शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

...तर भिवंडीतील कामवारी नदी शेतीसाठी ठरेल वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:20 IST

शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी इतर यंत्रणांवर अवलंबून राहावे लागत आहे.

- पंढरीनाथ कुंभारशहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी इतर यंत्रणांवर अवलंबून राहावे लागत आहे. सरकारने तुम्ही जलस्रोत निर्माण करा असे सांगितल्यावर भ्रष्टाचाराने डोके वर काढले. यातून ज्यांना आर्थिक फायदा घ्यायचा होता तो घेतला. पण पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याहूनही नागरिकांची सोय झाली असती, मात्र त्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहरीकरणामुळे प्राथमिक सुविधांवर ताण येत असून त्या देताना यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अर्थात याला अन्य गोष्टीही जबाबदार आहेत. विशेषता पाण्यावरून भविष्यात वाद होऊ शकतात असे भाकित केले जात आहे. त्यामुळे जलस्त्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण जे आहेत त्याचाही योग्य प्रकारे वापर करून नागरिकांना पाणी कसे देता येईल हेही पाहणे महत्वाचे आहे.भिवंडी तालुक्यातील देपोलीच्या जंगलातून सुरू होणारा कामवारी नदीचा प्रवाह तसेच चावे व करंजावडे गावापासून छोट्या-मोठ्या नदीनाल्यातून वाहणारी कामवारी नदी ग्रामीण भागातून गोडे पाणी घेऊन शहराकडे येते. मात्र या प्रवाहाच्या मार्गावर नदीच्या पात्रातील गाळ न काढल्याने आणि पाणी साठवण्याच्या बंधाºयात वाढ न केल्याने शहराजवळ शेलार धरणावरून हे गोडे पाणी उलटून खाडीपात्रात जाते. त्यामुळे धरणांतून उलटणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पाटबंधारे व लघुपाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला पाहिजे.तालुक्यातील खारपट्टीच्या जमिनीवर गोदामांची संख्या वाढत असताना जमिनीचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यातच ग्रामीण भागात सरकारकडून होत असलेल्या विविध प्रकल्पात शेतकºयांच्या जमिनी जात असताना या प्रकल्पाजवळच्या जमिनीला मुंबईच्या व्यापाºयांनी लक्ष केले आहे. त्यामुळे शेतजमिनीला भाव आलेला आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणाºया पाण्याच्या साठवणुकीकडे शेतकºयांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी हंगामी पिकासह भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणाºया शेतकºयांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील जमिनीच्या व्यवहारात राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतल्याने शेतीला दुय्यम स्थान मिळत आहे.वास्तविक पावसाळ्यात देपोली येथील डोंगरातून येणाºया कामवारी नदीचा प्रवाह मोठा असतो .हा प्रवाह देपोली, साकरोली, नांदिठणे, लामज, म्हापोली,कोयना वसाहत पुढे चावे येथे जातो. तेथून पुढे बंधारे बांधले आहेत. परंतु चावे गावाच्या अगोदर बंधारे बांधल्यास दरम्यानच्या गावात पाण्याचा साठा निर्माण होईल व तेथील शेतकºयांना वर्षभर शेती उत्पादने घेण्यास मदत मिळू शकेल. मात्र हे बंधारे न बांधल्याने कामवारी नदीचे हजारो लिटर पाणी प्रत्येक पावसाळ्यात शेलारमधील धरणांवरून उलटून खाडीपात्रात जाते.देपोली, चावे-भरे आणि करंजावडे या तीन वेगवेगळ्या नदीच्या प्रवाहातून शहराकडे येणारी कामवारी नदी पुंडास, निवळी, रोहिणी, सोनटक्का, कशीवली, विश्वभारती, सैनिक वसाहत, गोरसई, शेलार या गावातून धरणापर्यंत प्रवाहीत होते. या गावा दरम्यान नदीचा छोटा-मोठा प्रवाह असल्याने वहिवाटीसाठी गावाजवळ छोटेमोठे पूल बांधले आहेत. मात्र या पुलाखालून वाहणारे पाणी काही महिन्यातच आटून नदी पात्र ठणठणीत होते.>प्रकल्पासाठी नेमलेली कंपनी बोगसभिवंडी शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी चिंबीपाडा येथे धरण बांधण्याचा प्रकल्प मागील चाळीस वर्षापासून पालिकेच्या कार्यालयात धूळखात आहे. दरम्यान सरकारने महापालिकेला स्वत:चे पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यास सांगितले असता पालिकेने टेंभीवली-चिंबीपाडा येथील वारणा व कामवारी नदीवर मालकी करण्याच्या निमीत्ताने पाणीपुरवठा विभागामार्फत पीपीपी प्रकल्प राबवण्याचे षडयंत्र काही वर्षापूर्वी रचले. परंतु या प्रकल्पासाठी नेमलेली कंपनी बोगस निघाल्याने पालिकेचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होऊन या प्रकल्पात झालेल्याभ्रष्ट कारभाराचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे या दोन्ही नदीतील पाणीसाठवणे दूरच राहिले परंतु दरवर्षी पावसाचे पाणी खाडीपात्रात जाते हे भिवंडीकरांचे दुर्दैव आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी