शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

डीजीकेम कंपनीवर मंडळाची कारवाई

By admin | Updated: June 30, 2017 02:44 IST

चिखलोली धरण क्षेत्रात रासायनिक कचरा टाकल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई सुरु केली आहे. प्राथमिक अहवालाच्या आधारावर

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : चिखलोली धरण क्षेत्रात रासायनिक कचरा टाकल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई सुरु केली आहे. प्राथमिक अहवालाच्या आधारावर हे रसायन याच परिसरातील डीजीकेम कंपनीचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कंपनीचे पाणी आणि वीज कापण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील सविस्तर अहवाल आल्यावर त्या अहवालाच्या आधारावर कंपनीवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातच ४८ टनपेक्षा जास्त रासायनिक कचरा टाकण्यात आला होता. पावसामुळे हे रसायन थेट धरणात जाणार होते. मात्र याची माहिती मिळाल्यावर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर या प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपली कारवाई सुरु करत टाकण्यात आलेल्या रसायनांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा प्राथमिक अहवाल पाहता हे रसायन एमआयडीसीच्या प्लॉट क्रमांक एन ७१ मधील डीजीकेम कंपनीतील असल्याचे समोर आले आहे. त्या आधारावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करत कंपनीचे पाणी आणि वीज जोडणी तोडण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. दरम्यान, या कंपनीतील टाकाऊ रसायन हे तळोजा येथील प्रक्रिया केंद्रात पाठवणे गरजेचे होते. मात्र तो खर्च वाचवण्यासाठी हे रसायन उघड्यावर टाकण्यात आले हाते. त्यामुळे प्रथमदर्शी आढळलेल्या तपासणीनुसार हा कचरा डीजीकेम कंपनीचाच असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण विभागीय मंडळाचे अधिकारी धनंजय पाटील यांनी सांगितले. चिखलोली धरणाजवळ हा कचरा आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.