शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मागण्यांचे सेनेवर बूमरँग

By admin | Updated: July 22, 2015 03:30 IST

तत्कालीन आघाडी सरकारला खिंडीत गाठण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने १३ आॅक्टोबर २०११ म्हणजे ५ वर्षांपूर्वी एक निवेदन सादर केले होते.

ठाणे : तत्कालीन आघाडी सरकारला खिंडीत गाठण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने १३ आॅक्टोबर २०११ म्हणजे ५ वर्षांपूर्वी एक निवेदन सादर केले होते. त्यामध्ये ठाणे शहराशी संबंधित अशा २७ मागण्या मान्य करण्याची विनंती केली होती. तब्बल पाच वर्षांनंतरही यापैकी २२ मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्या वेळी आमची सत्ता आली तर या मागण्या तत्काळ मंजूर करून घेतल्या जातील, असा सूर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आळवला होता. आता युतीची सत्ता असल्याने उर्वरित २२ मागण्या तत्काळ मंजूर करण्याचे आव्हान शिवसेनेसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे २०११ सालचे हे निवेदन आता सेनेवरच बूमरँग होण्याची शक्यता आहे. सेनेचे तत्कालीन उपजिल्हाप्रमुख आणि विद्यमान स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, संजय मोरे, तत्कालीन गटनेते आणि विद्यमान उपमहापौर राजेंद्र साप्ते, राम रेपाळे, संतोष वडवले यांचा शिष्टमंडळात समावेश होता.१)बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांसाठी असलेला अधिभार शासनाने उचलावा.२)एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या तलावांच्या संवर्धनासाठी युती शासनाने आर्थिक तरतूद केली असली तरीही त्यांचे हस्तांतरण महापालिकेकडे तत्काळ व्हावे. ३) क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी जादा चटईक्षेत्र द्यावे ४)आघाडीच्या काळात या योजनेला मंजुरी दिली असली तरी हिवाळी अधिवेशनात फेरमंजुरीनंतरही कोर्टबाजीमध्ये अडकल्याने तिच्या अंमलबजावणीचे घोंगडे भिजत पडले आहे. परिणामी, जादा चटईक्षेत्राचा विषयही रेंगाळला आहे. ५ )टीडीआरच्या विकास नियंत्रण नियमावलीत बदल करणे. ६)ठाणे शहरात अनेक भूखंड राखीव ठेवले आहेत. ते पालिकेकडे हस्तांतरित करावेत. ७)सरकारी भूखंड सर्व जातीधर्मांच्या स्मशानभूमींसाठी विनामोबदला द्यावेत.८)कळवा ते बाळकुमपर्यंतच्या खाडीचा विकास करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. या ३० किमी लांबीच्या खाडीचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव रेंगाळलेला असताना कोलशेत येथे पर्यटन केंद्र उभारण्याची मागणी फडणवीस सरकारने मान्य केली असली तरी मूळ मागणी मात्र बाजूला पडली आहे. त्यामुळेच कळवा खाडीलगतच्या सलीम अली पक्षी उद्यानाची परवानगीही रखडलेली आहे. ९)ठाणे पालिका क्षेत्रात विकासकामे करताना पालिकेचे भूखंड वापरले गेले आहेत. या भूखंडांच्या बदल्यातील ३ चटईक्षेत्र देण्याच्या मागणीबाबत सत्ताधारी पक्षाचे आमदार आता काहीही बोलत नाहीत.१०) खाडीकिनाऱ्यालगतचे रस्ते तयार करावेत. ११)मेंटल हॉस्पिटलची जागा हस्तांतरित करून घेण्यासाठी शिवसेनेने तत्कालीन आरोग्यमंत्री विमल मुंदडा, खानविलकर यांच्याकडे मागणीपत्र दिले होते. (प्रतिनिधी)