शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

हजारेंच्या सहमतीनंतर धरणग्रस्तांचा बहिष्कार

By admin | Updated: September 23, 2014 00:10 IST

मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या काळू धरणामुळे सुमारे ४१ गावपाड्यांना जलसमाधी मिळणार आहे.

ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या काळू धरणामुळे सुमारे ४१ गावपाड्यांना जलसमाधी मिळणार आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी एकाही राजकीय पुढाऱ्याने अद्याप या गावकऱ्यांची बाजू मांडली नाही. यामुळे या विधानसभा निवडणुकीवरदेखील बहिष्कार टाकण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ग्रामस्थांनी घेतल्याचे उघड झाले .मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर बांधण्यात येणाऱ्या या धरणाचे संपूर्ण पाणी मुंबई महानगरपालिकेला जाणार आहे. परंतु, मागील काही वर्षांपासून सुमारे ४१ गावपाड्यांनी तीव्र विरोध करून या धरणाचे काम थांबवले आहे. लोकसभा निवडणुकीवरदेखील सुमारे १८ हजार लोकसंख्येच्या १९ गावांमधील गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. त्याची पुनरावृत्ती करून या विधानसभा निवडणुकीवरदेखील या गावकऱ्यांनी निर्धार कायम ठेवून बहिष्कार टाकला आहे. या निर्धारापूर्वी या गावांच्या शिष्टमंडळाने राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेऊन बहिष्कार टाकत असल्याचे त्यांना सांगितले आहे़अण्णांना भेटलेल्या शिष्टमंडळात काळू धरणविरोधी शेतकरी, कष्टकरी व भूमिहीन समुदाय मंचचे कृष्णकांत तेलम, पोपटराव देशमुख, भगवान भला, आत्माराम देशमुख, सदाशिव देशमुख, अशोक पठारे, सुरेश देशमुख, दशरथ देशमुख, प्रवीण देशमुख, रमेश राऊत आदी गावकऱ्यांचा समावेश होता.या वेळी त्यांनी काळू धरण बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना जबरदस्तीने धरणाचा घाट घातला जात आहे. याशिवाय, ४१ गावपाड्यांच्या सर्व ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन या धरणाला विरोध दर्शवला आहे. यानंतर, तळेगाव, जडई, फांगळोशी, खुटळ, चासोळे, दिघेफळ, शिवेचीवाडी, खरशेत, उंबरोली, कुंदाचीवाडी, लाहाडी, भिकारवाडी, शिरसोनवाडी, भट्टीची वाडी, पायरवाडी, वाकळवाडी, न्याहाडी आदी गावांच्या गावकऱ्यांनी तळेगाव येथे एकत्र येऊन बैठक घेतली आणि मतदानावर बहिष्कार टाकला.