शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची नाकेबंदी, कुलगुरूंना दिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:22 IST

मुंबई विद्यापीठाने आॅक्टोबर महिन्यात करण्यात येणारी प्रवेशप्रक्रिया बंद केली आहे.

ठाणे : मुंबई विद्यापीठाने आॅक्टोबर महिन्यात करण्यात येणारी प्रवेशप्रक्रिया बंद केली आहे. ती तत्काळ सुरू न केल्यास आगामी आठ दिवसांनंतर मुंबई विद्यापीठ आणि शिक्षणमंत्र्यांविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मोहसीन शेख यांनी दिला. यासंदर्भात त्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले.मुंबई विद्यापीठामध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता मागील वर्षी जानेवारी २०१७ या महिन्यापर्यंत दोन वेळा मुदतवाढ दिली होती. त्याचा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक लाभ घेतला. परंतु, यावर्षी २० आॅक्टोबर २०१८ रोजीच शैक्षणिक प्रवेश बंद केले आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी मोहसीन शेख यांनी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र देऊन या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात देऊन विद्यापीठ प्रशासनाने पुढील आठ दिवसांत याबाबत योग्य तो ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.>अभ्यासक्रम बंद केल्याने ६० लाखांचे नुकसान?मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागातर्फे पाच अभ्यासक्र म चालवले जातात. यापैकी मास्टर आॅफ आर्ट्स (इलेक्ट्रॉनिक मीडिया), मास्टर आॅफ आर्ट्स (टेलिव्हिजन स्टडीज) आणि मास्टर आॅफ आर्ट्स (फिल्म स्टडीज) हे अभ्यासक्र म एक वर्षासाठी बंद करण्याचा निर्णय विभागप्रमुखांनी घेतल्याचे समजते. त्यासंदर्भात नुकतेच विभागाने कुलगुरूंना पत्र लिहून याची कल्पना दिली आहे.हे अभ्यासक्रम चालवणारे मुंबई विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. ते बंद केल्यामुळे विद्यापीठाचे ६० लाखांचे नुकसान होणार आहे. या तिन्ही अभ्यासक्र मांमध्ये प्रत्येकी २० या प्रमाणे ६० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. मात्र, ते बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. हे अभ्यासक्र मही तत्काळ सुरू करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.