शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता करवसुलीला ब्रेक; लक्ष्य १०० कोटी, वसुली ४० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 23:59 IST

नागरिक अभय योजनेच्या प्रतीक्षेत, शहरात एक लाख ७९ हजार मालमत्ताधारक असून, विभागाची ५०० कोटींपेक्षा जास्त थकबाकी आहे

उल्हासनगर : महापालिका मालमत्ता कराबाबत अभय योजना सुरू होईल या प्रतीक्षेत नागरिक असल्याने ते कर भरत नसल्याने वसुलीला ब्रेक लागला आहे. गेल्या १० महिन्यांत ४० कोटींपेक्षा कमी करवसुली झाली आहे. यामुळे अभय योजना सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती महापौर लीलाबाई अशान व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली.

मालमत्ता कर विभाग नेहमीच वादात राहिला आहे. विभागाचा पदभार हा लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे दिला आहे. गेल्या वर्षी जानेवारीत ७० कोटींपेक्षा जास्त कर वसुली झाली होती, तर चालू वर्षी ४० कोटींपेक्षा कमी वसुली झाली आहे. पालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत मालमत्ता कर हा आहे. मात्र, कोरोनाकाळात नागरिकांनी हा कर भरला नाही. काही नगरसेवकांनी मालमत्ता करात ३० टक्के सवलत देण्याची मागणी केली होती, तर आता विरोधी पक्षनेते किशोर वनवारी व भाजपच्या नगरसेवकांनी मालमत्ता कर विभागात अभय योजना लागू करा, अशा मागणीचे पत्र आयुक्तांना दिले आहे.

शहरात एक लाख ७९ हजार मालमत्ताधारक असून, विभागाची ५०० कोटींपेक्षा जास्त थकबाकी आहे. यामध्ये नऊ हजार मालमत्तांबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले. या मालमत्तेची दुबार नोंदणी, हयात नसणे, मालमत्ता मिळून न येणे असे प्रकार वर्षानुवर्षे होत आहेत. अशा वादग्रस्त मालमत्ता रद्द करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत आला होता. मात्र, सर्वसंमतीने प्रस्ताव फेटाळून या मालमत्तेचे पुन:सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. अशा बेनामी मालमत्तेमुळे विभागाची थकबाकी फुगलेली दिसत असल्याची प्रतिक्रिया उपमहापौरांनी दिली.

मालमत्तेची सर्वेक्षण प्रक्रिया रखडलीशहरातील मालमत्तेचे पुन:सर्वेक्षण करण्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले आहे. एका वर्षात मालमत्तेचे सर्वेक्षण केल्यावर दुप्पट मालमत्ता कर जमा होईल असे बोलले जात होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सर्वेक्षणाचे काम ठप्प पडले असून, ६ कोटींपैकी दोन कोटी सहा लाख रुपयांचा निधी कंपनीला सर्वेक्षणापोटी दिल्याची माहिती विभाग प्रमुखांनी दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर