शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला सत्ता जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 02:34 IST

महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकारण वेगवेगळे वळण घेत आहे. ओमी टीमला महापौर पद दिल्यास साई पक्ष सत्तेतून बाहेर पडून शिवसेनेची सत्ता येईल

सदानंद नाईकउल्हासनगर : महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकारण वेगवेगळे वळण घेत आहे. ओमी टीमला महापौर पद दिल्यास साई पक्ष सत्तेतून बाहेर पडून शिवसेनेची सत्ता येईल, असी भीती भाजपा नेत्यांना सतावू लागली आहे. भाजपाने ओमी टीमला आतापर्यंत सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवले आहे. जर उद्या मुख्यमंत्र्यांनी ओमी टीमला महापौरपद देण्याचे सांगितल्यास राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. त्यातच शिवसेनाही सत्तेसाठी उत्सुक असल्याने ओमी टीमसोबत युतीचे संकेत दिल्याने पालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे.उल्हासनगर महापालिकेवर भाजपाने ओमी टीमच्या मदतीने झेंडा फडकावत महापौरपद पदरात पाडून घेतले. मात्र ओमी टीमला सव्वा वर्ष सत्तेपासून लांब ठेवल्याने, त्यांच्यात नाराजी पसरली. महापौर पदाची पहिली सव्वावर्ष भाजपाने तर नंतरची सव्वावर्ष ओमी टीमने वाटून घेतली. मीना आयलानी यांच्या महापौरपदाला कार्यकाळ पाच जुलैला संपत असल्याने ओमी टीमने महापौरपदाची जय्यत तयारी सुरू केली आहे.महापौर आयलानी यांनी अद्याप राजीनामा दिलेला नसल्याने ओमी टीमच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. पक्षाचा आदेश आल्यास महापौरपदाचा राजीनामा देईन असे सांगून आयलानी यांनी ओमी टीमची पुन्हा एकदा कोंडी करून ठेवली आहे. दुसरीकडे ओमी टीमला महापौरपद दिल्यास साई पक्ष सत्तेतून बाहेर पडेल, अशी भीती भाजपाच्या वरिष्ठ व स्थानिक नेत्यांना वाटू लागली आहे. ही परिस्थिती पाहता ओमी टीमचे महापौरपदाचे स्वप्न भंगणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आश्वासनानुसार ओमी टीमला महापौरपदाच्या पहिल्या टर्ममधील सव्वावर्षाचे महापौर पद दिले जाणार होते. प्रत्यक्षात टीमच्या महापौर पदाला सुरूंग लागला. मात्र मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील असा विश्वास ओमी यांनी व्यक्त केला आहे.साई पक्षाचे प्रमुख व उपमहापौर जीवन इदनानी यांनी महापौर मीना आयलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यावर सत्तेत राहयचे की नाही याचा निर्णय घेवू, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्यातरी भाजपा महाआघाडीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ओमी टीमला महापौरपद मिळू नये यासाठी स्थानिक भाजपा नेते व साई पक्ष सक्रीय झाल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय निरीक्षकांमध्ये सुरू आहे.