शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

घरांच्या करमाफीवरून भाजपची आक्रमक भूमिका; महासभेत शिवसेनेला घेरले, सत्ताधारी निरुत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 04:00 IST

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी दिली जाईल, असे वचन दिले होते.

ठाणे : गुरुवारी भाजपने शहरभर बॅनर लावून शिवसेनेला ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी केव्हा? असा सवाल केला होता. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेतदेखील ‘क्या हुआ तेरा वादा’ म्हणत भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. ठाणेकरांना करमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तर काँग्रेसने किमान झोपडपट्टी भागात राहणाऱ्या तसेच दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना किमान तीन महिन्यांचा मालमत्ताकर माफ करावा, अशी मागणी केली. मात्र, यावरून सत्ताधारी शिवसेना निरुत्तर झालेली दिसली.गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी दिली जाईल, असे वचन दिले होते. त्याचीच आठवण भाजप आणि मनसेकडून करून दिली जातआहे.गुरुवारी याच मुद्द्यावरून मनसेने आंदोलन केले होते. तर भाजपने शहरभर बॅनर लावून शिवसेनेला या वचनाची आठवण करून दिलीहोती.त्यानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेत भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे, मिलिंद पाटणकर, भरत चव्हाण यांच्यासह इतर नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेनेला या मुद्द्यावरून चांगलेच घेरले. परंतु, यावर शिवसेनेकडून काहीच उत्तर मिळाले नाही.शिवसेना नगरसेविकांचा काँग्रेसला पाठिंबादुसरीकडे निवडणुकीत शिवसेनेने काय वचन दिले होते, ते आम्हाला माहीत नाही. मात्र, कोरोनामुळे अनेकांचे हाल झालेले आहेत, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, नोकºया गेल्या, पगार कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित विस्कटलेले आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागात राहणाºया किंवा दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना तीन महिन्यांसाठी मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केली. याला पाठिंबा देऊन तीन महिने नाही, तर पाच महिन्यांचा मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका विमल भोईर आणि मालती पाटील यांनी केली. परंतु, यावर योग्य असे उत्तर न मिळाल्याने मध्येच हा विषय थांबला गेला.

टॅग्स :thaneठाणे