शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

बिऱ्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर; मोर्चेकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन, २ तासापासून रस्ता जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 13:26 IST

बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली होती.  

कसारा,  शाम धुमाळ: राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचा मुंबई येथील मंत्रालयाकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा इगतपुरीत मुक्कामी स्थिरावला आहे. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून विविध मागण्यासाठी या बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली होती.  

शाळेतील आणि वसतिगृहातील रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी यांचा हा बिऱ्हाड मोर्चा असुन दिनांक २५ मे २०१३ रोजीचे आदिवासी विकास विभागाचे शासन पत्र रद्द करावे, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर बाहेरील कर्मचाऱ्यांना घेऊ नये, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण होईपर्यंत शासन सेवेत संरक्षण देण्यात यावे तसेच त्यांना सेवेतून कमी करू नये अशा प्रमुख मागण्या या मोर्च्याकरांच्या आहेत. विशेष म्हणजे दुपारच्या सुमारास काही वेळा जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे मोर्चेकरी चिंब भिजले होते.

आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला  सिटु संघटनेने पाठींबा दिला असुन मुंबईच्या दिशेने रावांना होण्यासाठी मुबईच्या वेशीवर दाखल झाला आहे.मुंबई ची वेस असलेल्या कसारा घाटात हा मोर्चा आला असून. सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार करून ताबडतोब निर्णय घ्यावा ही मागणी करून या मोर्चाला विविध संघटनानी पाठिंबा दिला आहे. . या मोच्यात मोठ्या प्रमाणावर महिला लहान मुले व अपंग युवक आहेत. गुरुवाई सकाळी हा बिऱ्हाड मोर्चा महामार्गावरील कसारा घाटात दाखल झाला असून पुढे निघाला आहे.अरे या सरकारचे करायचं काय खाली डोक वर पाय अशा अनेक घोषणा देऊन सरकारचा धिक्कार केला. हजारो मोर्चे करांनी अचानक मुबई नाशिक व नाशिक मुबई महामार्गांवरील दोन्ही कसारा घाटात रस्ता रोको केला असून वाहणांच्या लाबाचं लांब रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :thaneठाणे