शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बिर्ला महाविद्यालयात विना वाहन दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:32 IST

 महाविद्यालयाच्या आवारात दररोज येणारा वाहनांचा कर्णकर्कश आवाजाऐवजी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. शांत, रम्य वातावरणात सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवारता आला नाही. निमित्त होते ते, बिर्ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विना वाहन दिवसांचे. 

कल्याण : महाविद्यालयाच्या आवारात दररोज येणारा वाहनांचा कर्णकर्कश आवाजाऐवजी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. शांत, रम्य वातावरणात सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवारता आला नाही. निमित्त होते ते, बिर्ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विना वाहन दिवसांचे.     बिर्ला महाविद्यालयात दररोज 1400 दुचाकी आणि 300 चारचाकी गाडय़ा उभ्या असतात. पण गेल्या चार दिवसांपासून सर्व कार आणि दुचाकी वाहन धारकांना नो व्हेईकल डे विषयी माहिती देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न महाविद्यालयातर्फे करण्यात आला. या जनजागृती मोहिमेला वाहनधारकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी आज खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहनांचा वापर करून महाविद्यालय गाठले. यामुळे वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यास हातभार लावून पर्यावरण संवर्धन होण्यास मदत झाली. महाविद्यालय परिसरात एक ही वाहन नसल्याने परिसर शांत, रम्य, प्रसन्न आणि हिरवाईने नटलेला वाटत होता. विद्यार्थ्यांनी देखील अशा प्रकारचे उपक्रम वारंवार राबविण्याची गरज आहे असे सांगितले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन बव्रे व त्यांच्या सहकार्याच्या मदतीने राबविण्यात आला होता.     कडोमपाच्या परिवहन विभागाने देखील या उपक्रमाला चांगला प्रकारे सहकार्य केले. परिवहन विभागातर्फे कल्याण स्टेशन ते बिर्ला महाविद्यालय आणि बिर्ला महाविद्यालय ते स्टेशन या परिसरात बसेसची संख्या वाढविली होती. परिवहन समितीचे अध्यक्ष संजय पावशे आणि समितीच्या सदस्यांनी महाविद्यालयाला भेट दिली. तसेच उपक्रमांचे कौतुक केले.     बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेशचंद्र यांनी अश्याप्रकारचा उपक्रम इतर महाविद्यालयात ही राबविला जावा असे आवाहन केले आहे. तसेच कल्याण शहरात वेगवेगळ्य़ा विभागात टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबविण्यात यावा. महाविद्यालयातर्फे दरवर्षी किमान दोन वेळेस विना वाहन दिवस पाळण्यात येईल, असे सांगितले.     नितीन बव्रे म्हणाले, विना वाहन दिवस हे पर्यावरण संवर्धनासाठीचे एक पाऊल आहे. इतर सामाजिक संस्था आणि महाविद्यालये यांच्या मदतीने हा उपक्रम संपूर्ण कल्याण शहरात प्रत्यक्षात येऊ शकतो. 

टॅग्स :kalyanकल्याण