शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मुख्यमंत्र्यांशी भाजपाची फारकत

By admin | Updated: March 26, 2017 04:45 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केडीएमसीमध्ये समाविष्ट केलेली २७ गावे वगळणार असल्याचे आश्वासन शुक्रवारीच संघर्ष

कल्याण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केडीएमसीमध्ये समाविष्ट केलेली २७ गावे वगळणार असल्याचे आश्वासन शुक्रवारीच संघर्ष समितीला दिले असताना भाजपाच्या ४२ नगरसेवकांनी शनिवारी ही गावे वगळण्याची मागणी महासभेत फेटाळून लावली. त्यामुळे गावे वगळण्याच्या मुद्यावर कल्याण-डोंबिवलीतील भाजपाची भूमिका ही मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी विसंगत असल्याचे उघड झाले आहे.महापालिकेत समाविष्ट केलेली २७ गावे वगळावी, अशी सभा तहकुबीची सूचना मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी शनिवारी मांडली. गावे वगळण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले असल्याने आता भाजपा कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे भाजपा आणि शिवसेनेने तीव्र विरोध करून मनसेची मागणी फेटाळून लावली. गावे केडीएमसीत आल्याने त्यांचा विकास होईल, अशी शिवसेनेची पूर्वीपासून भूमिका होती. भाजपाचे काही नेते गावे वगळवीत, तर काही नेते गावे समाविष्ट करावीत, अशी भूमिका घेत होते. (प्रतिनिधी) गावे वगळण्याच्या मागणीवर तीन याचिका उच्च न्यायालयात आहेत. त्याचा निकाल दोन आठवड्यांत अपेक्षित आहे. गावे वगळण्यास २७ गावांतील २२ प्रभागांतील नगरसेवकांचा विरोध आहे. त्यामुळे गावांबाबत संभ्रम आहे. केडीएमसीतून गावे वगळावीत, अशी सभा तहकुबीची सूचना हळबे यांनी महासभेत मांडली. तिला शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. हा विषय मताला टाकण्याची मागणी हळबे यांनी केली. परंतु, मतदान न घेताच नगरसेवकांचा विरोध पाहता ही मागणी फेटाळून लावल्याचे महापौर देवळेकर यांनी स्पष्ट केले.२७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, या मागणीसाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. न्यायालयाचा निकाल येण्याआधीच गावे वगळली जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. - गुलाब वझे, संघर्ष समिती उपाध्यक्ष.