शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार मतदारांपर्यंत जाण्याचे मोठे आव्हान

By admin | Updated: May 12, 2017 01:37 IST

भिवंडी-निजामपूर महापालिकेत चार वॉर्डांच्या प्रभागपद्धतीमुळे प्रचाराकरिता उपलब्ध केवळ १२ दिवसांत २५ हजार मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे / भिवंडी : भिवंडी-निजामपूर महापालिकेत चार वॉर्डांच्या प्रभागपद्धतीमुळे प्रचाराकरिता उपलब्ध केवळ १२ दिवसांत २५ हजार मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांपुढे आहे. मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहोचवण्याकरिता प्रचारयात्रांवर भर देण्याचा निर्णय सर्वच पक्षांनी घेतला आहे.भिवंडी महापालिकेत २३ प्रभागांतील ९० वॉर्डांकरिता निवडणूक होणार आहे. अनेक ठिकाणी मतदारयादीतील घोळाच्या तक्रारी, प्रभागांची वाढलेली भौगोलिक सीमा व मतदारांची वाढलेली सीमा आणि मतदारांपर्यंत स्लीप पोहोचवण्याची भ्रांत यामुळे उमेदवार व त्यांचे कट्टर समर्थक यांना तारेवरील कसरत करावी लागणार आहे. भिवंडीत शिवसेना, भाजपा, काँग्रेस या पक्षांनी वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे, तर समाजवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचाराच्या अवघ्या १२ दिवसांत प्रचारफेऱ्या व चौकसभांवर प्रामुख्याने उमेदवारांचा भर असणार आहे. जास्तीतजास्त मतदारांपर्यंत किमान आपला चेहरा आणि चिन्ह पोहोेचवावे, यासाठी उमेदवारांनी व्यूहरचना आखल्याचे सांगण्यात येते.भिवंडीतील ९० जागांपैकी ६५ जागा मुस्लिमबहुल परिसरातील आहेत, तर उर्वरित २५ जागा हिंदुबहुल परिसरातील आहेत. मुस्लिमबहुल परिसरात मुख्यत्वे काँग्रेस, राष्ट्रवादी-समाजवादी यांनी उमेदवार दिले आहेत. उर्वरित २५ वॉर्डात शिवसेना, भाजपा यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळेल. काही पक्षांना येथे उमेदवारच मिळालेले नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, इतकेच काय पण भाजपाही आपल्या पक्षातील मुस्लिम चेहरा असलेल्या नेत्यांना प्रचारात उतरवत आहे. अनेक उमेदवारांचाही तसाच आग्रह आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडूनही स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जात आहे, तर भाजपा राज्य आणि केंद्र सरकारच्या कामगिरीच्या बळावर मते मागणार आहे. शिवसेना उमेदवारांच्या कामगिरीवर मते मागणार आहे. मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतात हे लवकरच कळेल.