शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

नाल्यात उडी घेणाऱ्या तरुणाचा मृतदेह अखेर पाच दिवसांनी मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

ठाणे : कौटुंबिक कलहातून ठाण्यातील उथळसर भागातील जीवन ओहाळ (३०) या तरुणाने उथळसर नाल्यात रविवारी पहाटेच्या सुमारास उडी घेतली ...

ठाणे : कौटुंबिक कलहातून ठाण्यातील उथळसर भागातील जीवन ओहाळ (३०) या तरुणाने उथळसर नाल्यात रविवारी पहाटेच्या सुमारास उडी घेतली होती. त्याचा मृतदेह गुरुवारी पाच दिवसांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हाती लागला.

मुसळधार पावसामुळे उथळसर नाल्याचाही प्रवाह वाढलेला असतानाच १८ जुलै रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास डॉ. आंबेडकर रोड येथील मीनाताई ठाकरे चौक, उथळसर नाल्यात त्याने वडिलांबरोबर झालेल्या भांडणातील रागाच्या भरात उडी घेतली. ही माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे अग्निशमन दल आणि आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) यांनी भर पावसात त्याला शोधण्यासाठी पहाटे मोहीम राबविली. परंतु, नाल्यातील पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे त्याचा शोध लागू शकला नव्हता. डॉ. आंबेडकर रोड जवळील नाला ते साकेतखाडी परिसरामध्ये हे शोधकार्य केले. पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे अखेर १८ तासांनी ही शोध मोहीम थांबविली होती. दरम्यान, २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कळवा, विटावा येथील गणेश विसर्जन घाटाजवळील खाडीमध्ये जीवनचा मृतदेह टीडीआारएफच्या पथकाला मिळाला. तो उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.