शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

आदिवासींचा बिऱ्हाड मोर्चा

By admin | Updated: February 9, 2016 02:15 IST

येथील तहसील कार्यालयावर सोमवारी श्रमजीवी संघटनेने बिऱ्हाड मोर्चा काढला होता. त्यात शेकडो आदिवासीबांधव उपस्थित होते. आदिवासी भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची

अंबरनाथ : येथील तहसील कार्यालयावर सोमवारी श्रमजीवी संघटनेने बिऱ्हाड मोर्चा काढला होता. त्यात शेकडो आदिवासीबांधव उपस्थित होते. आदिवासी भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी त्यांनी केली.अंबरनाथ नगरपरिषदेने गेल्या आठवड्यात पालिकेच्या आरक्षित जागेवर झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करून भूखंड मोकळे केले होते. यामध्ये काही आदिवासींची घरेदेखील असल्याचा दावा श्रमजीवी संघटनेने केला होता. या कारवाईच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी संघटनेने हा मोर्चा काढला होता. हुतात्मा चौकातून निघालेला मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर आला. आदिवासी गीत सादर करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा तहसीलदारांसमोर मांडल्या. तसेच आपल्या निवेदनात त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्यांवर लक्ष देण्याची मागणी केली. त्यात आदिवासींना बेघर करणाऱ्या प्रशासनावर गुन्हा दाखल करणे, झोपडपट्टीधारकांना फोटोपास देणे, आदिवासीपाड्यांना गावठाणांचा दर्जा देणे, शहरी आणि ग्रामीण भागातील वनजमिनीवर असलेल्या आदिवासींच्या झोपड्या केंद्र शासनाच्या कायद्यान्वये व सुधारित नियम २०१२ प्रमाणे नियमानुकूल करणे, प्रकाशनगर येथील आदिवासींचे पुनर्वसन करणे, करवले, कातकरीपाडा, चिखलोली ठाकूरपाडा, वडवली, चंदनवाडी या ठिकाणच्या आदिवासीवाडीतील येणारे प्रकल्प रद्द करून आदिवासींच्या घरांचे विस्थापन थांबवणे, त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ पाण्याची व्यवस्था करणे, रेशनवर धान्य सुरू करणे, बोगस लाभार्थ्यांना रद्द करणे आदी मागण्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)