शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

मोदींच्या स्वच्छ भारत मिशनला भाजपचा सुरुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:25 IST

डम्पिंगचा प्रश्न सोडवा : तोपर्यंत कचराकोंडीच्या नोटिसा मागे घ्या

ठाणे : प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याची निर्मिती करणाºया आस्थापना, तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी आहे त्याच ठिकाणी कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे बंधन ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा घातल्याने सोसायट्यांनी त्यास विरोध केला आहे. यामुळे मतांच्या बेगमीसाठी गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेने घेतला आहे. आता भाजपनेदेखील महापालिकेचे कान टोचताना आधी डम्पिंगचा प्रश्न सोडवा मग इतरांना शिस्त लावा, असा सल्ला देऊन सोसायट्यांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनला एकप्रकारे सुरुंग लावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने सर्व्हे करून प्रभाग समितीमधील तब्बल ४२५ हून अधिक सोसायट्या, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींना नोटीसा बजावून येत्या १५ दिवसांत कचºयाची विल्हेवाट लावली नाही तर त्यांची कचराकोंडी करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, कामचुकार ठेकेदारांना समज देण्याऐवजी सत्ताधारी शिवसेनेने या सोसायट्यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी तसे सूतोवाच यापूर्वीच केले आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी होणाºया महासभेत हा मुद्दा गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.महानगरपालिकेने आधी स्वत:लाच शिस्त लावण्याची गरजशिवसेनेपाठोपाठ आता भाजपसुद्धा या कचºयाच्या लढ्यात उतरली असून, त्यांनी महापालिकेच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याऐवजी उलट कान टोचण्याचे काम केले आहे. शहरात एवढा कचरा जमा होत असताना त्याची विल्हेवाट लावणे पालिकेला शक्य होत नाही, डम्पिंग ग्राऊंड मिळविता आलेले नाही, ओला, सुका कचरा वेगळा गोळा केला जात असला तरी डम्पिंगवर तो एकत्रितच टाकला जात आहे. त्यामुळे आधी पालिकेने स्वत: यावर योग्य तो पर्याय द्यावा, मगच सोसायट्यांना शिस्त लावावी, असे सांगून नोटिसा मागे घेण्याची मागणी केली जात आहे. भाजपने ही मागणी करुन मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनच्या तत्वांना हरताळ फासल्याची टीका आता होऊ लागली आहे. येत्या काळात कचºयाचा मुद्दा आणखी गाजणार असल्याचे दिसत आहे.