शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

किसननगर क्लस्टरला झटका; श्रीनगरच्या ३८० इमारती वगळल्या, संघर्ष समिती आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 15:40 IST

रहिवाशांच्या विरोधानंतर ठामपचा निर्णय : संघर्ष समिती आक्रमक

ठाणे : किसननगरच्या क्लस्टर योजनेत मोठ्या रस्त्यांचे नियोजन केल्याने श्रीनगर वसाहतीमधील ३८०  इमारती बाधित होणार असून, याबाबत स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे  या क्लस्टरमधून श्रीनगरला वगळले असल्याची माहिती काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोज शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यापुढेही हा लढा सुरू ठेवणार असल्याचे संघर्ष समितीकडून यावेळी सांगण्यात आले. 

ठाणे महापालिका क्षेत्रातील बैठ्या चाळी, झोपड्या आणि बेकायदा इमारतींच्या पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना (क्लस्टर) राबविण्यासाठी प्रशासनाने काही वर्षांपूर्वी ४४ नागरी पुनरुथ्यान आराखडे तयार केले होते. यामध्ये श्रीनगर भागातील ३८० अधिकृत इमारतींचा समावेश केला आहे. त्यास स्थानिक नागरिकांच्या संघर्ष समितीने विरोध केल्यानंतर, महापालिका प्रशासनाने तातडीने ही वसाहत क्लस्टर योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे म्हणाले.

या योजनेसाठी महापालिकेने एकूण ४४ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार केले आहेत. या योजनेचा पहिला टप्पा किसननगर भागात राबविण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेकडून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार हालचाली सुरू आहेत.  श्रीनगर वसाहतीमधील रहिवाशांची संमती नसतानाही त्यांच्या वसाहतीचा क्लस्टर योजनेत समावेश केला आहे.  त्यास श्रीनगर क्लस्टर संघर्ष समितीने विरोध करताच पालिकेने तातडीने ही वसाहत क्लस्टरमधून वगळण्याचा निर्णय घेऊन, त्यासंबंधीचे पत्रही त्यांना दिले आहे.

बैठकीनंतर रहिवाशांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

१२ सप्टेंबरला श्रीनगर क्लस्टर संघर्ष समितीचे अध्यक्ष देवीदास चाळके, सेक्रेटरी अरुण शिंपी आणि विकासक तुकाराम शिंदे यांनी रहिवाशांची बैठक आयोजिली होती. त्यास वसाहतीमधील इमारतीचे २८६ पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे लगेचच महापालिकेत अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या वसाहत क्लस्टर योजनेतून वगळण्याची मागणी केली. ती महापालिकेनेही मान्य केली आहे, अशी माहिती मनोज शिंदे यांनी शुक्रवारी दिली. ही वसाहत क्लस्टर योजनेतून वगळण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त डाॅ. विपीन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के यांनी सहकार्य केले, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे