शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

बोईसर ग्रामपंचायतीचे स्पेशल आॅडिट ?

By admin | Updated: August 12, 2016 01:26 IST

बोईसर ग्रामपंचायतीच्या १८ जुलै २०१६ पूर्वीच्या कार्यकालामध्ये झालेल्या व्यवहारामध्ये अनिमितता, चुकीच्या पद्धतीने केलेली कामे आणि गैरव्यवहार झाला आहे काय?

बोईसर : बोईसर ग्रामपंचायतीच्या १८ जुलै २०१६ पूर्वीच्या कार्यकालामध्ये झालेल्या व्यवहारामध्ये अनिमितता, चुकीच्या पद्धतीने केलेली कामे आणि गैरव्यवहार झाला आहे काय? याची शहनिशा करण्यासाठी बोईसर ग्रामपंचायतीच्या मागील कार्यकालाचे स्पेशल आॅडिट करण्याची मागणी नवनिर्वाचित बोईसरच्या सरपंच व उपसरपंचांनी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. त्यांनी स्पेशल आॅडीट करण्याचे संकेत दिले आहेत. बोेईसर ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली बाबतर व उपसरपंच राजू करवीर यांनी त्यांच्या काही सहकारी सदस्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ग्रामपंचपायतीचा दि. १८ जुलै रोजी कार्यभार स्वीकारला त्या दिवशी ठाणे डिस्ट्रीक्ट बॅकेमधील पाणीपुरवठा खात्यामध्ये अवघे ७२६ रूपये शिल्लक होते तर दि. १५ जुलै २०१६ रोजी मुद्रांक शुल्काच्या रूपात जमा झालेला ४५ लाख ५० हजाराचा निधी ज्या दिवशी डिपॉझीट झाला त्या एकाच दिवशी त्याचे वाटप केले. त्यापैकी काही रक्कम रोखीने तर काही बेअरर चेकने दिली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून निधी अभावी आम्ही कार्यभार कसा सांभाळणार असा सवाल केला. अस्तीत्वात नसलेल्या झेरॉक्स कॉपीचे, ग्राम-पंचायतीच्या दोन सायकलच्या दुरूस्तीचे तसेच वृत्तपत्रात दिलेल्या जाहिराती इ. वर लाखो रूपये खर्च दाखविण्यात आला असून कायम स्वरूपी सफाई कामगार असतांनाही अनेक अतिरीक्त कामगार ठेका पध्दतीने (रोजंदारी) दाखवून त्यामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सन २०१५-१६ या वित्तीय वर्षामधील व्हॉऊचर वर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांची सहीच नसल्याचे सांगून मोठया प्रमाणात अपहार झाल्याची शक्यता वर्तविली गेली असून अशाच पध्दतीची तक्रार बसपाचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव यांनीही केली असून संबंधीतांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यानच्या काळामध्ये वरीष्ठ लिपिक संतोष मराठे यांनी लक्ष्मण कॉम्पलेक्स कडून आलेल्या निधीची कॅशबुकमध्ये एन्ट्री न कराता तो निधी तेथील रस्त्यांच्या कामासाठी खर्च केला असल्याचे उपसरपंच करवीर यांनी सांगून या संदर्भात खुलासा मागणारे पत्र मराठे यांना देण्यात आले होते त्याला उत्तर देतांना या घटनेची संपूर्ण चौकशी पंचायत समिती मार्फत झाली असल्याचे उत्तर देण्यात आले परंतु, हा खुलासा समाधानकारक नाही म्हणून त्यांना चौकशी काळापर्यंत निलंबनाचे पत्र दि. १० आॅगस्ट रोजी काढण्यात आले होते. परंतु ते पत्र मराठे यांनी स्वीकारले नाही तर या निलंबन पत्रानंतर तसेच चर्चेतून काही मार्ग न निघाल्यास ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संप होण्याची शक्यता आहे.