शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

भाजपाने पालघर चिटिंग करून जिंकले- आदित्य ठाकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 05:15 IST

पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने चिटिंग केल्याने शिवसेना हरली. प्रत्यक्षात शिवसेना जिंकली आहे, अशी टीका शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली.

ठाणे : पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने चिटिंग केल्याने शिवसेना हरली. प्रत्यक्षात शिवसेना जिंकली आहे, अशी टीका शिवसेना नेतेतथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली. पालघरच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन होते, म्हणून भाजपा जिंकली. परंतु, सिनेटच्या निवडणुकीत आणिआता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बॅलेट पेपर असल्याने ही निवडणूक शिवसेना जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला.कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने संजय मोरे निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारासाठी सोमवारी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा रेमण्ड हॉल येथे आयोजित केला होता. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. जेव्हा शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढल्या, तेव्हा आपण जिंकलो आहोत. पालघरमध्येही खरेतर आपण जिंकलो आहोत. मात्र, ईव्हीएमने भाजपाच्या पदरात यशाचे माप टाकले. भाजपाच्या ‘चुनावी जुमल्या’विषयी बोलण्याचा आता कंटाळा आला असून दोन कोटी रोजगार देण्यावरही आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. उलट, नोटाबंदीमुळे ४० लाख रोजगार गेले, अशी टीका त्यांनी केली.आजच्या शिक्षणामुळे रोजगार मिळेल का, स्वयंरोजगार करता येईल का, याची खात्री तरुणांना राहिलेली नाही. त्यामुळेच शिवसेना शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम करत आहे. मुंबई विद्यापीठातील गोंधळाकरिता शिवसेनेमुळेच कुलगुरूंना राजीनामा द्यावा लागला, हे आपले मोठे यश आहे, असेही ते म्हणाले.शिवसैनिक पेटून उठला की काय होते, ते सिनेटच्या १० पैकी १० जागा जिंकून आपण दाखवले. त्यामुळेच विधान परिषदेच्याही अधिकाधिक जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.