शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा पिते राष्ट्रवादीच्या बाटलीतून दूध - शिंदे

By admin | Updated: February 15, 2017 04:44 IST

राष्ट्रवादीचे नेते सकाळी जे बोलतात तेच मुख्यमंत्री रात्री ठाण्यात बोलतात. याचाच अर्थ भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये अंडरस्टँडीग

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते सकाळी जे बोलतात तेच मुख्यमंत्री रात्री ठाण्यात बोलतात. याचाच अर्थ भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये अंडरस्टँडीग असल्याचे दिसत असून, ही एक अभद्र युती असल्याचा टोला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. भाजपाकडे प्रचाराचे मुद्देच नसल्याने ते राष्ट्रवादीच्या बाटलीतून दूध पित असल्याचीही टीका त्यांनी केली. भाजपा न केलेल्या कामांचे तर श्रेय घेत आहे. ती गाजर दाखविणारी टोळीच असल्याचेही ते म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवा आणि उपवन येथे झालेल्या जाहीर सभांमध्ये केलेल्या अनेक दाव्यांचा आणि आरोपांचा समाचार घेतला. क्लस्टर डेव्हलपमेंट, मेट्रो, ठाण्यातील उड्डाणपूल, जलवाहतूक अशा अनेक कामांचे श्रेय मुख्यमंत्री स्वत:कडे घेत आहेत. परंतु, भाजपा सत्तेवर येण्यापूर्वीच यातील बहुतांश प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. क्लस्टर, मेट्रो, विस्तारित ठाणे स्थानक या प्रकल्पांसाठी कोणी प्रखर संघर्ष केला, हे ठाणेकरांना ठाऊक आहे. ठाण्यासाठी क्लस्टरचा निर्णय २८ फेब्रुवारी २०१४ रोजी झाला होता, त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री नव्हते. ठाण्यासाठी एसआरएचा मुद्दाही खोडून काढत ‘एसआरए’ची अधिसूचना ११ सप्टेंबर २०१४ रोजी निघाली होती याचे पुरावेच त्यांनी यावेळी सादर केले. शहरातील तीन उड्डाणपुलांच्या कामांच्या निविदा ठाणे महापालिकेने २०१४ च्या सप्टेंबर महिन्यात काढल्या असल्याची आठवण त्यांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली. त्यामुळे या तिन्ही प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न जनतेची दिशाभूल करणारा असून भाजपा ही केवळ गाजर दाखविणाऱ्यांची टोळी असल्याचा टोला त्यांनी लगावला. आमच्या हाती सत्ता द्या डम्पींग बंद करुन दाखवितो हे मुख्यमंत्र्यांचे विधानदेखील हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. जीतेंद्र आव्हाड यांना डंपिंग, मलिन:सारण, पाणीपुरवठा आदी मुद्यांवरून शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेचे मलिन:सारण प्रकल्प कोपरी आणि मुंब्रा येथे सुरू असून विटावा, माजिवडा आणि कोलशेत येथील प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दिव्यातील डंपिंग बंद करण्याचा निर्णयही महापालिकेने यापूर्वीच घेतला असून शीळ येथे वनविभागाच्या जागेत कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प उभा राहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणेकरांसाठी हक्काचे धरण बांधण्याचा शिवसेनेचा निर्धार आहे. तशी तयारीही महापालिकेने काही वर्षांपूर्वीच सुरू केली होती. मात्र, तत्कालीन आघाडी सरकारनेच धरणाचा प्रकल्प ठाणे महापालिकेकडून काढून ‘एमएमआरडीए’कडे सोपवला होता. नंतर ‘एमएमआरडीए’ने निधी देण्यास असमर्थता दर्शवली. त्यावेळी आव्हाड का गप्प बसले, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)