शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भाजपाने केली आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:14 IST

शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकांची राज्यातील भाजपा सरकारकडून कशी आर्थिक कोंडी होते

कल्याण : शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकांची राज्यातील भाजपा सरकारकडून कशी आर्थिक कोंडी होते, यावरुन येत्या काही दिवसांत शिवसेना राजकीय वातावरण तापवणार असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत. केंद्र सरकारने गुडस अँड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) लागू केल्यावर ही परिस्थिती अधिकच बिकट बनल्याचे चित्र असल्याने शिवसेना आक्रमक होणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारण्याच्या विचारात असल्याचे दिसत आहे.केडीएमसीतील विकासकामे रखडल्याने अलीकडेच शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त वेलरासू यांच्या दालनात उग्र आंदोलन केले. आयुक्तांच्या दरवाजावर लाथा मारणे, खुर्च्या तोडणे असे प्रकार केले. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची कानउघाडणी करण्याऐवजी ठाकरे यांनी सोमवारी शिवसेना नगरसेवकांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक वचननाम्यातील किती विकासकामे झाली आहेत, याची विचारणा केली. कामे होण्यात अडथळे असल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी नगरसेवकांना दिले. त्यानुसार २३ अथवा २४ आॅगस्टला सर्व शिवसेना नगरसेवकांसह ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी दिली.महापौर राजेंद्र देवळेकर, व नेत्यांसह शिवसेनेचे सर्व ५५ सदस्य या वेळी उपस्थित होते. महापालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने विकासकामे करणाºया कंत्राटादारांची १०० कोटींची बिले थकली आहेत. ती अदा केली जात नसल्याने कंत्राटदार विकासकामांचा पुढील टप्पा पूर्ण करत नाहीत.देवळेकर यांनी सांगितले की, महापालिका हद्दीत एलबीटी कराची वसुली बंद आहे. त्यापोटी महापालिकेस राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान डिसेंबर, जून आणि फेब्रुवारीमध्ये मिळालेले नाही. महापालिका हद्दीत सरकारने २७ गावे समाविष्ट केली. त्यापोटी १९८ कोटी रुपये तसेच एलबीटीची रक्कम द्यावी, अशी महापालिकेची मागणी आहे. त्याची पूर्तता सरकारने अद्याप केलेली नाही. २०१५ मध्ये घनकचºयावरील याचिकेप्रकरणी न्यायालयाने नव्या इमारतींच्या बांधकाम परवानगीवर बंदी आणली होती. त्यामुळे विकासाला आळा बसला होता. त्यातून कर रूपात येणारा पैसा महापालिकेस मिळालाच नाही.महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर विविध निवडणुकीच्या आचारसंहिता विकासकामांचे निर्णय घेण्याच्या आड आल्या. त्यात आयुक्त ई. रवींद्रन हे ट्रेनिंगला गेले. नवे आयुक्त वेलारासूही ट्रेनिंगला गेले. त्यामुळे महापालिकेतील आर्थिक घडी नीट होण्याऐवजी बिघडली. आतापर्यंत कोणती विकासकामे केली आहेत, याची माहिती देवळेकर यांनी ठाकरे यांना दिली. मात्र महत्त्वाची कामे कोणती, ती का रखडली आहेत, याचा सविस्तर अहवाल तयार करून द्या, असे ठाकरे यांनी पदाधिकाºयांना सांगितले आहे. वचननाम्याचतील किती कामे पूर्ण झाली. वचननाम्यात सिटी पार्क उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे पुढे काय झाले, याविषयी ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला.>महापालिकेची कोंडी मुख्यमंत्र्यांकडूनच का ?महापालिकेची आर्थिक कोंडी भाजपा सरकारने केल्याने शिवसेनेचे नगरसेवक हतबल झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी आंदोलने केली. या आर्थिक कोंडीचा फटका केवळ शिवसेना सदस्यांना बसलेला नसून, सत्तेतील सहभागी पक्ष भाजपाच्या सदस्यांनाही तितकाच बसला आहे . मात्र त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या कामांकरिता फिल्डींग लावली आहे. आधी कोंडी करायची. मग ती सोडवण्याचे श्रेय घ्यायचे, शिवसेनेवर भाजपा कसे वर्चस्व गाजवत आहे, तसेच शिवसेनेचा महापौर असलेल्या महापालिकेत भाजपा सरकारकडून कशी कोंडी केली जाते, हे दाखवायचा, हा प्रयत्न असल्याची चर्चा भाजपा नगरसेवक करीत आहेत.>भेटीमुळे महापौर बदलाच्या चर्चेला उधाणशिवसेना नगरसेवक व पदाधिकारी यांची ठाकरे भेट महापौर बदलासाठी असल्याची चर्चा महापालिकेत होती. प्रत्यक्षात या भेटीदरम्यान महापौर बदलाच्या विषयावर चर्चाच झालेली नाही. विकासकामे ठप्प झाल्याने सदस्य आयुक्त दालनात आंदोलन करतात. त्यामुळे देवळेकर यांच्याकडून राजीनामा घेतला जाणार आहे.त्यानंतर शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांना महापौरपद दिले जाणार आहे. त्यासाठी शिवसेनेतील एक गट सक्रीय आहे. याशिवाय देवळेकर यांच्याविरोधात न्यायालयात प्रलंबित प्रकरणावर २१ आॅगस्टला सुनावणी आहे. त्याआधीच त्यांचा राजीनामा घेऊन महापौर बदली केला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र ‘मातोश्री’वर महापौर बदलाच्या विषयाला पूर्णपणे बगल दिली गेली.