शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

भाजपचे नगरसेवक ब्लॅकमेलर - आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:34 IST

प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांपैकी कोणाला वाढीव कालावधी दिला, असा सवाल उपस्थित करणा-या भाजपच्या नगरसेवकांचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी महासभेत चांगलेच कान टोचले.

ठाणे : प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांपैकी कोणाला वाढीव कालावधी दिला, असा सवाल उपस्थित करणा-या भाजपच्या नगरसेवकांचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी महासभेत चांगलेच कान टोचले. ब्लॅकमेलिंग करून उद्देश साध्य करण्याऐवजी नैतिक मार्गाने उन्नती साधा, असे खडेबोल ‘पार्टी विथ डिफरन्स’ असलेल्या भाजपच्या नगरसेवकांना सुनावले. आयुक्तांची बोलणी चांगलीच झोंबल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे आयुक्तांनीही सर्वच अधिकाऱ्यांना घेऊन महासभेवरच बहिष्कार टाकला.शुक्रवारी महासभा सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तरांच्या अनुषंगाने भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाºयांचा कालावधी संपल्यानंतरही कोणाला वाढीव मुदतवाढ दिली, असा सवाल केला. यावर प्रशासनाच्या वतीने वर्षा दीक्षित यांनी उत्तर दिले. परंतु, त्यावर त्यांचे समाधान झाले नाही. उलट, माझा प्रश्न तुम्हाला समजलाच नाही, असे त्यांनी सांगितले. अखेर, आयुक्त जयस्वाल यांनी पाटील यांचा प्रश्न वाचून एकाच अधिकाºयाला मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट केले. परंतु, यावरही समाधान न झाल्याने माझा प्रश्न व्यवस्थित वाचा, एकच अधिकारी आहे का? आणखी काही अधिकारी आहेत, असा उलट सवाल केला. त्यानंतरही आयुक्तांनी तेच उत्तर दिले. त्यावर तुम्ही दिलेले उत्तर चुकीचे असल्याचा दावा पाटील यांनी केला. त्यानंतर मात्र आयुक्तांचा पारा अनावर झाला. त्यांनी तुमचा प्रश्न काय आहे, हे मला समजले आहे आणि असे तुम्ही का विचारत आहात, त्यामागचा तुमचा हेतूही मला माहीत असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले. परंतु, त्यानंतरही ते आपल्या प्रश्नावर अडून राहिले. त्यामुळे आयुक्तांचा राग अनावर होऊन त्यांनी तुमचा हेतू ब्लकमेलिंगचा वाटत असल्याचे सांगून अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग करून आपला उद्देश साध्य करण्यापेक्षा नैतिक मार्गाने उन्नती साधा, असा सल्ला दिला. हे उत्तर चांगलेच झोंबल्याने भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आयुक्तांनी अशा भरसभागृहात नगरसेवकाला असे म्हणणे चुकीचे असल्याचे सांगून गटनेते नारायण पवार यांनी आयुक्तांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. यावर आयुक्तांनीही संतापून आधी तुम्ही माफी मागा, असा सूर लावून अधिकाºयांना घेऊन महासभेवरच बहिष्कार टाकला.>वेळीच आवर न घातल्याने वातावरण तापलेदरम्यान, महासभा सुरू झाल्यानंतर भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनीही पुन्हा हिरानंदानी पार्कच्या मुद्याला हात घातला होता. त्यावेळेसही आयुक्त आणि मणेरा यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती. तेव्हासुद्धा आयुक्तांनी तुमचा प्रश्न विचारण्यामागचा हेतू मला समजू शकत आहे. माझ्याकडे त्याबद्दल काही माहिती असल्याचा आरोप करून त्याचे पुरावेसुद्धा मी सभागृहात दाखवू शकतो, असेही सुनावले. यावर मणेरा यांनीसुद्धा तुम्ही ते पुरावे दाखवाच, असे आव्हान आयुक्तांना दिले. मात्र, यानंतर इतर नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने यावर पडदा पडला. परंतु, एकाच वेळेस भाजपच्या नगरसेवकांवर आयुक्तांनी अशा प्रकारे ब्लॅकमेलिंगचा आरोप केल्याने सभागृहात भाजपा विरुद्ध आयुक्त असा सामना रंगला. वास्तविक पाहता मणेरा यांनी विचारलेल्या प्रश्नावर आयुक्तांनी शंका उपस्थित केली, तेव्हाच भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांवर आवरण्याची गरज होती. परंतु, त्यांनी तसे न केल्याने हा वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले.>शिवसेनेचे मौन : नगरसेवकांनी विचारलेल्या माहितीबाबत आयुक्तांनी ब्लॅकमेलिंग असा आरोप केल्याने हा सभागृहाचा अवमान ठरल्याचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी केली. परंतु, यावेळी शिवसेनेने मात्र मौन बाळगले. उलट, दबक्या आवाजात ज्या वेळेस प्रस्तावावर अनुमोदक म्हणून भाजपा सदस्यांकडे सही मागितली, तेव्हा आपली युती कुठे आहे, असे सांगून ती केली नाही, म्हणून आता आम्ही मदत का करायची, असे सांगून शिवसेनेने भाजपला सभागृहात एकाकी पाडले.>महापौरांनी सुनावले खडेबोल : महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आधीच्या सभेची आठवण करून देत, मागील सभेतही अशा पद्धतीने सभागृहात माझा अपमान झाला होता. परंतु, त्यावेळेस मी निघून गेल्यानंतरही आपण आयुक्त आल्यानंतर सभा सुरू ठेवली. त्यावेळेसच आपण विरोध का केला नाही, असे खडेबोल भाजपच्या नगरसेवकांना सुनावले. एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत मी सदस्यांच्या बाजूने बोलत असेल, तर सदस्यच काही वेळा नंतर आयुक्तांच्या बाजूने झुकते माप देतात. मग, मी सदस्यांच्या बाजूने तरी का बोलावे, असा सवालही त्यांनी केला.