शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

बस सुविधेअभावी शिक्षणाला ब्रेक

By admin | Updated: July 16, 2015 23:31 IST

संपूर्ण देशात डिजिटल इंडियाचा गाजावाजा होत असताना ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील २० ते ३० गावांना अद्याप दळणवळणाच्या सोयीसुविधा नसल्याने

बिर्लागेट : संपूर्ण देशात डिजिटल इंडियाचा गाजावाजा होत असताना ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील २० ते ३० गावांना अद्याप दळणवळणाच्या सोयीसुविधा नसल्याने गावांतील मुलामुलींना इयत्ता सातवीनंतरचे पुढील शिक्षण घेता येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया करण्याची घोषणा केली. यानंतर, राज्यातील शिक्षण विभागाने शाळाबाह्यमुलांचे सर्वेक्षण केले. याशिवाय, ‘सब बढे, सब पढे’ म्हणत सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून शिक्षणावर लाखोंचा खर्च करीत आहे. मात्र, तरीही हजारो मुले आजही शिक्षणापासून वंचित आहेत.कल्याण तालुक्यात १२५ जिल्हा परिषदेच्या शाळा असून ४७८ शिक्षक साडेबारा ते तेरा हजार विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम करतात. १०१ गावे आणि १९ पाड्यांत जिल्हा परिषदेचे पहिली ते चौथी अथवा सातवीपर्यंत वर्ग आहेत. पुढील शिक्षणासाठी त्यांना कल्याण, रायते, गोवेली, टिटवाळा, म्हारळ, वरप, मोहने, मांडा अथवा अंबरनाथ, मुरबाड येथे जावे लागते. परंतु, येथे जाण्यासाठी त्यांना बस मिळत नाही. कारण, या गावांमध्ये बसच येत नाही. रस्ते आहेत, जागा आहे, परंतु बस नसल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.म्हसरोंडी, भोंगळपाडा, आडिवली, वाघेरापाडा, पठारपाडा, नालेपाडा, झापणी, ठाकूरवाडी, अनखर, बेलपाडा, हल, वैतागवाडी, खोडाखडक, बांगरवाडी, काकडपाडा, पळसोली, वेहळे, गणेशवाडी, संतेचापाडा, नांदप, पिंपळोली, वाहोळीपाडा, बांधण्याचापाडा, राया, ओसर्ली, गेरसे, निंबवली, मोस, सांगोडा, कोठेरी, वासुंद्री आदी २० ते ३० गावपाड्यांत बसची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत.म्हसरोंडी गावातील ग्रामस्थांनी बस सुरू करावी म्हणून कल्याण एसटी आगार व्यवस्थापकाकडे अर्ज करूनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. कल्याण आगारात एकूण ७४ बस, ४ मिनीबस आणि ४७८ कर्मचारी आहेत. मात्र, या गावांना बस मिळत नाही. यामुळे ३ ते ४ किमी अंतर तुडवत मुख्य ठिकाणी यावे लागते, अशी व्यथा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. यावर लवकरच तोडगा निघण्याची अशा आहे. (वार्ताहर)आमच्या गावात ५९ घरे आणि २८२ कुटुंबे आहेत. गावात रस्ते, लाइट, पाणी, शाळा आहे, मात्र बस नाही. यामुळे १५ ते २० मुलेमुली पुढील शिक्षणापासून वंचित राहिली आहेत.- गणपत आगिवले, ग्रामस्थ, म्हसरोंडीबस सुविधेअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यास मी स्वत: याचा पाठपुरावा करतो व बस कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करतो.- डॉ. प्रदीप पवार, अति. गटशिक्षणाधिकारी, कल्याणआमच्याकडे गावात बस सुरू करण्याबाबत कोणीही अर्ज केले नाहीत. - एस.एन. रूपवते, कल्याण आगारप्रमुख गावातील ठरावीक मुलेच पुढील शिक्षणासाठी पायी ३ ते ४ किमी अंतर चालत जातात.- विशाल आरेकर, शिक्षक, जि.प. शाळा म्हसरोंडी, कल्याण