शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

भाजपाला निवडल्याची भोगा फळे

By admin | Updated: May 1, 2017 06:22 IST

डोंबिवलीत गेल्यावर्षी झालेल्या प्रोबेस कंपनीतील स्फोट प्रकरणात मालमत्तेचे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून अद्याप

डोंबिवली : डोंबिवलीत गेल्यावर्षी झालेल्या प्रोबेस कंपनीतील स्फोट प्रकरणात मालमत्तेचे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ती मिळवून देऊ, असे आश्वासन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी दिले. मात्र ते देतानाच ‘भाजपाला निवडून दिलेत, भोगा आता आपल्या कर्माची फळे,’ अशा शब्दांत त्यांनी नागरिकांना फटकारले. नुकसान झालेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. तेव्हा ते बोलत होते. राज ठाकरे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त रविवारी डोंबिवलीत आले होते. अरुण भोसले यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्यावर राज यांनी एंकदर प्रकरण समजून गेतले. भरपाईचा मुद्दा कशामुळे अडला आहे, त्याची माहिती घेतली. नंतर मात्र त्यांनी शिष्टमंडळाशी बोलताना मनसेला निवडून न दिल्याबद्दल त्रागा केला. भाजपाला निवडून दिलेत ना, भोगा आता कर्माची फळे, अशा शब्दांत त्यांनी शिष्टमंडळातील सदस्यांना फटकारले. मुख्यमंत्री हे थापामंत्री आहेत, तरीही तुमच्यासाठी मी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नुकसानभरपाईचा प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील, उपाध्यक्ष राजेश कदम, शहराध्यक्ष मनोज घरत, गटनेते मंदार हळबे आदी उपस्थित होते. प्रोबेस कंपनीत गेल्यावर्षी २६ मे रोजी स्फोट झाला होता. त्यात १२ जण मृत्युमुखी पडले. या स्फोटामुळे दोन हजार ६६४ मालमत्तांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे कल्याण तहसील कार्यालयाकडून करण्यात आले. सात कोटी ४३ लाख रुपये नुकसान भरपाईपोटी नागरिकांना देण्यासाठी हे पंचनामे केले गेले असले, तरी मुख्यमंत्र्यांच्या निधीतून ही नुकसानभरपाईची रक्कम दिली गेलेली नाही. त्यासाठी मनसेने नागरिकांकडून माहिती मागविली आहे. त्यांचे एक निवेदन पुन्हा कल्याणच्या तहसीलदारांना दिले जाणार आहे. येत्या २६ मेच्या आत म्हणजेच दुर्घटनेला वर्ष पूर्ण होण्याच्या आत भरपाई दिली गेली नाही. तर मनसेच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेने यापूर्वीच दिला आहे. (प्रतिनिधी)