शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची ६७ जागांची मागणी

By admin | Updated: January 15, 2017 05:18 IST

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानुसार जागावाटप करण्याची भाजपाची मागणी मान्य करायची झाली, तर शिवसेनेला ठाण्यात भाजपाला १३१ पैकी ६७ जागा सोडाव्या लागतीत, असे

- अजित मांडके, ठाणेविधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानुसार जागावाटप करण्याची भाजपाची मागणी मान्य करायची झाली, तर शिवसेनेला ठाण्यात भाजपाला १३१ पैकी ६७ जागा सोडाव्या लागतीत, असे त्या पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांना हा दावा मान्य नसून मागील महापालिका निवडणुकीनुसार जागावाटप करायचे झाले, तर भाजपाला त्यांच्या विद्यमान नगरसेवकांखेरीज दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या वॉर्डांत संधी दिली जाऊ शकते, असे शिवसेनेचे मत आहे.विधानसभा निवडणुकीत तब्बल २९ वर्षांनंतर भाजपाने ठाणे शहर हा विधानसभा मतदारसंघ काबीज केला. त्यामुळे भाजपाला येथे असलेल्या १९ जागांपैकी निम्म्या जागा हव्या आहेत. कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा या मतदारसंघांत विधानसभेत भाजपाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. कळवा-मुंब्रा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील जागावाटपही निम्मेनिम्मे व्हावे, अशी भाजपाची मागणी आहे. दिव्यातील ११ जागांमध्ये वाटप न करता त्या सर्वच्या सर्व लढवण्याची भाजपाची इच्छा आहे. भाजपाची एकूण जागांची मागणी ६७ ते ६८ जागांपर्यंत जाते. मागील वेळी भाजपाने शिवसेनेकडे २४ जागांची मागणी केली होती. प्र्रत्यक्षात २२ जागांवर निवडणूक लढवली होती व त्यांचे केवळ आठ नगरसेवक विजयी झाले होते.विधानसभेचा ठाणे शहर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात शिवसेनेचे तब्बल १७ नगरसेवक आहेत, तर भाजपाचे केवळ ३ नगरसेवक आहेत. त्यामुळे विधानसभेला भाजपा शिवसेनेचा हा गड सर करूशकत नाही, अशी चर्चा होती. परंतु, केवळ तीन नगरसेवकांच्या जोरावर भाजपाने हा गड सर करून दाखवला. नौपाड्यात संजय वाघुले, सुहासिनी लोखंडे आणि मिलिंद पाटणकर हे तिघे भाजपाचे नगरसेवक आहेत. परंतु, येथील नगरसेवकांच्या निम्म्याहून अधिक प्रभागांत भाजपाला क्रमांक एकची मते मिळाली आहेत. आता त्याच आधारे येथून निम्म्या जागांची मागणी भाजपा करीत आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघाचा विचार केल्यास येथून विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजय पांडे यांना ५७ हजार ६६५ मते मिळाली होती. नवखा चेहरा असतानाही पांडे यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांना १८ व्या फेरीपर्यंत घाम फोडला होता. येथील २४ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे १५, मनसेचे दोन, तीन अपक्ष, राष्ट्रवादी दोन आणि एका जागेवर काँग्रेसने विजय मिळवला होता. या मतदारसंघातही विधानसभेला भाजपाने ५० हजारांहून अधिकची मते मिळवली असल्याने आता त्यांच्यासाठी या पट्ट्यातील वातावरण पोषक असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे या भागातही ते शिवसेनेकडे १२ जागा मागत आहेत. कळवा-मुंब्रा मतदारसंघात विधानसभेला भाजपाला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या भागात भाजपाचा एकही नगरसेवक नाही. परंतु, येथेही त्यांना निम्म्या जागांचीच अपेक्षा आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपरी -पाचपाखाडी मतदारसंघातही भाजपाने विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. भाजपाचे संदीप लेले यांना ४८ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. त्यामुळे आता येथेही भाजपाने समसमान मागणी रेटली आहे. सध्या कोपरी-पाचपाखाडीमध्ये भाजपाचे फारसे नगरसेवक नसले, तरीदेखील आता भरत चव्हाण, विलास कांबळे यांनी भाजपाचा रस्ता धरल्याने भाजपाने हा आग्रह धरला आहे. शिवसेनेला विधानसभेनुसार जागावाटप नकोच१भाजपाचे जागावाटपाचे दावे शिवसेनेला बिलकुल मान्य नाहीत. मागील निवडणुकीत भाजपाने जिंकलेल्या व त्यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या जागा असल्यास त्याच त्यांना सोडण्याबाबत चर्चा होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून संजय केळकर निवडून आले. मात्र, त्यांचे या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालेले असल्याने तेथे शिवसेनेला लाभ मिळेल, असे त्या पक्षाच्या नेत्यांचे मत आहे.२केळकर हे नेतृत्व करण्यात अपुरे पडत असल्यानेच खा. कपिल पाटील व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना त्यांच्या मदतीला धाडले आहे. भाजपाच्या ठाण्यातील नेत्यांचे एकमेकांशी जमत नाही. कपिल पाटील त्यांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे घोडे पुढे दामटत असल्याने भाजपात नाराजी आहे. अशा विस्कळीत व नेतृत्वहीन पक्षाने निम्म्या जागांची मागणी करणे हास्यास्पद असल्याचे मत शिवसेनेच्या एका नेत्याने व्यक्त केले.