शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेत भाजपा खाते उघडणार?

By admin | Updated: October 12, 2015 04:34 IST

कल्याण पूर्व भागातून भाजपाला या निवडणुकीत खाते उघडता येईल का? अशी चर्चा आहे. या भागात २०१० ते २०१५ या कार्यकाळात शिवसेनेचे

कोळसेवाडी : कल्याण पूर्व भागातून भाजपाला या निवडणुकीत खाते उघडता येईल का? अशी चर्चा आहे.या भागात २०१० ते २०१५ या कार्यकाळात शिवसेनेचे ११, मनसे ६, राष्ट्रवादी ५, काँग्रेस २ आणि अपक्ष १ असे बळ होते. त्यामध्ये काँग्रेसचे उदय रसाळ, राष्ट्रवादीचे विशाल पावशे व अपक्ष विक्रम तरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे, तर राष्ट्रवादीच्या माधुरी काळे व निलेश शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे संजीवनी प्राप्त झाल्याचा दावा भाजपा करते आहे. कल्याण पूर्वमधून वसंतराव सूर्यवंशी, रमाकांत उपाध्याय व ज्योती गाढवे तसेच नामदेव भोईर यांनी नगरसेवकपद भूषविले. मात्र, भविष्यात हा ठसा कायम ठेवता आला नाही. परिवहन समितीवर अविनाश निकम हे सदस्य होते, तर सध्या सुभाष म्हस्के हे सदस्य आहेत. गायकवाड यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. भाजपाचे अधिकाधिक लोकप्रतिनिधी निवडून आणण्याकरिता त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दणक्यात केले. अपेक्षित शक्तिप्रदर्शनही झाले. कल्याणमध्ये पूर्वभागातून शिवसेनेने ३ महापौर दिले. त्यांच्याच काळात आनंद दिघे उड्डाणपूल, प्रल्हाद शिंदे उड्डाणपूल, स्कायवॉक, १०० फुटी रस्ता, वालधुनी थ्रू बोगदा व सिमेंटच्या रस्त्याचे प्रकल्प राबवले असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे कल्याण पूर्व मतदार शिवसेनेचाच प्राधान्याने विचार करतील, असे त्यांचे मत आहे. तर, भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेच्या नियोजनशून्य कारभाराला लोक कंटाळले असून ते या वेळेस सत्तापरिवर्तन निश्चित घडवणार आहेत.कल्याण पूर्वमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यावर अपात्रतेच्या कायद्याचा बडगा उगारला गेला आहे, तर अभ्यासू नगरसेवक उदय रसाळ यांच्या मते संख्या वाढेल, असे चित्र नाही. तर, राष्ट्रवादी पक्षाचे विशाल पावशे भाजपामध्ये मागील विधानसभा निवडणुकीत गेले व निलेश शिंदे, माधुरी काळे शिवसेनेत गेले. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे अस्तित्व पूर्वमध्ये नगण्य झाले असून मनसेचे गड शाबूत राहणार की नाही, अशी शंका आहे. भाजपाला नव्याने कर्तबगार कार्यकर्ते निवडण्याची संधी आहे, तर शिवसेना त्याच चेहऱ्यांना संधी देऊ पहाते आहे.(वार्ताहर)