शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

बिर्ला महाविद्यालयात विना वाहन दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:32 IST

 महाविद्यालयाच्या आवारात दररोज येणारा वाहनांचा कर्णकर्कश आवाजाऐवजी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. शांत, रम्य वातावरणात सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवारता आला नाही. निमित्त होते ते, बिर्ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विना वाहन दिवसांचे. 

कल्याण : महाविद्यालयाच्या आवारात दररोज येणारा वाहनांचा कर्णकर्कश आवाजाऐवजी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. शांत, रम्य वातावरणात सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवारता आला नाही. निमित्त होते ते, बिर्ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विना वाहन दिवसांचे.     बिर्ला महाविद्यालयात दररोज 1400 दुचाकी आणि 300 चारचाकी गाडय़ा उभ्या असतात. पण गेल्या चार दिवसांपासून सर्व कार आणि दुचाकी वाहन धारकांना नो व्हेईकल डे विषयी माहिती देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न महाविद्यालयातर्फे करण्यात आला. या जनजागृती मोहिमेला वाहनधारकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी आज खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहनांचा वापर करून महाविद्यालय गाठले. यामुळे वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यास हातभार लावून पर्यावरण संवर्धन होण्यास मदत झाली. महाविद्यालय परिसरात एक ही वाहन नसल्याने परिसर शांत, रम्य, प्रसन्न आणि हिरवाईने नटलेला वाटत होता. विद्यार्थ्यांनी देखील अशा प्रकारचे उपक्रम वारंवार राबविण्याची गरज आहे असे सांगितले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन बव्रे व त्यांच्या सहकार्याच्या मदतीने राबविण्यात आला होता.     कडोमपाच्या परिवहन विभागाने देखील या उपक्रमाला चांगला प्रकारे सहकार्य केले. परिवहन विभागातर्फे कल्याण स्टेशन ते बिर्ला महाविद्यालय आणि बिर्ला महाविद्यालय ते स्टेशन या परिसरात बसेसची संख्या वाढविली होती. परिवहन समितीचे अध्यक्ष संजय पावशे आणि समितीच्या सदस्यांनी महाविद्यालयाला भेट दिली. तसेच उपक्रमांचे कौतुक केले.     बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेशचंद्र यांनी अश्याप्रकारचा उपक्रम इतर महाविद्यालयात ही राबविला जावा असे आवाहन केले आहे. तसेच कल्याण शहरात वेगवेगळ्य़ा विभागात टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबविण्यात यावा. महाविद्यालयातर्फे दरवर्षी किमान दोन वेळेस विना वाहन दिवस पाळण्यात येईल, असे सांगितले.     नितीन बव्रे म्हणाले, विना वाहन दिवस हे पर्यावरण संवर्धनासाठीचे एक पाऊल आहे. इतर सामाजिक संस्था आणि महाविद्यालये यांच्या मदतीने हा उपक्रम संपूर्ण कल्याण शहरात प्रत्यक्षात येऊ शकतो. 

टॅग्स :kalyanकल्याण