शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भाजपाला निवडल्याची भोगा फळे

By admin | Updated: May 1, 2017 06:22 IST

डोंबिवलीत गेल्यावर्षी झालेल्या प्रोबेस कंपनीतील स्फोट प्रकरणात मालमत्तेचे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून अद्याप

डोंबिवली : डोंबिवलीत गेल्यावर्षी झालेल्या प्रोबेस कंपनीतील स्फोट प्रकरणात मालमत्तेचे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ती मिळवून देऊ, असे आश्वासन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी दिले. मात्र ते देतानाच ‘भाजपाला निवडून दिलेत, भोगा आता आपल्या कर्माची फळे,’ अशा शब्दांत त्यांनी नागरिकांना फटकारले. नुकसान झालेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. तेव्हा ते बोलत होते. राज ठाकरे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त रविवारी डोंबिवलीत आले होते. अरुण भोसले यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्यावर राज यांनी एंकदर प्रकरण समजून गेतले. भरपाईचा मुद्दा कशामुळे अडला आहे, त्याची माहिती घेतली. नंतर मात्र त्यांनी शिष्टमंडळाशी बोलताना मनसेला निवडून न दिल्याबद्दल त्रागा केला. भाजपाला निवडून दिलेत ना, भोगा आता कर्माची फळे, अशा शब्दांत त्यांनी शिष्टमंडळातील सदस्यांना फटकारले. मुख्यमंत्री हे थापामंत्री आहेत, तरीही तुमच्यासाठी मी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नुकसानभरपाईचा प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील, उपाध्यक्ष राजेश कदम, शहराध्यक्ष मनोज घरत, गटनेते मंदार हळबे आदी उपस्थित होते. प्रोबेस कंपनीत गेल्यावर्षी २६ मे रोजी स्फोट झाला होता. त्यात १२ जण मृत्युमुखी पडले. या स्फोटामुळे दोन हजार ६६४ मालमत्तांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे कल्याण तहसील कार्यालयाकडून करण्यात आले. सात कोटी ४३ लाख रुपये नुकसान भरपाईपोटी नागरिकांना देण्यासाठी हे पंचनामे केले गेले असले, तरी मुख्यमंत्र्यांच्या निधीतून ही नुकसानभरपाईची रक्कम दिली गेलेली नाही. त्यासाठी मनसेने नागरिकांकडून माहिती मागविली आहे. त्यांचे एक निवेदन पुन्हा कल्याणच्या तहसीलदारांना दिले जाणार आहे. येत्या २६ मेच्या आत म्हणजेच दुर्घटनेला वर्ष पूर्ण होण्याच्या आत भरपाई दिली गेली नाही. तर मनसेच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेने यापूर्वीच दिला आहे. (प्रतिनिधी)