शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने पालघर चिटिंग करून जिंकले- आदित्य ठाकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 05:15 IST

पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने चिटिंग केल्याने शिवसेना हरली. प्रत्यक्षात शिवसेना जिंकली आहे, अशी टीका शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली.

ठाणे : पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने चिटिंग केल्याने शिवसेना हरली. प्रत्यक्षात शिवसेना जिंकली आहे, अशी टीका शिवसेना नेतेतथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली. पालघरच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन होते, म्हणून भाजपा जिंकली. परंतु, सिनेटच्या निवडणुकीत आणिआता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बॅलेट पेपर असल्याने ही निवडणूक शिवसेना जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला.कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने संजय मोरे निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारासाठी सोमवारी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा रेमण्ड हॉल येथे आयोजित केला होता. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. जेव्हा शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढल्या, तेव्हा आपण जिंकलो आहोत. पालघरमध्येही खरेतर आपण जिंकलो आहोत. मात्र, ईव्हीएमने भाजपाच्या पदरात यशाचे माप टाकले. भाजपाच्या ‘चुनावी जुमल्या’विषयी बोलण्याचा आता कंटाळा आला असून दोन कोटी रोजगार देण्यावरही आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. उलट, नोटाबंदीमुळे ४० लाख रोजगार गेले, अशी टीका त्यांनी केली.आजच्या शिक्षणामुळे रोजगार मिळेल का, स्वयंरोजगार करता येईल का, याची खात्री तरुणांना राहिलेली नाही. त्यामुळेच शिवसेना शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम करत आहे. मुंबई विद्यापीठातील गोंधळाकरिता शिवसेनेमुळेच कुलगुरूंना राजीनामा द्यावा लागला, हे आपले मोठे यश आहे, असेही ते म्हणाले.शिवसैनिक पेटून उठला की काय होते, ते सिनेटच्या १० पैकी १० जागा जिंकून आपण दाखवले. त्यामुळेच विधान परिषदेच्याही अधिकाधिक जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.