शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

खाजगी बसेसना आरटीओचा आशीर्वाद : टीएमटीच्या बैठकीत प्रशासनाचा आरोप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:18 IST

ठाणे परिवहन सेवेत सुधारणा झाल्यानंतर खाजगी बस बंद होतील असा दावा प्रशासनाकडून केला जात होता. परंतु, अवस्था सुधारल्यानंतरही खाजगी बसवर कारवाई का होत नाही, त्यांना पाठबळ कोणाचे मिळत आहे, असे अनेक सवाल करून परिवहन समितीच्या बैठकीत विरोधकांनी या बसवर कारवाईची मागणी केली.

ठाणे : ठाणे परिवहन सेवेत सुधारणा झाल्यानंतर खाजगी बस बंद होतील असा दावा प्रशासनाकडून केला जात होता. परंतु, अवस्था सुधारल्यानंतरही खाजगी बसवर कारवाई का होत नाही, त्यांना पाठबळ कोणाचे मिळत आहे, असे अनेक सवाल करून परिवहन समितीच्या बैठकीत विरोधकांनी या बसवर कारवाईची मागणी केली. प्रशासन कारवाई करण्यास तयार आहे, परंतु, आरटीओकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याने ती करणे शक्य होत नसल्याचे परिवहन प्रशासनाने व्यक्त केले. असे असले तरी एका आठवड्याच्या आत आरटीओ आणि परिवहन संयुक्त पाहणी करूनही कारवाई करण्याचे आश्वासन प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिले.टीएमटीच्या उडालेल्या बोजवाºयाचा फायदा घेऊन मागील कित्येक वर्षांपासून खाजगी बसचालकांनी आपला धंदा घोडबंदर मार्गावर तेजीत सुरु केला. यामध्ये आरटीओसह वाहतूक पोलिसांचेही त्यांनी बांधून घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून फारशीा कारवाई होतांना दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी कोपरीतील रहिवाशांनीच रस्त्यावर उतरुन या बसेस विरुद्ध एल्गार पुकारला होता. त्यानंतर काही दिवस त्या बंद होत्या. परंतु, पुन्हा त्यांनी नौपाड्यात शिरकाव केला. काही बस, गावदेवी तर काही नौपाड्यातून सुटू लागल्या होत्या. काही दिवसानंतर, वातावरण शांत झाल्यानंतर त्यांनी वेग पकडण्यास सुरवात केली आहे.दरम्यान, परिवहनचा कारभार सुधारल्यानंतर त्या बंद होतील असा दावा परिवहन प्रशासनाने केला होता. परंतु, आज परिवहनचा कारभार बºयापैकी सुधारला आहे. टप्प्याटप्प्याने बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होत आहेत, इलेक्ट्रीक, इथेनॉल, तेजस्वीनी अशा अनेक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे परिवहनचा कारभार नक्कीच सुधारण्यास मदत होणार आहे. असे असतांनादेखील खाजगी बसवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल काँगे्रसचे सदस्य सचिन शिंदे यांनी केला. त्याला शिवसेनेचे राजेश मोरे यांनी देखील पाठिंबा देऊन मागील महिन्यात यावर चर्चा झाली होती. परंतु, अद्यापही कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली.आरटीओकडून पत्राला प्रतिसाद नाहीखासगी बसवर कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाकडून आरटीओला पत्र व्यवहार केला आहे. परंतु, त्यांच्याकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संबधींत विभागाच्या अधिकाºयांशी भेट घेऊन पुढील आठवड्यात संयुक्तपणे पाहणी करून या बसवर कारवाई करण्याचे आश्वासन माळवी यांनी दिले.