शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाजपाची ६७ जागांची मागणी

By admin | Updated: January 15, 2017 05:18 IST

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानुसार जागावाटप करण्याची भाजपाची मागणी मान्य करायची झाली, तर शिवसेनेला ठाण्यात भाजपाला १३१ पैकी ६७ जागा सोडाव्या लागतीत, असे

- अजित मांडके, ठाणेविधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानुसार जागावाटप करण्याची भाजपाची मागणी मान्य करायची झाली, तर शिवसेनेला ठाण्यात भाजपाला १३१ पैकी ६७ जागा सोडाव्या लागतीत, असे त्या पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांना हा दावा मान्य नसून मागील महापालिका निवडणुकीनुसार जागावाटप करायचे झाले, तर भाजपाला त्यांच्या विद्यमान नगरसेवकांखेरीज दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या वॉर्डांत संधी दिली जाऊ शकते, असे शिवसेनेचे मत आहे.विधानसभा निवडणुकीत तब्बल २९ वर्षांनंतर भाजपाने ठाणे शहर हा विधानसभा मतदारसंघ काबीज केला. त्यामुळे भाजपाला येथे असलेल्या १९ जागांपैकी निम्म्या जागा हव्या आहेत. कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा या मतदारसंघांत विधानसभेत भाजपाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. कळवा-मुंब्रा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील जागावाटपही निम्मेनिम्मे व्हावे, अशी भाजपाची मागणी आहे. दिव्यातील ११ जागांमध्ये वाटप न करता त्या सर्वच्या सर्व लढवण्याची भाजपाची इच्छा आहे. भाजपाची एकूण जागांची मागणी ६७ ते ६८ जागांपर्यंत जाते. मागील वेळी भाजपाने शिवसेनेकडे २४ जागांची मागणी केली होती. प्र्रत्यक्षात २२ जागांवर निवडणूक लढवली होती व त्यांचे केवळ आठ नगरसेवक विजयी झाले होते.विधानसभेचा ठाणे शहर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात शिवसेनेचे तब्बल १७ नगरसेवक आहेत, तर भाजपाचे केवळ ३ नगरसेवक आहेत. त्यामुळे विधानसभेला भाजपा शिवसेनेचा हा गड सर करूशकत नाही, अशी चर्चा होती. परंतु, केवळ तीन नगरसेवकांच्या जोरावर भाजपाने हा गड सर करून दाखवला. नौपाड्यात संजय वाघुले, सुहासिनी लोखंडे आणि मिलिंद पाटणकर हे तिघे भाजपाचे नगरसेवक आहेत. परंतु, येथील नगरसेवकांच्या निम्म्याहून अधिक प्रभागांत भाजपाला क्रमांक एकची मते मिळाली आहेत. आता त्याच आधारे येथून निम्म्या जागांची मागणी भाजपा करीत आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघाचा विचार केल्यास येथून विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजय पांडे यांना ५७ हजार ६६५ मते मिळाली होती. नवखा चेहरा असतानाही पांडे यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांना १८ व्या फेरीपर्यंत घाम फोडला होता. येथील २४ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे १५, मनसेचे दोन, तीन अपक्ष, राष्ट्रवादी दोन आणि एका जागेवर काँग्रेसने विजय मिळवला होता. या मतदारसंघातही विधानसभेला भाजपाने ५० हजारांहून अधिकची मते मिळवली असल्याने आता त्यांच्यासाठी या पट्ट्यातील वातावरण पोषक असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे या भागातही ते शिवसेनेकडे १२ जागा मागत आहेत. कळवा-मुंब्रा मतदारसंघात विधानसभेला भाजपाला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या भागात भाजपाचा एकही नगरसेवक नाही. परंतु, येथेही त्यांना निम्म्या जागांचीच अपेक्षा आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपरी -पाचपाखाडी मतदारसंघातही भाजपाने विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. भाजपाचे संदीप लेले यांना ४८ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. त्यामुळे आता येथेही भाजपाने समसमान मागणी रेटली आहे. सध्या कोपरी-पाचपाखाडीमध्ये भाजपाचे फारसे नगरसेवक नसले, तरीदेखील आता भरत चव्हाण, विलास कांबळे यांनी भाजपाचा रस्ता धरल्याने भाजपाने हा आग्रह धरला आहे. शिवसेनेला विधानसभेनुसार जागावाटप नकोच१भाजपाचे जागावाटपाचे दावे शिवसेनेला बिलकुल मान्य नाहीत. मागील निवडणुकीत भाजपाने जिंकलेल्या व त्यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या जागा असल्यास त्याच त्यांना सोडण्याबाबत चर्चा होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून संजय केळकर निवडून आले. मात्र, त्यांचे या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालेले असल्याने तेथे शिवसेनेला लाभ मिळेल, असे त्या पक्षाच्या नेत्यांचे मत आहे.२केळकर हे नेतृत्व करण्यात अपुरे पडत असल्यानेच खा. कपिल पाटील व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना त्यांच्या मदतीला धाडले आहे. भाजपाच्या ठाण्यातील नेत्यांचे एकमेकांशी जमत नाही. कपिल पाटील त्यांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे घोडे पुढे दामटत असल्याने भाजपात नाराजी आहे. अशा विस्कळीत व नेतृत्वहीन पक्षाने निम्म्या जागांची मागणी करणे हास्यास्पद असल्याचे मत शिवसेनेच्या एका नेत्याने व्यक्त केले.