शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

...तर भिवंडीतील कामवारी नदी शेतीसाठी ठरेल वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:20 IST

शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी इतर यंत्रणांवर अवलंबून राहावे लागत आहे.

- पंढरीनाथ कुंभारशहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी इतर यंत्रणांवर अवलंबून राहावे लागत आहे. सरकारने तुम्ही जलस्रोत निर्माण करा असे सांगितल्यावर भ्रष्टाचाराने डोके वर काढले. यातून ज्यांना आर्थिक फायदा घ्यायचा होता तो घेतला. पण पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याहूनही नागरिकांची सोय झाली असती, मात्र त्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहरीकरणामुळे प्राथमिक सुविधांवर ताण येत असून त्या देताना यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अर्थात याला अन्य गोष्टीही जबाबदार आहेत. विशेषता पाण्यावरून भविष्यात वाद होऊ शकतात असे भाकित केले जात आहे. त्यामुळे जलस्त्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण जे आहेत त्याचाही योग्य प्रकारे वापर करून नागरिकांना पाणी कसे देता येईल हेही पाहणे महत्वाचे आहे.भिवंडी तालुक्यातील देपोलीच्या जंगलातून सुरू होणारा कामवारी नदीचा प्रवाह तसेच चावे व करंजावडे गावापासून छोट्या-मोठ्या नदीनाल्यातून वाहणारी कामवारी नदी ग्रामीण भागातून गोडे पाणी घेऊन शहराकडे येते. मात्र या प्रवाहाच्या मार्गावर नदीच्या पात्रातील गाळ न काढल्याने आणि पाणी साठवण्याच्या बंधाºयात वाढ न केल्याने शहराजवळ शेलार धरणावरून हे गोडे पाणी उलटून खाडीपात्रात जाते. त्यामुळे धरणांतून उलटणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पाटबंधारे व लघुपाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला पाहिजे.तालुक्यातील खारपट्टीच्या जमिनीवर गोदामांची संख्या वाढत असताना जमिनीचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यातच ग्रामीण भागात सरकारकडून होत असलेल्या विविध प्रकल्पात शेतकºयांच्या जमिनी जात असताना या प्रकल्पाजवळच्या जमिनीला मुंबईच्या व्यापाºयांनी लक्ष केले आहे. त्यामुळे शेतजमिनीला भाव आलेला आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणाºया पाण्याच्या साठवणुकीकडे शेतकºयांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी हंगामी पिकासह भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणाºया शेतकºयांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील जमिनीच्या व्यवहारात राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतल्याने शेतीला दुय्यम स्थान मिळत आहे.वास्तविक पावसाळ्यात देपोली येथील डोंगरातून येणाºया कामवारी नदीचा प्रवाह मोठा असतो .हा प्रवाह देपोली, साकरोली, नांदिठणे, लामज, म्हापोली,कोयना वसाहत पुढे चावे येथे जातो. तेथून पुढे बंधारे बांधले आहेत. परंतु चावे गावाच्या अगोदर बंधारे बांधल्यास दरम्यानच्या गावात पाण्याचा साठा निर्माण होईल व तेथील शेतकºयांना वर्षभर शेती उत्पादने घेण्यास मदत मिळू शकेल. मात्र हे बंधारे न बांधल्याने कामवारी नदीचे हजारो लिटर पाणी प्रत्येक पावसाळ्यात शेलारमधील धरणांवरून उलटून खाडीपात्रात जाते.देपोली, चावे-भरे आणि करंजावडे या तीन वेगवेगळ्या नदीच्या प्रवाहातून शहराकडे येणारी कामवारी नदी पुंडास, निवळी, रोहिणी, सोनटक्का, कशीवली, विश्वभारती, सैनिक वसाहत, गोरसई, शेलार या गावातून धरणापर्यंत प्रवाहीत होते. या गावा दरम्यान नदीचा छोटा-मोठा प्रवाह असल्याने वहिवाटीसाठी गावाजवळ छोटेमोठे पूल बांधले आहेत. मात्र या पुलाखालून वाहणारे पाणी काही महिन्यातच आटून नदी पात्र ठणठणीत होते.>प्रकल्पासाठी नेमलेली कंपनी बोगसभिवंडी शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी चिंबीपाडा येथे धरण बांधण्याचा प्रकल्प मागील चाळीस वर्षापासून पालिकेच्या कार्यालयात धूळखात आहे. दरम्यान सरकारने महापालिकेला स्वत:चे पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यास सांगितले असता पालिकेने टेंभीवली-चिंबीपाडा येथील वारणा व कामवारी नदीवर मालकी करण्याच्या निमीत्ताने पाणीपुरवठा विभागामार्फत पीपीपी प्रकल्प राबवण्याचे षडयंत्र काही वर्षापूर्वी रचले. परंतु या प्रकल्पासाठी नेमलेली कंपनी बोगस निघाल्याने पालिकेचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होऊन या प्रकल्पात झालेल्याभ्रष्ट कारभाराचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे या दोन्ही नदीतील पाणीसाठवणे दूरच राहिले परंतु दरवर्षी पावसाचे पाणी खाडीपात्रात जाते हे भिवंडीकरांचे दुर्दैव आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी