शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिर्ला महाविद्यालयात विना वाहन दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:32 IST

 महाविद्यालयाच्या आवारात दररोज येणारा वाहनांचा कर्णकर्कश आवाजाऐवजी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. शांत, रम्य वातावरणात सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवारता आला नाही. निमित्त होते ते, बिर्ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विना वाहन दिवसांचे. 

कल्याण : महाविद्यालयाच्या आवारात दररोज येणारा वाहनांचा कर्णकर्कश आवाजाऐवजी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. शांत, रम्य वातावरणात सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवारता आला नाही. निमित्त होते ते, बिर्ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विना वाहन दिवसांचे.     बिर्ला महाविद्यालयात दररोज 1400 दुचाकी आणि 300 चारचाकी गाडय़ा उभ्या असतात. पण गेल्या चार दिवसांपासून सर्व कार आणि दुचाकी वाहन धारकांना नो व्हेईकल डे विषयी माहिती देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न महाविद्यालयातर्फे करण्यात आला. या जनजागृती मोहिमेला वाहनधारकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी आज खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहनांचा वापर करून महाविद्यालय गाठले. यामुळे वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यास हातभार लावून पर्यावरण संवर्धन होण्यास मदत झाली. महाविद्यालय परिसरात एक ही वाहन नसल्याने परिसर शांत, रम्य, प्रसन्न आणि हिरवाईने नटलेला वाटत होता. विद्यार्थ्यांनी देखील अशा प्रकारचे उपक्रम वारंवार राबविण्याची गरज आहे असे सांगितले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन बव्रे व त्यांच्या सहकार्याच्या मदतीने राबविण्यात आला होता.     कडोमपाच्या परिवहन विभागाने देखील या उपक्रमाला चांगला प्रकारे सहकार्य केले. परिवहन विभागातर्फे कल्याण स्टेशन ते बिर्ला महाविद्यालय आणि बिर्ला महाविद्यालय ते स्टेशन या परिसरात बसेसची संख्या वाढविली होती. परिवहन समितीचे अध्यक्ष संजय पावशे आणि समितीच्या सदस्यांनी महाविद्यालयाला भेट दिली. तसेच उपक्रमांचे कौतुक केले.     बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेशचंद्र यांनी अश्याप्रकारचा उपक्रम इतर महाविद्यालयात ही राबविला जावा असे आवाहन केले आहे. तसेच कल्याण शहरात वेगवेगळ्य़ा विभागात टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबविण्यात यावा. महाविद्यालयातर्फे दरवर्षी किमान दोन वेळेस विना वाहन दिवस पाळण्यात येईल, असे सांगितले.     नितीन बव्रे म्हणाले, विना वाहन दिवस हे पर्यावरण संवर्धनासाठीचे एक पाऊल आहे. इतर सामाजिक संस्था आणि महाविद्यालये यांच्या मदतीने हा उपक्रम संपूर्ण कल्याण शहरात प्रत्यक्षात येऊ शकतो. 

टॅग्स :kalyanकल्याण