शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा पिते राष्ट्रवादीच्या बाटलीतून दूध - शिंदे

By admin | Updated: February 15, 2017 04:44 IST

राष्ट्रवादीचे नेते सकाळी जे बोलतात तेच मुख्यमंत्री रात्री ठाण्यात बोलतात. याचाच अर्थ भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये अंडरस्टँडीग

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते सकाळी जे बोलतात तेच मुख्यमंत्री रात्री ठाण्यात बोलतात. याचाच अर्थ भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये अंडरस्टँडीग असल्याचे दिसत असून, ही एक अभद्र युती असल्याचा टोला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. भाजपाकडे प्रचाराचे मुद्देच नसल्याने ते राष्ट्रवादीच्या बाटलीतून दूध पित असल्याचीही टीका त्यांनी केली. भाजपा न केलेल्या कामांचे तर श्रेय घेत आहे. ती गाजर दाखविणारी टोळीच असल्याचेही ते म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवा आणि उपवन येथे झालेल्या जाहीर सभांमध्ये केलेल्या अनेक दाव्यांचा आणि आरोपांचा समाचार घेतला. क्लस्टर डेव्हलपमेंट, मेट्रो, ठाण्यातील उड्डाणपूल, जलवाहतूक अशा अनेक कामांचे श्रेय मुख्यमंत्री स्वत:कडे घेत आहेत. परंतु, भाजपा सत्तेवर येण्यापूर्वीच यातील बहुतांश प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. क्लस्टर, मेट्रो, विस्तारित ठाणे स्थानक या प्रकल्पांसाठी कोणी प्रखर संघर्ष केला, हे ठाणेकरांना ठाऊक आहे. ठाण्यासाठी क्लस्टरचा निर्णय २८ फेब्रुवारी २०१४ रोजी झाला होता, त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री नव्हते. ठाण्यासाठी एसआरएचा मुद्दाही खोडून काढत ‘एसआरए’ची अधिसूचना ११ सप्टेंबर २०१४ रोजी निघाली होती याचे पुरावेच त्यांनी यावेळी सादर केले. शहरातील तीन उड्डाणपुलांच्या कामांच्या निविदा ठाणे महापालिकेने २०१४ च्या सप्टेंबर महिन्यात काढल्या असल्याची आठवण त्यांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली. त्यामुळे या तिन्ही प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न जनतेची दिशाभूल करणारा असून भाजपा ही केवळ गाजर दाखविणाऱ्यांची टोळी असल्याचा टोला त्यांनी लगावला. आमच्या हाती सत्ता द्या डम्पींग बंद करुन दाखवितो हे मुख्यमंत्र्यांचे विधानदेखील हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. जीतेंद्र आव्हाड यांना डंपिंग, मलिन:सारण, पाणीपुरवठा आदी मुद्यांवरून शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेचे मलिन:सारण प्रकल्प कोपरी आणि मुंब्रा येथे सुरू असून विटावा, माजिवडा आणि कोलशेत येथील प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दिव्यातील डंपिंग बंद करण्याचा निर्णयही महापालिकेने यापूर्वीच घेतला असून शीळ येथे वनविभागाच्या जागेत कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प उभा राहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणेकरांसाठी हक्काचे धरण बांधण्याचा शिवसेनेचा निर्धार आहे. तशी तयारीही महापालिकेने काही वर्षांपूर्वीच सुरू केली होती. मात्र, तत्कालीन आघाडी सरकारनेच धरणाचा प्रकल्प ठाणे महापालिकेकडून काढून ‘एमएमआरडीए’कडे सोपवला होता. नंतर ‘एमएमआरडीए’ने निधी देण्यास असमर्थता दर्शवली. त्यावेळी आव्हाड का गप्प बसले, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)