शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांची खैर नाही; कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 00:58 IST

खऱ्या लाभधारकांना मिळेल दिलासा

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी आदी विविध अर्थसाहाय्य योजना राबविण्यात येत आहेत. वयोवृद्धांसाठी श्रावणबाळ सेवा योजना, अनाथ, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, दिव्यांग,  आदींकडून दरमहा या योजनांच्या अर्थसाहाय्यांचा लाभ घेतला जात आहे. मात्र, योजनांच्या निकषांत न बसणारेही त्याचा लाभ घेत आहेत. अशा लाभार्थ्यांवर कारवाईच्या हालचाली जि.प.ने सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात विशेष साहाय्य योजनेंतर्गत अनुदान वाटपाच्या योजना सुरू आहेत.  दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या ६५ व ६५ वर्षांवरील वृद्धांना इंदिरा गांधी  वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन सुरू आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनाही राबविण्यात येत आहे. इंदिरा गांधी योजनेद्वारे लाभार्थ्यांना प्रतिमहा २०० व ५०० रुपये निवृत्ती मिळते. त्याचा लाभ जिल्ह्यातील ४,२९३ वृद्धांना मिळतो. यंदा ७१ लाखांचे अनुदान मिळाले होते. त्यातून ऑगस्टपर्यंत ६२,५१,५०० पर्यंतचे अनुदान वाटप झाले आहे. लाभार्थी कुठल्या योजनेचे किती?संजय गांधी योजना : ९४५७श्रावणबाळ योजना : ४९९६इंदिरा गांधी योजना : ४२९३एकूण                : १८७४६घटस्फोटित लाभार्थी लाभार्थी महिलेचा पुनर्विवाह झाला का, याची चौकशी होईल. यासाठी रेशनकार्डची सत्यता पडताळून पाहिली जाणार आहे. परित्यक्ताया महिला बहुधा शासकीय, संस्थेच्या अनाथालयात राहतात. यामुळे या संस्थेत राहात असल्याचा दाखला लाभार्थ्यांना द्यावा लागणार आहे.विधवा महिला लाभार्थी या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला मुलगा असल्यास आणि तो २५ वर्षांचा झाल्यास या अर्थसाहाय्याचा लाभ बंद होतो. यासाठी संबंधित मुलाच्या जन्माचा, शाळेचा दाखला जोडण्याची सक्ती होते. आता या दाखल्याची चौकशी व तपासणी होणार आहे. मुली असल्यास मात्र या योजनेचा लाभ घेता येणे शक्य होईल. दिव्यांगलाभार्थ्यांना त्यांच्या बँक पासबुकच्या इंट्रीच्या झेरॉक्सप्रती द्याव्या लागला आहे. यामुळे या खात्यातील त्यातील व्यवहारास अनुसरून तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थी अन्य योजनांचाही लाभ घेतात का, याची पडताळणी होईल. जिल्ह्यातील या केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अर्थसाहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांचे व सर्वेक्षण आणि पडताळणी कोरोनामुळे रखडली होती. पण आता यानुसार लवकरच जिल्ह्यात तपासणी करून बोगस लाभार्थ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल.- शीतल जाधव, तहसीलदार, ठाणे