शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या स्वच्छ भारत मिशनला भाजपचा सुरुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:25 IST

डम्पिंगचा प्रश्न सोडवा : तोपर्यंत कचराकोंडीच्या नोटिसा मागे घ्या

ठाणे : प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याची निर्मिती करणाºया आस्थापना, तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी आहे त्याच ठिकाणी कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे बंधन ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा घातल्याने सोसायट्यांनी त्यास विरोध केला आहे. यामुळे मतांच्या बेगमीसाठी गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेने घेतला आहे. आता भाजपनेदेखील महापालिकेचे कान टोचताना आधी डम्पिंगचा प्रश्न सोडवा मग इतरांना शिस्त लावा, असा सल्ला देऊन सोसायट्यांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनला एकप्रकारे सुरुंग लावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने सर्व्हे करून प्रभाग समितीमधील तब्बल ४२५ हून अधिक सोसायट्या, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींना नोटीसा बजावून येत्या १५ दिवसांत कचºयाची विल्हेवाट लावली नाही तर त्यांची कचराकोंडी करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, कामचुकार ठेकेदारांना समज देण्याऐवजी सत्ताधारी शिवसेनेने या सोसायट्यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी तसे सूतोवाच यापूर्वीच केले आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी होणाºया महासभेत हा मुद्दा गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.महानगरपालिकेने आधी स्वत:लाच शिस्त लावण्याची गरजशिवसेनेपाठोपाठ आता भाजपसुद्धा या कचºयाच्या लढ्यात उतरली असून, त्यांनी महापालिकेच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याऐवजी उलट कान टोचण्याचे काम केले आहे. शहरात एवढा कचरा जमा होत असताना त्याची विल्हेवाट लावणे पालिकेला शक्य होत नाही, डम्पिंग ग्राऊंड मिळविता आलेले नाही, ओला, सुका कचरा वेगळा गोळा केला जात असला तरी डम्पिंगवर तो एकत्रितच टाकला जात आहे. त्यामुळे आधी पालिकेने स्वत: यावर योग्य तो पर्याय द्यावा, मगच सोसायट्यांना शिस्त लावावी, असे सांगून नोटिसा मागे घेण्याची मागणी केली जात आहे. भाजपने ही मागणी करुन मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनच्या तत्वांना हरताळ फासल्याची टीका आता होऊ लागली आहे. येत्या काळात कचºयाचा मुद्दा आणखी गाजणार असल्याचे दिसत आहे.