियंका राजपूत यांची नियुक्ती केली. नव्याने झालेल्या उपायुक्तांच्या नियुक्तीने महापालिका कारभारात पारदर्शकता येऊन स्थानिक मक्तेदारी निर्माण करणाऱ्या, तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या हातातील बाहुले बनलेल्या अधिकाऱ्यांवर अंकुश राहणार असल्याचे बोलले जाते.

आयुक्त डॉ. राजा दयानिधी हे नगरसेवक, स्थानिक नेते, पालिका अधिकारी, पत्रकार यांच्यासह नागरिकांसोबत संवाद ठेवत नसल्याने, त्यांच्याबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. सामाजिक संघटना व नागरिकांनी त्यांच्या तक्रारी थेट मंत्रालयापर्यंत केल्या. दुसरीकडे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्यासह अन्य उपायुक्त नागरिक, अधिकारी, नगरसेवक आदींना विश्वासात घेऊन काम करीत असल्याने, वर्षानुवर्षे वर्ग-३ व ४ कर्मचाऱ्यांचे रखडलेले पदोन्नती, अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची भरती व इतर कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय, वादग्रस्त व बनावट कागदपत्रे देऊन महापालिका सेवेत दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

.........

नगररचनाकार विभाग कार्यान्वित

महापालिकेचे मालमत्ताकर व पाणीपुरवठा विभाग तसेच शासनाकडून मिळणारे जीएसटी अनुदान हे मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहेत. दरम्यान, आयुक्त डॉ. राजा दयानिधी व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी नगररचनाकार विभागाकडे लक्ष केंद्रित केल्याने, गेल्या दोन महिन्यांत ३०० पेक्षा जास्त बांधकाम परवाने मंजूर होऊन १० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न महापालिकेला मिळाले.

..............