शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

बीएसयूपीच्या घरांवरून जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:46 IST

बीएसयूपी योजनेतील घरांच्या वाटपावरून कल्याणमधील इंदिरानगर आणि साठेनगर येथील रहिवाशांमध्ये सोमवारी दुपारी ३ वाजता केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार हाणामारी झाली.

कल्याण : बीएसयूपी योजनेतील घरांच्या वाटपावरून कल्याणमधील इंदिरानगर आणि साठेनगर येथील रहिवाशांमध्ये सोमवारी दुपारी ३ वाजता केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार हाणामारी झाली. महापालिका सुरक्षारक्षकांना लाभार्थी जुमानत नसल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यामुळे हाणामारी करणारे पांगले. मात्र, या सगळ्या प्रकरणात महापालिकेने कोणतीही भूमिका न घेतल्याने लाभार्थ्यांनी संताप व्यक्त केला.आधारवाडी डम्पिंगशेजारच्या साठेनगरातील रहिवाशांना केडीएमसीने बीएसयूपी योजनेत उंबर्डे येथे घरे दिली होती. मात्र, तेथे वीज, पाणी आणि अन्य सोयीसुविधा नसल्याने लाभार्थ्यांनी ओरड सुरू केली. तसेच प्रकल्पाचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे महापालिकेने १५ लाभार्थ्यांना इंदिरानगरातील बीएसयूपी योजनेतील घरांच्या चाव्या दिल्या.परंतु, इंदिरानगरातील १४७ जणांना महापालिकेने अपात्र ठरवले आहे. या अपात्र नागरिकांच्या घरांच्या जागेवर महापालिकेने बीएसयूपीची इमारत बांधली. त्यामुळे महापालिकेने त्यांची संक्रमण शिबिरात राहण्याची व्यवस्था केली. तसेच त्यांना घरभाडेही दिले. आता महापालिका त्यांच्याकडे वास्तव्यासंबंधातील पुरावे मागत आहे. त्यामुळे त्यांना बीएसयूपीची घरे मिळालेली नाहीत. मात्र, साठेनगरच्या लाभार्थ्यांना चाव्या दिल्याने इंदिरानगरातील अपात्र लाभार्थ्यांनी त्यास जोरदार हरकत घेतली. सोमवारी सकाळी साठेनगरचे लाभार्थी सामान घेऊन इंदिरानगरात पोहोचले असता त्यांना इंदिरानगरातील अपात्र लाभार्थ्यांनी विरोध करत पिटाळले. त्यामुळे साठेनगरातील लाभार्थी बिºहाड घेऊन महापालिका मुख्यालयात आले. त्यावेळी तेथे इंदिरानगरातील अपात्र लाभार्थीही पोहोचले. साठेनगरातील लाभार्थ्यांना त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी मुख्य प्रवेशद्वार बंद केले. मुख्यालयासमोरच्या रस्त्यावर हा राडा अर्धा तास सुरू होता. सुरक्षारक्षकांनी ही हाणामारी थांबवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, लाभार्थी त्यांना जुमानत नव्हते. अखेरीस बाजारपेठ पोलिसांना पाचारण केल्यानंतर जमाव पांगला.दरम्यान, हाणामारी होण्यापूर्वी काहींनी आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली होती. त्यावेळी बोडके यांनी साठेनगरासाठी ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. त्यांना राहण्यास हरकत घेऊ नका, असे इंदिरानगरच्या अपात्र लाभार्थ्यांना सांगितले होते. तसेच अपात्रतेच्या मुद्यावर बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर, हा प्रकार घडला असल्याची माहिती साठेनगरातील लाभार्थी राजू ढगे यांनी दिली.>महापालिका, पोलिसांकडून न्याय नाही : साठेनगरातील रहिवासी दशरथ साबळे म्हणाले, या सगळ्या प्रकरणात महापालिकेची भूमिका चुकीची आहे. लाभार्थ्यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे. १५ दिवसांपूर्वी आम्हाला चावी मिळाली असताना आम्हाला घरात राहू दिले जात नाही. उंबर्डे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर आम्ही तिथे जाणार आहोत. ही तात्पुरती व्यवस्था असूनही त्यांनी जोरदार हरकत घेतली. रस्ता अडवला. जिन्यात पत्रे ठेवले. घरात जाऊ दिले नाही. साठेनगरातील महिला लाभार्थी अवंती खंडागळे, ताराबाई साबळे, विमल नवगिरे, द्वारकाबाई घुले यांना मारहाण केली आहे. पावसात भिजलेला त्यांचा संसार व बिºहाडाची नासधूस केली आहे. पोलीस व महापालिकेकडून आम्हाला न्याय मिळालेला नाही.

टॅग्स :kalyanकल्याण