शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बोईसरच्या रस्त्यांना खांबाचा अडसर

By admin | Updated: April 23, 2016 01:48 IST

अनेक अडथळ्यांवर मात करून पालघर-बोईसर या मुख्य रस्त्यावरील नवापूर नाका ते साईबाबा मंदिर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊनही विजेचे काम जैसे थे स्थितीमध्ये आहे

बोईसर : अनेक अडथळ्यांवर मात करून पालघर-बोईसर या मुख्य रस्त्यावरील नवापूर नाका ते साईबाबा मंदिर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊनही विजेचे काम जैसे थे स्थितीमध्ये आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यात असलेल्या वीजखांबांमुळे अपघाताची शक्यता आहे. पालघर-बोईसर रस्ता प्र.रा.मा.क्र. ४ किमी ११/७०० ते १२/१०० मध्ये सदर चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १ पालघर यांच्यामार्फत हाती घेण्यात आले असून हे काम बहुतांश पूर्ण होऊन आता गटारलाइनचे काम सुरू आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याने वीज वितरण कंपनीला खांब हटवण्यासंदर्भात पत्र देऊनही अजून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. गटाराच्या कामातही काही झाडांचा अडथळा येत आहे. काम सुरू असलेले गटार सांडपाण्याने तुडुंब भरले आहे. २००६ मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने मोजणी करून नकाशा तयार केला होता. मात्र, सध्या सुरू असलेले काम हे नकाशानुसार नसून रस्त्याची मध्यरेषा आखताना संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याचे बोईसरचे माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन ठाकूर यांनी सांगितले. तसेच रस्त्यावरील विजेचे खांब हटवण्यासंदर्भात सिटीझन फोरम आॅफ बोईसरतर्फे महावितरणला निवेदन देण्यात आले असल्याचे फोरमचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत संखे यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)