शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बिऱ्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर; मोर्चेकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन, २ तासापासून रस्ता जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 13:26 IST

बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली होती.  

कसारा,  शाम धुमाळ: राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचा मुंबई येथील मंत्रालयाकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा इगतपुरीत मुक्कामी स्थिरावला आहे. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून विविध मागण्यासाठी या बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली होती.  

शाळेतील आणि वसतिगृहातील रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी यांचा हा बिऱ्हाड मोर्चा असुन दिनांक २५ मे २०१३ रोजीचे आदिवासी विकास विभागाचे शासन पत्र रद्द करावे, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर बाहेरील कर्मचाऱ्यांना घेऊ नये, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण होईपर्यंत शासन सेवेत संरक्षण देण्यात यावे तसेच त्यांना सेवेतून कमी करू नये अशा प्रमुख मागण्या या मोर्च्याकरांच्या आहेत. विशेष म्हणजे दुपारच्या सुमारास काही वेळा जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे मोर्चेकरी चिंब भिजले होते.

आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला  सिटु संघटनेने पाठींबा दिला असुन मुंबईच्या दिशेने रावांना होण्यासाठी मुबईच्या वेशीवर दाखल झाला आहे.मुंबई ची वेस असलेल्या कसारा घाटात हा मोर्चा आला असून. सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार करून ताबडतोब निर्णय घ्यावा ही मागणी करून या मोर्चाला विविध संघटनानी पाठिंबा दिला आहे. . या मोच्यात मोठ्या प्रमाणावर महिला लहान मुले व अपंग युवक आहेत. गुरुवाई सकाळी हा बिऱ्हाड मोर्चा महामार्गावरील कसारा घाटात दाखल झाला असून पुढे निघाला आहे.अरे या सरकारचे करायचं काय खाली डोक वर पाय अशा अनेक घोषणा देऊन सरकारचा धिक्कार केला. हजारो मोर्चे करांनी अचानक मुबई नाशिक व नाशिक मुबई महामार्गांवरील दोन्ही कसारा घाटात रस्ता रोको केला असून वाहणांच्या लाबाचं लांब रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :thaneठाणे